Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्धव ठाकरे जूनच्या पहिल्या आठवडयात कोल्हापुरात ! निर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करणार !!बाहेरून येणाऱ्यांचे स्वागतच… पण महायुती पूर्वीपासूनच सक्षम: आमदार राजेश क्षीरसागरमहापालिका निवडणुकीसंबंधी भाजपाची पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठकशक्तीपीठ महामार्गविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन, बांदा ते वर्धा निघणार संघर्ष यात्रा !सोमवारी अध्यक्ष बनले, गुरुवारी खत कारखाना सुरू झाला ! बाबासाहेब शिंदेंचे कृतिशील पाऊल !!महापालिकेकडून शहरातील उद्यानांचा खेळखंडोबा ! प्रवेशद्वारासमोर खेळणी रचून आपचे आंदोलन !!नवोदित उद्योजकांसाठी केआयटीची अभिनव संकल्पना, ई-समिटमध्ये ४०० विद्यार्थ्यांचा सहभागडीवाय पाटील कृषी-तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापनाकेआयटी कॉलेजमधील ग्रंथपाल रोहन पवार यांना पीएचडी जाहीरजुनी पेन्शन संघटना करवीर शाखेतर्फे ७५ गुणवंत शिक्षकांचा गौरव

जाहिरात

 

देवकर पाणंद ते कळंबापर्यंतचा मार्ग बनणार आयडियल रोड ! आमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

schedule06 Jan 25 person by visibility 197 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिरपर्यंतचा मार्ग आयडियल रोड बनविण्यात येणार आहे. यासंबंधींचा आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. केवळ डांबरीकरण करता रस्त्याच्या दुतर्फा रुंद फुटपाथ, सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटर्स, नागरिकांना बसण्यासाठी बेंच आणि वृक्षारोपण या पद्धतीने हा रस्ता तयार करण्यासंबंधीच्या सूचना त्यांनी दिल्या.
देवकर पाणंद चौकातून तपोवन मैदान मार्गे कळंब्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. याशिवाय धुळीमुळे परिसरातील नागरिक वैतागले आहेत. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी जोर धरत होती. या मागणीची दखल घेत आमदार  महाडिक यांनी माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर यांच्यासह या रस्त्याची पाहणी केली.

 तपोवन मैदानावर सकाळी आणि संध्याकाळी फिरणाऱ्यांची मोठी गर्दी असते. या लोकांना या रस्त्याचा वापर करता येईल. तसेच वसंत विश्वास पार्क शेजारून आयटीआयकडे जाणारा रस्ताही अशाच पद्धतीने विकसित केला जाईल असेही महाडिक म्हणाले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मोठे आणि महत्त्वाचे रस्ते अशा पद्धतीने विकसित केल्यास नागरिकांची मोठी सोय होईल. लवकरच महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली जाईल असे महाडिक यांनी सांगितले. यावेळी विनय खोपडे, संग्राम पाटील  सुधीर राणे, निलेश निकम, विश्वेश कुलकर्णी, अरुण कोपर्डीकर, अजित साळुंखे, शांतीकुमार शेटे, जालंदर सुतार उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes