Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्धव ठाकरे जूनच्या पहिल्या आठवडयात कोल्हापुरात ! निर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करणार !!बाहेरून येणाऱ्यांचे स्वागतच… पण महायुती पूर्वीपासूनच सक्षम: आमदार राजेश क्षीरसागरमहापालिका निवडणुकीसंबंधी भाजपाची पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठकशक्तीपीठ महामार्गविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन, बांदा ते वर्धा निघणार संघर्ष यात्रा !सोमवारी अध्यक्ष बनले, गुरुवारी खत कारखाना सुरू झाला ! बाबासाहेब शिंदेंचे कृतिशील पाऊल !!महापालिकेकडून शहरातील उद्यानांचा खेळखंडोबा ! प्रवेशद्वारासमोर खेळणी रचून आपचे आंदोलन !!नवोदित उद्योजकांसाठी केआयटीची अभिनव संकल्पना, ई-समिटमध्ये ४०० विद्यार्थ्यांचा सहभागडीवाय पाटील कृषी-तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापनाकेआयटी कॉलेजमधील ग्रंथपाल रोहन पवार यांना पीएचडी जाहीरजुनी पेन्शन संघटना करवीर शाखेतर्फे ७५ गुणवंत शिक्षकांचा गौरव

जाहिरात

 

उद्यम सोसायटीत सत्तारुढ पॅनेलचे अकरा उमेदवार विजयी, परिवर्तन पॅनेलला दोन जागा

schedule21 Apr 25 person by visibility 124 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर उद्यम को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत  राजर्षी शाहू जुने सत्तारुढ पॅनेलने अकरा जागा जिंकत वर्चस्व कायम राखले. विरोधी, राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलला दोन जागा मिळाल्या. दहा वर्षानंतर उद्यम सोसायटीची निवडणूक झाली. सत्तारुढ आघाडीचे नेतृत्व माजी आमदार व सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.

उद्यम सोसायटीसाठी रविवारी (२० एप्रिल २०२५) निवडणूक झाली. तेरा जागेसाठी ३४ उमेदवार रिंगणात होते. दरम्यान अनुसूचित जाती – जमाती गटातून राजन सातपुते, सोसायटी मतदारसंघ गटातून अतुल आरवाडे यांचा एकेक अर्ज होता. यामुळे संबंधित गटात सत्तारुढ पॅनेलमधील या दोघांची निवडणूक बिनविरोध झाली होती.

सोसायटीचे एकूण मतदार ५६९ आहेत. त्यापैकी ४२० इतके मतदान झाले. ४०८ मते वैध त १२ मते अवैध ठरली. सायंकाळी सहा वाजता निकाल जाहीर झाला. यामध्ये सत्तारुढ पॅनेलमधील कारखानदार गटातून संजय अंगडी २४३ मते,हिंदुराव कामते २३६, चंद्रकांत चोरगे २४०, अशोक जाधव २२०, संजय थोरवत २२२, आनंद पेंडसे हे २२७ मते घेत विजयी झाली. जयश्री जाधव या महिला राखीव गटात सर्वाधिक २६९ इतक्या मतांनी  विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटात सुधाकर सुतार २३१, विमुक्त जाती-भटक्या जमाती गटात अविनाश कांबळे (२२० मते) विजयी झाले.

परिवर्तन पॅनेलमधून महिला राखीव गटातून संगीता नलवडे या २३४ मते घेत विजयी झाल्या. तर कारखानदार गटातून अमर कारंडे (२१० मते ) विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. पी. खामकर यांनी काम पाहिले. संदीप पाटील, हरी खोत, मिलिंद पाटील यांनी सहकार्य केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes