Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
हद्दवाढीच्या विरोधात वीस गावांच्या सरपंचांची वज्रमूठ ! कोल्हापुरात बैठक, आबिटकर-मुश्रीफ-क्षीरसागर यांच्यावर निशाणाफैरी झडू लागल्या, प्रभाग रचनेवरुन काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर आरोपजिल्ह्यासाठी ६५ हजार घरकुले मंजूर, डिसेंबरपर्यंत ५० हजार पूर्ण होणार- सुषमा देसाईपत्नीच्या स्मरणार्थ प्राध्यापकांकडून विद्यापीठातील होस्टेलसाठी पाच लाखाची देणगीराज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची  बैठकवडणगेत विद्यार्थ्यांच्या स्वागताला खासदार, शाळा प्रवेशोत्सव जल्लोषातडॉ. व्ही. एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कारफुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरंबेकरनी दिले खेळाडूंना फुटबॉलचे प्रशिक्षण पंचगंगा हॉस्पिटलला डीपीडीसीतून‌ 25 लाखाचा निधी उपलब्ध करू - ऋतुराज क्षीरसागर खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण- चेअरमन मच्छिंद्र नाळे

जाहिरात

 

हद्दवाढीच्या विरोधात वीस गावांच्या सरपंचांची वज्रमूठ ! कोल्हापुरात बैठक, आबिटकर-मुश्रीफ-क्षीरसागर यांच्यावर निशाणा

schedule19 Jun 25 person by visibility 367 category

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात पुन्हा एकदा संबंधित 20 गावातील सरपंचांनी एकत्र येऊन विरोधाची वज्रमूठ बांधली. कोणत्याही परिस्थितीमध्ये हददवाढ होऊ देणार नाही एक इंचभरही जमीन महापालिका हद्दीत समावेश करू देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हॉटेल पॅव्हेलियन येथे झालेल्या बैठकीला वीस गावातील सरपंच उपसरपंच सदस्यांची उपस्थिती होती. रस्तावर उतरु, कोर्टात जाऊ पण हददवाढ करू देणार नाही असे ठणकावून सांगितले. याप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावरही टीकास्त्र सोडले.
 कोल्हापूर महापालिका हद्दवाढीमधील प्रस्तावित आठ गावे समाविष्ट  न करण्यासाठी हद्दवाढीला विरोध करण्यासाठी  सरपंच उपसरपंचाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत बोलताना हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष व उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले, हद्दवाढीला वीस गावाने विरोध केला आहे. मंत्र्यांना निवेदने दिली आहेत गाव बंद आंदोलन पुकारले. तरीसुद्धा हद्दवाढीचा अट्टाहास कशासाठी ? सरकारचे डोळे उघडत नाहीत का. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हद्दवाढ होऊ देणार नाही. गडमुडशिंगीचे तानाजी पाटील म्हणाले, हद्दवाढीवरून काही मंडळी फूटनितीचा अवलंब करत आहेत. पहिल्यांदा 42 गावासाठी प्राधिकरण स्थापन केले. त्यानंतर वीस गावांचा हद्दवाढीत समावेश करणार  असे म्हणाले. आता आठ गावांची नावे घेतात. आमच्यामध्ये फूट पाडण्याचा हा प्रकार आहे . मात्र आम्ही सगळे एकत्र आहोत. वीस गावे एकत्रितपणे हद्दवाढीला विरोध करतील. हद्दवाढ करायचे असेल तर पहिल्यांदा कोल्हापूर नागरी प्राधिकरण बंद करावे लागणार आहे. मुंबईमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला कोल्हापूर दक्षिण व करवीचे आमदार उपस्थित नव्हते. अनौपचारिक बैठकीत हद्दवाढीच्या प्रक्रिया संबंधित निर्णय कसा होऊ शकतो. आमदार अमल महाडिक व आमदार चंद्रदीप नरके यांनी मतदारसंघातील लोकांची जी भावना आहे तीच आमची भूमिका असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. लोकप्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. असेही पाटील म्हणाले.
 उजवाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे म्हणाले, हददवाढीच्या प्रक्रियेला तत्वतः मान्यता असे जे सांगितले जाते ते खरे नाही. मुंबईतील बैठकीला दक्षिण आणि करवीरचे आमदार उपस्थित नाहीत. कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांना हद्दवाढ कशासाठी पाहिजे आहे. ते शहराचे तीन वेळा आमदार झाले शहराचा किती विकास केला. हद्दवाढीला आमचा विरोध राहील. टोकाचा संघर्ष करायलाही गावे तयार आहेत. गडमुडशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे म्हणाल्या, कोल्हापूर महापालिका शहरवासीयांना मूलभूत सुविधा देऊ शकत नाही. रस्ते, गटर्स पाणी यासाठी सुद्धा नागरिकांना संघर्ष करावा लागतो. मी शिवाजी पेठेतील आहे. शहरातल्या समस्यांची मला माहिती आहे. यापेक्षा ग्रामीण भागात ग्रामपंचायती अधिक सुविधा देतात. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला आमचा विरोध राहील. गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, गोकुळ शिरगावचे चंद्रकांत डावरे,  भाग्यश्री पारखे यांची भाषणे झाली. कोल्हापुरातील आठ ते दहा मंडळी कृती समितीच्या नावाखाली एकत्र येतात आणि हद्दवाढीचे मागणी करतात, शहराचे सध्याची अवस्था बघितली की त्यांनी एकदा स्वतःलाच हद्दवाढ कशासाठी पाहिजे हे विचारावे. ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासात घेतले जात नाही, सरपंच, सदस्य यांच्याशी हद्दवाढीच्या अनुषंगाने बैठक होत नाहीत. परस्पर निर्णय लादला तर तो खपवून घेतला जाणार नाही. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू. पालकमंत्री आबिटकर, मंत्री मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील एक ही गाव हद्दवाढीत नाही, हीच मंडळी हददवाढीसाठी प्रयत्नशील दिसतात. तर आमदार राजेश क्षीरसागर यांना आगामी निवडणूक ठेवून हद्दवाढ केल्याचे श्रेय घ्यायचे आहे. अशी टीकाही यावेळी करण्यात आली.
सरनोबतवाडी येथील किरण अडसूळ यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, कळंबा गावच्या सरपंच सुमन गुरव, बालिंगा सरपंच राखी भवड, नागदेववाडीच्या सरपंच अमृता पवार , वळीवडेच्या सरपंच रूपाली कुसाळे, सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी अडसूळ, नागावच्या सरपंच विमल शिंदे, मोरेवाडीचे सरपंच ए व्ही कांबळे, कंदलगावचे राहुल पाटील, वाडीपीर येथील अनिता खोत, पाडळीचे तानाजी पालकर, आंबेवाडीचे मारुती पाटील, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, संजय शिंदे, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले, वळीवडेचे उपसरपंच वैजनाथ गुरव, बालिंगा येथील मयूर जांभळे, शिवसेनेचे राजू यादव, ज्योतीराम घोडके आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes