Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रशासनाधिकारी डी. सी.कुंभारांना लाच घेताना रंगेहाथ पकडले, पोलिसांची कारवाईजिल्हा नियोजन समितीची पुढील बैठक सदस्यांसोबतच, लवकरच निवडी होणार - पालकमंत्री प्रकाश आबिटकरप्रवेश प्रक्रिया विना डोनेशन पूर्ण करा, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये - आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेतर्फे कर्मचाऱ्यांना २५ टक्क्यांहून अधिक पगारवाढशिवसेना नेहमीच मराठा समाजासोबत, समाजाला न्याय देण्याची भूमिका - मंत्री उदय सामंतविधान परिषदेसाठी भाजपकडून अकरा उमेदवारांची यादी जाहीर जिल्हा परिषदेच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम जिल्हा परिषदेत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरीजयप्रभा स्टुडिओमधून प्रचाराचा शुभारंभ, संग्राम भालकर अपक्ष म्हणून रिंगणात हितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटील

जाहिरात

 

देवकर पाणंद ते कळंबापर्यंतचा मार्ग बनणार आयडियल रोड ! आमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

schedule06 Jan 25 person by visibility 679 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिरपर्यंतचा मार्ग आयडियल रोड बनविण्यात येणार आहे. यासंबंधींचा आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. केवळ डांबरीकरण करता रस्त्याच्या दुतर्फा रुंद फुटपाथ, सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटर्स, नागरिकांना बसण्यासाठी बेंच आणि वृक्षारोपण या पद्धतीने हा रस्ता तयार करण्यासंबंधीच्या सूचना त्यांनी दिल्या.
देवकर पाणंद चौकातून तपोवन मैदान मार्गे कळंब्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. याशिवाय धुळीमुळे परिसरातील नागरिक वैतागले आहेत. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी जोर धरत होती. या मागणीची दखल घेत आमदार  महाडिक यांनी माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर यांच्यासह या रस्त्याची पाहणी केली.

 तपोवन मैदानावर सकाळी आणि संध्याकाळी फिरणाऱ्यांची मोठी गर्दी असते. या लोकांना या रस्त्याचा वापर करता येईल. तसेच वसंत विश्वास पार्क शेजारून आयटीआयकडे जाणारा रस्ताही अशाच पद्धतीने विकसित केला जाईल असेही महाडिक म्हणाले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मोठे आणि महत्त्वाचे रस्ते अशा पद्धतीने विकसित केल्यास नागरिकांची मोठी सोय होईल. लवकरच महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली जाईल असे महाडिक यांनी सांगितले. यावेळी विनय खोपडे, संग्राम पाटील  सुधीर राणे, निलेश निकम, विश्वेश कुलकर्णी, अरुण कोपर्डीकर, अजित साळुंखे, शांतीकुमार शेटे, जालंदर सुतार उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes