Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अभाविपचे विद्यापीठात आंदोलन, काही कार्यकर्ते कुलगुरूंच्या केबिनमध्ये घुसले वंदूरच्या पाटील बंधूचा सेंद्रीय गूळ उद्योग ! परराज्यातही पसरला गोडवा, शंभर रुपये किलोने विक्री !महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होणारपाच कोटी रुपयांच्या बक्षीसाचे पंचायतराज अभियान हे देशातील एकमेव-जयकुमार गोरेबॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला केंद्रीय मंत्र्यांकडून पुरस्कार प्रदानटीईटी अनिवार्य चुकीचे, पुरोगामीकडून राज्यातील आमदार-खासदारांना पत्रेकोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनमध्ये आज जीएसटीबाबत कार्यशाळाप्रा. जयसिंग दिंडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडीपुनर्विचार याचिकेसाठी सरकारवर वाढता दबाव, शिक्षक संघटना सरसावल्या ! मंत्री- आमदार –खासदारांना पत्रे !!टीईटीसंबंधी दोन दिवसात उच्चस्तरीय समितीची बैठक, धैयशील मानेंनी घेतली दादा भुसेंची भेट

जाहिरात

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ११ जूनला कोल्हापूर दौऱ्यावर

schedule30 May 23 person by visibility 680 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
 "शासन आपल्या दारी" हे राज्यस्तरीय अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती सरकार कडून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुख्यमंत्री शिंदे ११ जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, पेटाळा मैदानात सायंकाळी सहा वाजता सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.  
 या दौऱ्यासंदर्भात राजेश क्षीरसागर यांनी माहिती दिली. राज्य शासनाच्या वतीने राज्यात शासन आपल्या दारी अभियान राबविले जाणार आहे. याचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. शासनाच्या विविध योजना गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. याकामी कोल्हापूर जिल्ह्यात शिवदूतांची नेमणुकीचे काम अंतिम टप्प्यात असून, शिवदूत आणि शासन यांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून ७५ हजार पेक्षा जास्त नागरिकांना या अभियानातून लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांची ११ जून रोजी सायंकाळी सहा वाजता पेटाळा मैदान येथे सभा होणार आहे. यामध्ये राज्यमंत्रीमंडळातील मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहे. या सभेस कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना - भाजप महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदे यांचे जल्लोषी स्वागत करण्यास सज्ज असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes