Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिका अधिकाऱ्यांची कमाल, टाकावूतून टिकाऊ !  भंगारातील आरसी वाहनांचे ट्रकमध्ये रुपांतर ! !शिवकाळातील इतिहासाला वंदन करत सह्याद्री प्रतिष्ठानची पदभ्रमंती मोहीम, वाड्यावस्त्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपकोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी मंत्रालयात सामंजस्य करार, ३५ हजार प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम होणारजिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विनय प्रकाशदिप योजना- सभापती शीतल यादव  इंडिया आघाडीतर्फे शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने, निवेदन स्वीकारण्यास प्रशासनाचा नकारथायलंडमधील कंपन्यांना कोल्हापुरात उद्योग क्षेत्रासाठी गुंतवणुकीस स्वारस्यकेशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेला देण्यासाठी महापालिकेला घाई ! वीस मिनिटाच्या चर्चेअंती ठराव मंजूर ! !बहुमताच्या जोरावर राजोपाध्येनगरमधील सव्वा एकर जागा खासगी संस्थेला, महापालिकेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने ! पाणीपट्टी दरवाढ लांबणीवर ! !सरकारने दडपशाही करण्यापेक्षा आंदोलकांसोबत चर्चा करावी, शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी४१० दूध संस्थांच्या नोटिसावरुन शौमिका महाडिकांचा तत्कालिक संचालकांसह नेतमंडळीवरही निशाणा

जाहिरात

 

कोल्हापुरात छत्रपती ताराराणींचे स्मारक साकारावे

schedule22 Sep 22 person by visibility 912 categoryसामाजिक

 महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर : करवीर संस्थापिका रणरागिनी छत्रपती ताराराणी  यांचा इतिहास प्रकट करणारे स्मारक आणि दालन कोल्हापुरात साकारावे अशी मागणी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानने केली.
 महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान, रण मर्दानी महिला मंच, निर्भया महिला मंच व ताराराणी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत,  येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत यासंदर्भात निर्णय झाला नाही तर आंदोलन करू असा इशाराही प्रशासनाला दिला. जिल्ह्यातील तिन्ही खासदार व आमदार यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. लोकप्रतिनिधींनी सरकारी पातळीवर करवीर संस्थापिका ताराराणी यांचे स्मारक कोल्हापुरात होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे.
  छत्रपती ताराराणी यांच्या काळात पन्हाळ्याला राजधानीचे स्वरूप होते. करवीर संस्थानचा उदय झाला. छत्रपती ताराराणी यांनी वयाच्या २५ व्या वर्षी हाती तलवार घेऊन बलाढ्य औरंगजेबाला झुंज दिली. करवीर संस्थापिका ताराराणी यांचा इतिहास पुढे आला पाहिजे या दृष्टीने स्मारक आणि दालनची उभारणी करावे. पत्रकार परिषदेला समीर काळे, स्वाती काळे, डॉ. रेखा जांभळे, अश्विनी हुल्ले, शाहीन धारवाडकर, वर्षा पाटील, अश्विनी जाधव, ज्योती सावंत, अश्विनी माने, दिशा पाटील, उलफत मुल्ला उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes