महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर ,: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार म्हणून गेल्या पाच वर्षांमध्ये कोल्हापूर दक्षिण मतदार संघात साडेसातशे कोटींहून अधिक रुपयांची विकास कामे केले आहेत त्यामुळे कोल्हापूर दक्षि मधील जनता पुन्हा एकदा मला आमदार म्हणून निवडून देईल असा विश्वास ही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
महाविकास आघाडी अंतर्गत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पूजा पाटील, पृथ्वीराज पाटील, वृषाली पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, मोहन सालपे, भरत रसाळे आदी उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकाराशी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले," 2019 ते 2024 या कालावधीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केले आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. जनतेच्या अडचणी सोडवल्या. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्याला प्राधान्यक्रम होता. त्यामुळे कोल्हापूर दक्षिण मधील जनता माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवेल याची मला खात्री आहे. महाविकास आघाडी अंतर्गत कोल्हापूर दक्षिण मधून मला उमेदवारी मिळणार याची मला पूर्ण खात्री आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा विकास कामांना प्राधान्य दिले आहे. गेली साडेचार वर्षे विरोधक कुठे होते ? विरोधकांना जनताच उत्तर देईल. आमदार म्हणून काम करताना मतदारसंघातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या, ज्येष्ठ मंडळीसाठीसाठी विरंगुळा केंद्र निर्माण केले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.'पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी नेहरू नगर येथील अब्दुल सत्तार शेख, वसगडे येथील सीी एस पाटील, निगवे खालचा येथील अशोक कांबळे, चिंचवाड येथील चवगौंडा पाटील, मुडशिंगी मधील यशवंत खिलारे , संजय शेळके आदी उपस्थित होते.