Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
न्याय- बंधुता - समता या त्रिसूत्रीवर काम करणार - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडशिवसेनेतील निष्ठावंताना विविध नियुक्त्या, पदांच्या माध्यमातून न्याय द्यावाश्री स्वामी समर्थांच्या जीवनावर रॅपसाँग, २४ मे रोजी कोल्हापुरात लॉन्चिंग !आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार अवतारनगरीप्रस्तावित आयटी पार्कास छत्रपती ताराराणी यांचे नाव द्या, आमदार क्षीरसागरांची उद्योगमंत्र्यांच्याकडे मागणीप्रशासनाकडून तारीख पे तारीख ! संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम कासवगतीने !! अद्ययावत आयटी पार्कचा कालबद्ध रोडमॅप करा, सरकारकडून जे जे होईल ते सहकार्य करू -पालकमंत्री प्रकाश आबिटकरआयटी असोसिएशनचा अनोखा संकल्प ! तोपर्यंत नो फेटा…नो सत्कार ! !सुनावणीस विलंब, प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक ! सहायक निबंधक कार्यालयावर धडक !!कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रुपांतर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर

जाहिरात

 

गोकुळच्या कार्यक्रमात उलगडले आनंदी तणावमुक्त जीवनचे रहस्य

schedule19 Nov 24 person by visibility 614 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  आपले शरीर चांगले असेल तर मन चांगले राहते आणि मन चांगले असेलतर जीवन तणावमुक्त होऊन आपण आनंदी जीवन जगू शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध आयुर्वेद कन्सल्टंट डॉ. मनिषा भोजकर यांनी केले.

७१ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्ताह अंतर्गत गोकुळतर्फे ‘आनंदी तणावमुक्त जीवन’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी लेखिका भोजकर व गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.  याप्रसंगी भोजकर म्हणाल्या,  जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनात अगणित ताण तणावांस प्रत्येकास सामोरे जावेच लागते. परंतु, त्याची तीव्रता कमी करून जीवन सुसह्य करण्यासाठी येणारे ताणतणाव जाणून घेऊन त्याला सामोरे गेल्यास तसेच योग्य व्यायाम, सात्विक आहार, शांत झोप, मनशांती, उत्तम सूर्यप्रकाश, संगीत, हसणे, निसर्गात वावरणे, समाज्यासाठी जगणे व आई-वडिलांचा चेहरा नेहमी आनंदी ठेवल्यास आपण सर्वजण आनंदमय तणावमुक्त जीवन जगू शकतो

 निता कामत यांनी प्रास्ताविक केले. डॉ.एम.पी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले.मृण्मयी सातवेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी जिल्हा सहकार विकास अधिकारी बी.जी.साळोखे, तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्रा.एस.टी.जाधव, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही.तुरंबेकर, दत्तात्रय वागरे, डॉ.प्रकाश दळवी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, महिला नेतृत्‍व विकास अधिकारी निता कामत, संपदा थोरात उपस्थित होत्‍या.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes