Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विधान परिषदेसाठी भाजपकडून अकरा उमेदवारांची यादी जाहीर जिल्हा परिषदेच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम जिल्हा परिषदेत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरीजयप्रभा स्टुडिओमधून प्रचाराचा शुभारंभ, संग्राम भालकर अपक्ष म्हणून रिंगणात हितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटीलसीआयआय -अ‍ॅग्री इनोव्हेशन समिट उत्साहात,  डीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठात आयोजन गोकुळसाठी महायुतीच्या नेत्यांचे ठरले ! छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी जाहीर!!राज्याला आदर्शवत भाडेदराचे रोल मॉडेल तयार करा : आमदार राजेश क्षीरसागरसोशल मीडियावर गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कर्मचाऱ्यांची मागणी महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून ७० कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नती

जाहिरात

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ११ जूनला कोल्हापूर दौऱ्यावर

schedule30 May 23 person by visibility 750 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
 "शासन आपल्या दारी" हे राज्यस्तरीय अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती सरकार कडून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुख्यमंत्री शिंदे ११ जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, पेटाळा मैदानात सायंकाळी सहा वाजता सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.  
 या दौऱ्यासंदर्भात राजेश क्षीरसागर यांनी माहिती दिली. राज्य शासनाच्या वतीने राज्यात शासन आपल्या दारी अभियान राबविले जाणार आहे. याचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. शासनाच्या विविध योजना गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. याकामी कोल्हापूर जिल्ह्यात शिवदूतांची नेमणुकीचे काम अंतिम टप्प्यात असून, शिवदूत आणि शासन यांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून ७५ हजार पेक्षा जास्त नागरिकांना या अभियानातून लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांची ११ जून रोजी सायंकाळी सहा वाजता पेटाळा मैदान येथे सभा होणार आहे. यामध्ये राज्यमंत्रीमंडळातील मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहे. या सभेस कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना - भाजप महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदे यांचे जल्लोषी स्वागत करण्यास सज्ज असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes