Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसेकोल्हापुरात तीस एप्रिलपासून एक दिवसआड पाणी पुरवठामहाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर ! वसंत भोसले, महावीर अक्कोळे, निलम माणगावेंचा समावेश ! !रग्गेडियन फिटनेस क्लब - कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी कागदावरच्या बोगस दूध संस्था रद्द करा, अन्यथा त्यांच्याच सात पिढ्या गोकुळवर राज्य करतीलभाजपच महिला आरक्षणाच्या विरोधात, लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता मोर्चोचे सोंग - आमदार विश्वजीत कदमकोल्हापूरच्या विकासाचा बनणार ॲक्शन प्लॅन : मंत्री, आमदारांच्या उपस्थितीमध्ये २८ विषयावर चर्चादूध संस्थांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करा, संस्था प्रतिनिधी धडकले सहायक निबंधक कार्यालयावर

जाहिरात

 

संयमाला मर्यादा,२४ तासात हल्ले थांबवा ! नाही तर मी बेळगावमध्ये जाणार !!

schedule06 Dec 22 person by visibility 835 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी : " सीमाप्रश्नावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे.सीमा वादाला वेगळं वळण दिले जात आहे. येत्या 24 तासात हल्ले थांबवा, नाही तर आमचाही संयम सुटेल. " असा सज्जड दम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिला आहे.
 बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिकेकडून महाराष्ट्राच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा पवार यांनी निषेध केला. " सध्या सीमाभागात जे काही सुरू आहे ते निषेधार्ह आहे. सीमाप्रश्नावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. सीमा वादाला वेगळे वळण दिले जात आहे. येत्या 48 तासांमध्ये हे सगळं संपलं नाही तर मला बेळगावला जावे लागेल. बेळगाव शमधील लोकांना दिलासा देण्यासाठी माझ्यासहित सगळ्यांना तिथे जावे लागेल" असे पवार यांनी ठणकावले.
"केंद्राने बघायची भूमिका घेऊ नये.दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याकडून चिथावणीखोर भाषा केली जात आहे. सीमाभागात हल्ले थांबले नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. संयमला मर्यादा असते. सीमा भागातील परिस्थिती गंभीर आहे. जर काही घडलं तर त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील. माणसा-माणसांमध्ये, भाषिका-भाषिकात कटुता वाढणे हे देशाच्या ऐक्यासाठी घातक आहे."असेही पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes