+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ११ जूनला कोल्हापूर दौऱ्यावर adjustहिंगणमिठ्ठा अन् बांधकाम व्यावसायिकांच्या लेखणीचा गोडवा adjustविवेकानंद शिक्षण संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत! शुभांगी गावडे, शेजवळसह गवळींना मुदतवाढ !! adjustशिवाजी तरुण मंडळ उंपात्य दाखल, फुलेवाडी क्रीडा मंडळ पराभूत adjustआमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम adjustआरोग्य विद्यापीठाच्या होमिओपॅथी विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. राजकुमार पाटील adjustभाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक adjustशाळेच्या आठवणीने जमला मित्रांचा मेळा ! नागाव हायस्कूलच्या १९९९-२००० बॅचचा स्नेहमेळावा !! adjustअमृत अंतर्गत कोल्हापूरला ३५४ कोटी निधी मंजुरीची शक्यता :राजेश क्षीरसागर adjust उपसंचालक कार्यालय : २५ हजाराची लाच घेताना तिघे जाळ्यात
Screenshot_20230530_170409~2
Screenshot_20230404_150735~2
Maharashtra-News-1IMG-20200920-WA0002
schedule28 Mar 23 person by visibility 127 categoryलाइफस्टाइल
निसर्गाशी एकरूप राहणे हेच जीवन–काडसिद्धेश्वर स्वामी
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : निसर्गाशी एकरूप राहणे हेच जीवन आहे. निसर्गातील घटकांना आपलेसे मानले तर जीवन सुखमय होईल, असे मत कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी आज केले.
गगनवाबडा येथील वेसरफ येथे आजरी उद्योग समूहाच्या वतीने उभारण्यात आलेल्या आजरीज इको व्हॅलीचे उदघाटन स्वामींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
 डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील म्हणाले, येथे उभारलेल्या साखर कारखान्यामुळे आज येथील युवकांना रोजगार मिळाला, तसेच आजरीच इको व्हॅलीच्या माध्यमातून येथील जैवविविधतेचे जतन तर होईलच शिवाय ती समाजासमोर येईल. अशा प्रकारचे आणखी येथे प्रकल्प झाल्यास परिसराचा कायापालट होईल.
उद्योजक शेखर आजरी यांनी प्रास्ताविकात आजरीज इको व्हॅलीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, पश्चिम घाटापैकी गगनबावडामध्ये निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील दाट जंगलामध्ये औषधी वनस्पतीही विपुल प्रमाणात आहेत. त्याच दृष्टीने वेसरफ येथे ४० वर्षांच्या अथक परिश्रमातून आजरीज इको व्हॅली, या नावे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले अग्रो टुरिझम सेंटर उभारले आहे. दहा एकरामध्ये विस्तारलेल्या व इको फ्रेंडली असणाऱ्या या सेंटरमध्ये १५ अडव्हेंचर प्रकार आहेत. पुढे पुढे त्याचा विस्तार करू. येथील आहार हा पूर्ण शाकाहारी असेल. विजय पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
डॉ. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अशोक रोकडे यांनी आभार मानले.