जिल्ह्यासाठी ६५ हजार घरकुले मंजूर, डिसेंबरपर्यंत ५० हजार पूर्ण होणार- सुषमा देसाई
schedule19 Jun 25 person by visibility 11 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत डिसेंबर २०२५ पर्यंत ५० हजार घरकुले पूर्ण करावीत अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल्या आहेत. त्यानुसार तालुकास्तरावर सर्वांना सूचना केल्या आहेत. पूर्ण झालेल्या घरकुलांचे २६ जानेवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे उत्कृष्ट घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांचा, उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा व सर्वात जास्त घरकुले पूर्ण करणाऱ्या सरपंच-ग्रामपंचायत अधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येईल असेही देसाई यांनी म्हटले आहे. देसाई यांनी म्हटले आहे, ‘कोल्हापूर जिल्हयासाठी ६५ हजार घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी ५० हजार घरकुले डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या महिन्यात सर्व आवास योजनेतील घरकुल उद्दिष्टानुसार शंभर टक्के मंजुरी दिली जाईल.घरकुले वेळेत पूर्ण करण्यासाठी गावनिहाय पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.जुलै २०२५ मध्ये २०२४-२५ व २०२५-२६ मधील सर्व लाभार्थ्यांना शंभर टक्के पहिला हप्ता देण्यात येणार आहे. ऑगस्टमध्ये घरांना दुसरा हप्ता दिला जाईल.