+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसीएसआरच्या सहा कोटीच्या फंडातून गडमुडशिंगीत उभारणार शाळेची इमारत adjustसंजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार adjustग्राम स्वच्छता अभियानात विभागात करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम adjustराजेश क्षीरसागरांनी घेतले रोजंदारी कर्मचाऱ्याच्या घरी भोजन ! सिद्धार्थनगरमधील काळे कुटुंबीय भावूक !! adjustज्वेलरी सुरक्षेसाठी उच्चतम दर्जाची तिजोरी, सोन्याची शुद्धता तपासणारे मशिन adjustशिवस्वराज्य यात्रा मंगळवारी जिल्ह्यात ! इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये जाहीर सभा !! adjustलोकांच्या भावना इमारतीच्या कणाकणात ! नाट्यगृह पुन्हा दीड वर्षात दिमाखात उभं राहिल !! पालकमंत्री हसन मुश्रीफ adjustसमिधा प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी सज्जनशक्ती जागरण परिषद adjust कोल्हापूर लिंगायत माळी समाजाचा मेळावा, पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात adjustभाजपची विजय संकल्प मोटार रॅली उत्साहात
1001097806
1000995296
schedule14 Oct 24 person by visibility 40 categoryलाइफस्टाइल
र्महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील समिधा प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी, पंधरा ऑक्टोबर २०२४ रोजी कोल्हापूर सज्जनशक्ती जागरण परिषद आयोजित केल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अजित  ठाणेकर यांनी दिली आहे. दैवेज्ञ बोर्डिंग सभागृह येथे सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. 
  गेल्या काही वर्षात कोल्हापूर सर्वार्थाने मागे पडत चालले आहे. नागरी सुविधांचा विकासासोबतच शहरातील तरुणाईची वाढती व्यसनाधीनता, धार्मिक उत्सवातील गैरप्रकार, वाढत चाललेले सामाजिक अध:पतन आणि वाढती गुन्हेगारी हे शहरांमधील दुर्जन शक्तीचा वाढत चाललेला प्रभाव दर्शविते. या सर्व गोष्टींचा सामान्य माणसाला त्रास होत असला तरी त्याविरोधात काही करण्याची त्यांची मानसिकता नसते. त्यामुळे समाजात चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांचे प्राबल्य वाढत चालले आहे. हे प्राबल्य कमी करण्याचा एक प्रयत्न म्हणून कोल्हापूर सज्जनशक्ती जागरण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
 या परिषदेत ह.भ. प. सुहास लिमये ये प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेस दैवज्ञ बोर्डिंगचे माजी अध्यक्ष एकनाथ चोडणकर, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष विकास सांगावाकर, प्रख्यात वैधानिक लेखापाल सतीश डकरे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांत देसाई, उद्योजक अभय देशपांडे आणि डॉ. रामचन्द्र लिमये यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  नागरिकांनी या परिषदेस उपस्थित रहावे असे आवाहन ठाणेकर यांनी केले आहे.