Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रतपस्वी आबालाल रेहमान यांना अभिवादनकृष्णराज महाडिकांची महापालिका निवडणुकीतून माघार महापालिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष - वंचित - आप एकत्र ! 21 उमेदवारांची घोषणा, 81 जागा लढणार !! अभ्यासूवृत्तीला समाजकार्याची जोड, लोकांच्या प्रश्नाविषयी तळमळपीआरएसआय कार्यकारी समितीवर विवेक सिद्ध यांची निवडडीवाय पाटील आर्किटेक्चरच्या सिल्व्हर ज्युबिली बॅच विद्यार्थ्यांची महाविद्यालयास भेटप्रजासत्ताक दिन परेड शिबिरासाठी कोल्हापुरातील अकरा एनसीसी विद्यार्थ्यांची निवड शिवाजी विद्यापीठात होणार संत साहित्य संमेलनकृष्णराजनी भरला उमेदवारी अर्ज, महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात !!शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात नैसर्गिक शेती मिशन कार्यक्रम

जाहिरात

 

कोल्हापुरात छत्रपती ताराराणींचे स्मारक साकारावे

schedule22 Sep 22 person by visibility 724 categoryसामाजिक

 महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर : करवीर संस्थापिका रणरागिनी छत्रपती ताराराणी  यांचा इतिहास प्रकट करणारे स्मारक आणि दालन कोल्हापुरात साकारावे अशी मागणी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानने केली.
 महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान, रण मर्दानी महिला मंच, निर्भया महिला मंच व ताराराणी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत,  येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत यासंदर्भात निर्णय झाला नाही तर आंदोलन करू असा इशाराही प्रशासनाला दिला. जिल्ह्यातील तिन्ही खासदार व आमदार यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. लोकप्रतिनिधींनी सरकारी पातळीवर करवीर संस्थापिका ताराराणी यांचे स्मारक कोल्हापुरात होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे.
  छत्रपती ताराराणी यांच्या काळात पन्हाळ्याला राजधानीचे स्वरूप होते. करवीर संस्थानचा उदय झाला. छत्रपती ताराराणी यांनी वयाच्या २५ व्या वर्षी हाती तलवार घेऊन बलाढ्य औरंगजेबाला झुंज दिली. करवीर संस्थापिका ताराराणी यांचा इतिहास पुढे आला पाहिजे या दृष्टीने स्मारक आणि दालनची उभारणी करावे. पत्रकार परिषदेला समीर काळे, स्वाती काळे, डॉ. रेखा जांभळे, अश्विनी हुल्ले, शाहीन धारवाडकर, वर्षा पाटील, अश्विनी जाधव, ज्योती सावंत, अश्विनी माने, दिशा पाटील, उलफत मुल्ला उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes