Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महात्मा बसवण्णांच्या वचनात मराठीतील प्रबोधन परंपरेचे मूळ – प्राचार्य राजेखान शानेदिवाणशिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शाहू मानेंचा केआयटीत सत्कारसतेज पाटलांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेवकांचे प्रीतीभोजन, खुलेपणाने रंगली राजकारणावर चर्चा !किसनराव मोरे ट्रस्टतर्फे पुरस्कार जाहीर, बुधवारी पुरस्कार वितरण समारंभकोल्हापूर उद्यम  सोसायटीच्या अध्यक्षपदी जयश्री जाधव, उपाध्यक्षपदी सुधाकर सुतारकोल्हापुरातून सात शहरांशी थेट विमानसेवा, मुंबई-अहमदाबाचे विमान आता ७६ आसनी !वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस ऑगस्टपासून कोल्हापुरात धावणार, स्वातंत्र्यदिनी चार्जिंग स्टेशनचा शुभारंभकैलास मानसरोवर यात्रेसंबंधी सहज सेवा ट्रस्टतर्फे मोफत मार्गदर्शनमहापूर नियंत्रणाच्या उपाययोजनेसंबंधी सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाची चर्चाप्रा. संदीप पाटील यांना पीएचडी

जाहिरात

 

पीएम वाणी वायफाय योजनेचा जिल्हयात प्रारंभ, दिवसाला फक्त पाच रुपयात अनलिमिटेड डाटा

schedule22 May 23 person by visibility 343 categoryउद्योग

खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गोरगरीब जनतेला स्वस्तात इंटरनेट सुविधा मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सरकारमान्य इंटरनेट सेवा योजना सुरू केलीय. दिवसाला फक्त पाच रुपयांमध्ये अनलिमिटेड मोबाईल डाटा उपलब्ध होणार आहे,याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. हातकणंगले येथे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या पीएम वाणी वायफाय योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
 खासदार महाडिक म्हणाले,"  सार्वजनिक ठिकाणी लोकांना परवडणार्‍या दरात वायफाय तसंच इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणं, ग्रामीण भागात जिथे इंटरनेट सुविधा मिळत नाही, अशा ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणं, रेशन दुकानापासून शंभर ते तीनशे मीटर परिसरातील नागरिकांना वायफाय देणं, अत्यंत कमी उत्पन्न असणार्‍या कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणं, यासाठी पीएम वाणी योजनेच्या माध्यमातून वायफाय मिळणार आहे.           यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले, दुकान जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, पीएम वाणीचे जयेश गाणेकर, राजेंद्र कारंडे, महेश ठोंबरे, यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी नगरसेवक राजू इंगवले, मयूर कोळी, दीनानाथ मोरे, उमेश सूर्यवंशी, सुभाष मोरे, पांडुरंग सुभेदार, महादेव कदम, रावसाहेब कारंडे, आनंदा हजारे,विठ्ठल कारके आबू बारगीर  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes