+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी adjustदेवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule30 May 23 person by visibility 594 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
 "शासन आपल्या दारी" हे राज्यस्तरीय अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती सरकार कडून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुख्यमंत्री शिंदे ११ जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, पेटाळा मैदानात सायंकाळी सहा वाजता सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.  
 या दौऱ्यासंदर्भात राजेश क्षीरसागर यांनी माहिती दिली. राज्य शासनाच्या वतीने राज्यात शासन आपल्या दारी अभियान राबविले जाणार आहे. याचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. शासनाच्या विविध योजना गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. याकामी कोल्हापूर जिल्ह्यात शिवदूतांची नेमणुकीचे काम अंतिम टप्प्यात असून, शिवदूत आणि शासन यांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून ७५ हजार पेक्षा जास्त नागरिकांना या अभियानातून लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांची ११ जून रोजी सायंकाळी सहा वाजता पेटाळा मैदान येथे सभा होणार आहे. यामध्ये राज्यमंत्रीमंडळातील मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहे. या सभेस कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना - भाजप महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदे यांचे जल्लोषी स्वागत करण्यास सज्ज असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.