Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्त्यावर जनावरे, मालकांना दंड ! महापालिकेकडून राजारामपुरीत कारवाईफुटबॉलपटूची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली, निखिल खाडेचे निधनतात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निकालाची यशस्वी परंपरा कायमआझाद मैदान येथील शिक्षक आंदोलनाला राजकीय नेत्यांचा पाठिंबासतेज मॅथ्समुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढेल – देवश्री पाटीलजिपचा  शिक्षण विभाग राज्यात अव्वल, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर प्रथमस्थानी !हर्षल सुर्वे शिवसेना शिंदे गटात ! राजेश क्षीरसागरांच्या उपस्थितीत प्रवेश !!संजय पवारांचा शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा ! राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी!!कुलगुरुंच्या हाती खडू, विभागात घेतला क्लास ! सेवानिवृत्ती दिनी शिक्षक म्हणून बजावले कर्तव्य !!माणसांच्या दृष्टीने माझ्या इतका दुसरा कोणी श्रीमंत नाही, मी धन्य झालो- भरुन पावलो !

जाहिरात

 

उद्यम सोसायटीत सत्तारुढ पॅनेलचे अकरा उमेदवार विजयी, परिवर्तन पॅनेलला दोन जागा

schedule21 Apr 25 person by visibility 230 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर उद्यम को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत  राजर्षी शाहू जुने सत्तारुढ पॅनेलने अकरा जागा जिंकत वर्चस्व कायम राखले. विरोधी, राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलला दोन जागा मिळाल्या. दहा वर्षानंतर उद्यम सोसायटीची निवडणूक झाली. सत्तारुढ आघाडीचे नेतृत्व माजी आमदार व सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.

उद्यम सोसायटीसाठी रविवारी (२० एप्रिल २०२५) निवडणूक झाली. तेरा जागेसाठी ३४ उमेदवार रिंगणात होते. दरम्यान अनुसूचित जाती – जमाती गटातून राजन सातपुते, सोसायटी मतदारसंघ गटातून अतुल आरवाडे यांचा एकेक अर्ज होता. यामुळे संबंधित गटात सत्तारुढ पॅनेलमधील या दोघांची निवडणूक बिनविरोध झाली होती.

सोसायटीचे एकूण मतदार ५६९ आहेत. त्यापैकी ४२० इतके मतदान झाले. ४०८ मते वैध त १२ मते अवैध ठरली. सायंकाळी सहा वाजता निकाल जाहीर झाला. यामध्ये सत्तारुढ पॅनेलमधील कारखानदार गटातून संजय अंगडी २४३ मते,हिंदुराव कामते २३६, चंद्रकांत चोरगे २४०, अशोक जाधव २२०, संजय थोरवत २२२, आनंद पेंडसे हे २२७ मते घेत विजयी झाली. जयश्री जाधव या महिला राखीव गटात सर्वाधिक २६९ इतक्या मतांनी  विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटात सुधाकर सुतार २३१, विमुक्त जाती-भटक्या जमाती गटात अविनाश कांबळे (२२० मते) विजयी झाले.

परिवर्तन पॅनेलमधून महिला राखीव गटातून संगीता नलवडे या २३४ मते घेत विजयी झाल्या. तर कारखानदार गटातून अमर कारंडे (२१० मते ) विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. पी. खामकर यांनी काम पाहिले. संदीप पाटील, हरी खोत, मिलिंद पाटील यांनी सहकार्य केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes