Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अनेक दिवसांचे स्वप्न साकारण्याच्या मार्गावर…आयटी पार्कसाठी शेंडापार्कमध्ये ३४ हेक्टर जागा मंजूरशहीद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे निसर्गदूत पुरस्कार जाहीर, शनिवारी वितरण समारंभअर्जुनवाडा येथे रंगणार सुपर मॉम स्पर्धासंत तुकारामांचे अभंग हे केवळ भक्तीपर नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन – डॉ. जी. पी. माळीशाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहूंचे स्मारक, कापड पर्यटन केंद्रही उभारणारमुश्रीफ –कोरेंच्यामध्ये ऑल इज नॉट वेल…एकेकाळच्या मित्रांत वाढतेय राजकीय अंतर !जिल्ह्यातील नेत्यांमध्ये एकमत होईना, जिप अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टातसरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाविरोधात कोर्टात आव्हान, दोन एप्रिलला सुनावणीदुधाळ जनावरांसाठी पॅरामेट्रिक विमा योजना -  चेअरमन नविद मुश्रीफशिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, अर्थसंकल्पानंतर व्यापक बैठक

जाहिरात

 

देवकर पाणंद ते कळंबापर्यंतचा मार्ग बनणार आयडियल रोड ! आमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

schedule06 Jan 25 person by visibility 614 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिरपर्यंतचा मार्ग आयडियल रोड बनविण्यात येणार आहे. यासंबंधींचा आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. केवळ डांबरीकरण करता रस्त्याच्या दुतर्फा रुंद फुटपाथ, सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटर्स, नागरिकांना बसण्यासाठी बेंच आणि वृक्षारोपण या पद्धतीने हा रस्ता तयार करण्यासंबंधीच्या सूचना त्यांनी दिल्या.
देवकर पाणंद चौकातून तपोवन मैदान मार्गे कळंब्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. याशिवाय धुळीमुळे परिसरातील नागरिक वैतागले आहेत. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी जोर धरत होती. या मागणीची दखल घेत आमदार  महाडिक यांनी माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर यांच्यासह या रस्त्याची पाहणी केली.

 तपोवन मैदानावर सकाळी आणि संध्याकाळी फिरणाऱ्यांची मोठी गर्दी असते. या लोकांना या रस्त्याचा वापर करता येईल. तसेच वसंत विश्वास पार्क शेजारून आयटीआयकडे जाणारा रस्ताही अशाच पद्धतीने विकसित केला जाईल असेही महाडिक म्हणाले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मोठे आणि महत्त्वाचे रस्ते अशा पद्धतीने विकसित केल्यास नागरिकांची मोठी सोय होईल. लवकरच महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली जाईल असे महाडिक यांनी सांगितले. यावेळी विनय खोपडे, संग्राम पाटील  सुधीर राणे, निलेश निकम, विश्वेश कुलकर्णी, अरुण कोपर्डीकर, अजित साळुंखे, शांतीकुमार शेटे, जालंदर सुतार उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes