Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टीईटी परीक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; अधिका-यांनी घेतले केंद्रसंचालकांचे प्रशिक्षणचार्टर्ड अकाउंटंटस कोल्हापूर शाखेतर्फे दोन जुलैला उत्थान-  एमएसएमई महोत्सवएकाच शाळेला दोन कोटी, इतर शाळांसाठी किती निधी ? शिक्षण विभागाच्या असमान निधी वाटपावरुन स्थायी गाजलीमाजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाची आत्महत्यापुरोगामी शिक्षक -समविचारी संघटनेतर्फे सोमवारी धरणे आंदोलनऑनलाइन संचमान्यतेच्या विरोधात घुमला पाच जिल्ह्यातील शिक्षकांचा आवाज, शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संघटित शक्तीचे दर्शनकोल्हापुरात शुक्रवारी रंगणार प्रिय शिरीष मैफल, विश्वजीत बोरवणकर, पारुल मिश्रांचे सादरीकरणहिल रायडर्सची यंदा अमृतमहोत्सवी पन्हाळा - पावनखिंड पदभ्रमंती मोहीम, चार जुलैला सुरुवातब्राह्मण पुरोहित संघातर्फे पुरस्कार वितरण, विद्यार्थ्यांचा गुणगौरवपुण्यात स्वतंत्र चित्रनगरीसाठी महामंडळ करणार सरकारकडे पाठपुरावा, फेब्रुवारीत मराठी चित्रपट संमेलन

जाहिरात

 

शिवाजी पेठ सोबत असली की लढायला दहा हत्तीचे बळ मिळते-संजय मंडलिक

schedule02 Apr 24 person by visibility 542 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शिवाजी पेठ सोबत असली की लढायला दहा हत्तीचे बळ मिळते. या पेठेत माझे बालपण गेले, अनेक जिवलग सवंगडे मिळाले. येथील बळावर माझा विजय निश्चित आहे. कारण जे शिवाजी पेठेत होते, तेच जिल्ह्यात घडते.’ असा विश्वास महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.
शिवाजी पेठ येथील शिवाजी मंदिर येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मडलिक म्हणाले, ‘खासदार म्हणून शिवाजी पेठेत एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ८० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. रंकाळा आणि गांधी मैदानााच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. ‘
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी थेट पाइपलाइनची अपुरी कामे, शहराची रखडलेली हद्दवाढ, खराब रस्ते या विषयाला काँग्रेसचे तत्कालिन पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप केला. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ४६८ कोटी रुपये देऊन कोल्हापूर टोलमुक्त केले. खासदार मंडलिक यांनी प्रत्येक गावाला निधी दिला. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून दिला. यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. याउलट काँग्रेसकडे स्वतचा उमेदवार नाही. काँग्रेसने शाहू महाराजांना बिनविरोध राज्यभेत का पाठविले नाही ? भाजपने संभाजीराजे यांना राज्यसभा खासदार करुन सन्मान केला होता.’
मेळाव्याला माजी महापौर बाजीराव चव्हाण, माजी नगरसेवक महेश सावंत, उत्तम कोराणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव,तुकाराम इंगवले, अजिंक्य चव्हाण, कुलदीप गायकवाड, सुहास साळोखे, संजय सावंत, गायत्री राऊत, पवित्रा रांगणेकर आदी उपस्थित होते. भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes