Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फुटबॉलच्या मैदानातही नगरसेवकच ठरले भारी, अधिकारी संघावर ३-२ गोलफरकांनी विजयबालिंगा पंपिंगवर अवलंबून असणाऱ्या भागांचा सोमवारी पाणीपुरवठा बंदप्राधिकरणला विशेष दर्जा, हद्दवाढ विरोधी कृती समितीतर्फे आमदार चंद्रदीप नरकेंचा सत्कारनेत्यांना हद्दवाढीविषयी देणेघेणे आहे की नाही ? पालकमंत्री, सहपालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : कृती समितीच्या बैठकीत तीव्र भावनासंजय शिंदेंच्या कोल्हापुरातील दीर्घकालीन पदस्थापनेची उच्चस्तरीय चौकशी करावी - प्रकाश बेलवाडेप्राधिकरणाच्या विशेष दर्जाचा हद्दवाढीवर परिणाम नाही, २०२७ च्या जनगणनेनंतर हद्दवाढ अटळच : राजेश क्षीरसागरइंधन बचत हीच राष्ट्रसेवा…शिक्षण समिती सभापती, शिक्षणाधिकाऱ्यांचा बसमधून प्रवासशिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरु कोण ? कुलपती कार्यालयाकडे नजरा राज्यातील पंचवीस बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ! सुनील फुलारींची ठाण्यात बदली, रंजन शर्मा कोल्हापूरचे नवे आयजी!!उष्णतेची तीव्र लाट येऊन मान्सूनमध्ये व्यत्यय येऊ शकतो :  शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी

जाहिरात

 

संयमाला मर्यादा,२४ तासात हल्ले थांबवा ! नाही तर मी बेळगावमध्ये जाणार !!

schedule06 Dec 22 person by visibility 853 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी : " सीमाप्रश्नावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे.सीमा वादाला वेगळं वळण दिले जात आहे. येत्या 24 तासात हल्ले थांबवा, नाही तर आमचाही संयम सुटेल. " असा सज्जड दम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिला आहे.
 बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिकेकडून महाराष्ट्राच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा पवार यांनी निषेध केला. " सध्या सीमाभागात जे काही सुरू आहे ते निषेधार्ह आहे. सीमाप्रश्नावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. सीमा वादाला वेगळे वळण दिले जात आहे. येत्या 48 तासांमध्ये हे सगळं संपलं नाही तर मला बेळगावला जावे लागेल. बेळगाव शमधील लोकांना दिलासा देण्यासाठी माझ्यासहित सगळ्यांना तिथे जावे लागेल" असे पवार यांनी ठणकावले.
"केंद्राने बघायची भूमिका घेऊ नये.दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याकडून चिथावणीखोर भाषा केली जात आहे. सीमाभागात हल्ले थांबले नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. संयमला मर्यादा असते. सीमा भागातील परिस्थिती गंभीर आहे. जर काही घडलं तर त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील. माणसा-माणसांमध्ये, भाषिका-भाषिकात कटुता वाढणे हे देशाच्या ऐक्यासाठी घातक आहे."असेही पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes