Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डीवायपी ग्रुपचे ध्येय, जगातील टॉप ५०० विद्यापीठात स्थान ! कोल्हापुरात सर्वात उंच २३ मजली इमारत उभारणार!!गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच डीवाय पाटील विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरी - लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयलपाइपलाइन योजनेवरुन काँग्रेस-भाजपमध्ये वाकयुद्ध, काँग्रेसच्या चर्चेच्या आव्हानाला जयंत पाटलांचे प्रत्युत्तरसेवानिवृत्त सैनिकाचा मेव्हण्यावर गोळीबारअयोध्या फाउंडेशन शिंगणापूरतर्फे मुंबईकडे शिदोरी रवानाआंदोलनासाठी जमलेले मनसेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यातकेआयटीत विशेष इंडक्शनने प्रथम वर्षाला प्रारंभभुयेवाडी-सादळेमादळे रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा, राष्ट्रवादीतर्फे अजित पवारांना निवेदनगोकुळच्या जाजम-घडयाळ खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती, पंधरा दिवसात अहवाल सादर होणारशिये फाटा येथे गोळीबार, संभापूरचा तरुण पोलिसांच्या ताब्यात

जाहिरात

 

तर राहुल पाटील अन् चंद्रदीप नरके हे मित्रही असतील-मंत्री हसन मुश्रीफ

schedule22 Aug 25 person by visibility 214 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  ‘विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन जागा वाढणार आहेतकदाचित मतदार संघाची विभागणी झाली तर राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके हे मित्रही असतील. आपला गट टिकवण्यासाठी सगळ्यांकडूनच अशी वक्तव्ये होत असतात.’अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सारवासारव केली.

दिवंगत आमदार पी. एन पाटील यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील हे आपल्या गटासह २५ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.  या पार्श्वभूमीवर राहुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, करवीरमध्ये आम्ही पीएन गट म्हणूनच लढणार आहोत. चंद्रदीप नरके यांच्याशी विरोध कायम राहील. २०२९ मधील विधानसभेला मी त्यांच्या विरोधात उमेदवार असेन’असे वक्तव्य केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी, मंत्री मुश्रीफांकडे विचारणा केली असता ते बोलत होते.

पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले,‘ राहुल पाटील यासारख्या शक्तीमान माणसांच्या पक्षप्रवेशाने करवीरसह जिल्हयात  राष्ट्रवादी पक्षाची राजकीय ताकद वाढली आहे. संपूर्ण हयातभर कै. पी. एन. पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जीवंत ठेवण्यासाठी इमाने-इतबारे पक्षाची सेवा केली. आता त्यांची मुले भवितव्याचा विचार करून अन्य पक्षात प्रवेश करत आहेत. त्यांना सहकार्य करता येणार नसेल तर अपशकुन करून अडथळा आणू नयेत. त्यांना आशीर्वाद द्यावेत, अशी विनंतीही मंञी मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांना केली१५ आँगस्ट रोजी शेताशिवारात ध्वजारोहण करण्यासाठी आणि खर्डा भाकर खाण्यासाठी सतेज पाटील यांनी नितीन राऊत यांनाही बोलवायला हवे होते, अशीही कोपरखळी मंत्री मुश्रीफ यांनी लगावली.

    गोकुळ दूध संघाच्या जाजम आणि घड्याळ वाटपाच्या आरोपाबद्दल मुश्रीफ म्हणाले, ‘संघाने यापूर्वीच योग्य तो खुलासा केलेला आहे. आम्ही जी- जी आश्वासने दूध उत्पादकांना दिली आहेत, ती पूर्ण केली आहेत. दूध खरेदी दरवाढ दोन रुपये देण्याचे वचन दिले होते. तिथे बारा रुपये दरवाढ दिली. भविष्यात हा दूध संघ फार मोठा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून शहरातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करु. हे काम पावसाळा झाल्यानंतर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु.’

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes