Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लवकरच आचारसंहिता, पहिल्यांदा नगरपालिका, मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका –हसन मुश्रीफांचा अंदाजकेडीसीसीचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील, नेसरीच्या सरपंच गिरीजा शिंदे यांचा भाजपात प्रवेशअंतरंग हॉस्पिटलचा अपोलो हॉस्पिटल्सशी करार, कोल्हापूरच्या  मेडिकल टुरिझमला गती - डॉ .विवेकानंद कुलकणीक्रिप्टोग्राफी तंत्रज्ञान भविष्यात सर्वव्यापी होणार-विवेकानंदतर्फे आयोजित चर्चासत्रात उमटला सूरन्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बुधवारी रोजगार मेळावाअधिकाऱ्यांची नकारात्मकता अन् संतप्त पालकमंत्री ! आबिटकरांनी बैठकीतच दिले शहर अभियंत्यांच्या पदमुक्तीचे आदेश !!शाश्वत विकास- सुरक्षेसाठी तंत्रज्ञान अनिवार्य : कुलगुरू कारभारी काळेराष्ट्रवादीच्या अश्वमेधला भाजपकडूनच ब्रेक, चंद्रकांत पाटलांकडून शरद लाडची उमेदवारी घोषित ! मुश्रीफ समर्थक भैय्या मानेंचे वाढले टेन्शन !!महापालिकेचा ४१९ कोटीचा शहर विकास आराखडा, चाळीस हजार मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षणकेएमटीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी सोमवारी मुंबईत बैठक

जाहिरात

 

लंम्पीस्कीनच्या प्रतिबंधासाठी चेतन नरकेंनी सांगितली पंचसूत्रे

schedule22 Sep 22 person by visibility 624 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : प्रतिबंध हाच लम्पीस्कीनला रोखण्याचा उपाय आहे यासाठी कोरोनाच्या धर्तीवर लम्पीला हाताळण्याची गरज असल्याचे इंडियन डेअरी असोसिएशन आणि गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  लंपीस्किनला प्रतिबंध करण्यासाठी
 नरके यांनी पंचसुत्रीची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले. या पंचसुत्रीमध्ये लम्पिचा प्रसार रोखण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे यासाठी योग्य पद्धतीने वैरण आणि पाणी व्यवस्थापन करणे, रोगाचा प्रसार थांबवणे यासाठी गोठा परिसर स्वच्छ ठेवणे तसेच कोरडा ठेवणे, रोगाच्या प्रसारास प्रमुख कारणीभूत असणाऱ्या डास, गोचीड इतर कीटक यांचे निर्मुलन करणे आवश्यक आहे. तिसरा भाग म्हणजे १०० टक्के लसीकरण करणे आणि यासाठी एका जनावरासाठी एका सुईचा वापर करावे.जनावरामध्ये लक्षणे आढळताच तातडीने जनावराला विलगीकरणात ठेवणे आणि लक्षणे आढळताच आरोग्य यंत्रणेशी तातडीने संपर्क साधून औषधोपचार सुरु करणे. यासोबत प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोरने अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण पातळीवर सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आरोग्य विभाग आणि प्रमुखांची एक स्थानिक समिती स्थापन करून गावातील सर्व गोठ्यातील जनावरे त्यांचे आरोग्य याचे निरीक्षण आणि नोंदी ठेवून हालचालीवर लक्ष ठेवता येईल आणि लक्षणे आढळताच तातडीने मदत उपलब्ध करून देता येईल आणि विलगीकरण करणे गरजेचे.
यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांनी शासकीय स्तरावर केलेल्या उपाययोजना आणि नियोजनाची माहिती दिली. प्रत्येक तालुक्यात दूध संघ आणि शासनाच्या वतीने तालुका आणि विभागवार पथके निर्माण केली आहेत. त्या माध्यमातून पूर्णपणे मोफत लसीकरण, औषधोपचार दूध उत्पादकाच्या गोठ्यापर्यंत थेट पोहोचवण्यासाठी यंत्रणा प्रभावीपणे कार्य करत आहे. मृत जनावरांसाठी तीस हजार रुपयांची शासकीय मदत शासनाच्या वतीने दिली जात आहे. यासाठी लम्पिची लक्षणे दिसताच शासकीय यंत्रणांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes