Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेला मिळणाऱ्या जीएसटी अनुदानात वाढ कराआयटी पार्कची जागा एमआयडीसीच्या ताब्यात, आमदार राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावाचित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवावी - मेघराज राजेभोसलेकृष्णराज महाडिकांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट, महत्वपूर्ण विषयासंबंधी निवेदन सादरशिक्षक - कर्मचाऱ्यांना पूर्वीचीच वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना  चालू ठेवा सतेज पाटलांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढविणार - हसन मुश्रीफशिवराज्याभिषेकदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ! व्याख्यानमाला, मिरवणुकीचे आयोजन !!अण्णासाहेब पाटील महामंडळला हजार कोटींचा निधी द्या, अन्यथा हलगी बजाव आंदोलनलिंगायत माळी समाजातर्फे तेरा जूनला विद्यार्थी गुणगौरव, पुरस्कार वितरण समारंभ शिक्षकांच्या प्रश्नांची आठ दिवसात सोडवणूक करा, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण

जाहिरात

 

शिवाजी पेठ सोबत असली की लढायला दहा हत्तीचे बळ मिळते-संजय मंडलिक

schedule02 Apr 24 person by visibility 523 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शिवाजी पेठ सोबत असली की लढायला दहा हत्तीचे बळ मिळते. या पेठेत माझे बालपण गेले, अनेक जिवलग सवंगडे मिळाले. येथील बळावर माझा विजय निश्चित आहे. कारण जे शिवाजी पेठेत होते, तेच जिल्ह्यात घडते.’ असा विश्वास महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.
शिवाजी पेठ येथील शिवाजी मंदिर येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मडलिक म्हणाले, ‘खासदार म्हणून शिवाजी पेठेत एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ८० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. रंकाळा आणि गांधी मैदानााच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. ‘
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी थेट पाइपलाइनची अपुरी कामे, शहराची रखडलेली हद्दवाढ, खराब रस्ते या विषयाला काँग्रेसचे तत्कालिन पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप केला. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ४६८ कोटी रुपये देऊन कोल्हापूर टोलमुक्त केले. खासदार मंडलिक यांनी प्रत्येक गावाला निधी दिला. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून दिला. यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. याउलट काँग्रेसकडे स्वतचा उमेदवार नाही. काँग्रेसने शाहू महाराजांना बिनविरोध राज्यभेत का पाठविले नाही ? भाजपने संभाजीराजे यांना राज्यसभा खासदार करुन सन्मान केला होता.’
मेळाव्याला माजी महापौर बाजीराव चव्हाण, माजी नगरसेवक महेश सावंत, उत्तम कोराणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव,तुकाराम इंगवले, अजिंक्य चव्हाण, कुलदीप गायकवाड, सुहास साळोखे, संजय सावंत, गायत्री राऊत, पवित्रा रांगणेकर आदी उपस्थित होते. भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes