+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule24 Aug 24 person by visibility 195 categoryआरोग्य
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला प्रतिसाद लाभला. कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी सभागृहात महोत्सव झाले. 
सुमारे 350 महिला शेतकरी व शेतकरी गटांनी रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला. या महोत्सवामध्ये शेवगा, करटुले, रान, कोवळे बांबू, अळू, लाल, केन, पाथरी, मटारु, कपाळफोडी, आघाडा, आंबाडा, व्हनगोती, रान कारली, माठ, भांगीरा, घोळ, कुर्ड, गुणुवली, शेंडवेल, तोंडली इ. रानभाज्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले.
 आमदार सतेज डी. पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजय कुलकर्णी, आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर, सिध्दगिरी कृषि विज्ञान केंद्र, कणेरी गृह विज्ञान शास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा ठोंबरे, करवीर विभागीय कृषि अधिकारी अरुण भिंगारदिवे, कोल्हापूर विभागीय कृषि अधिकारी जयश्री हावळे, करवीर तालुका कृषि अधिकारी बंडा कुंभार यांची उपस्थित होते.
  कृषि विभागामार्फत विविध महोत्सव तसेच नाविण्यपूर्ण संकल्पना शेतकऱ्यांसाठी राबवित आहे, यांचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या वापर आपल्या दैनंदिन आहारात करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते. या भाज्यांचे संवर्धनही करणे गरजेचे असल्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  रानभाज्यांचे नमुने व त्यांची पाककृती स्पर्धेतून निवडलेल्या महिलांचा हस्ते सत्कार करण्यात आला.