Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता -आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज :  शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंतड्रायव्हर सीटवर खासदार, बसमध्ये नगरसेवक ! पीएमईच्या नव्या वाहनातून फेरफटका !!ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे चार ऑगस्टपासून संतांचे संगती निरुपण सोहळा राज्यव्यापी व्यापारी परिषदेला राज्यातून प्रतिनिधी उपस्थित राहणारमहाराष्ट्रातील सामाजिक चळवळीला अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या साहित्‍याने लेखनबळ - संजय कृष्णाजी पाटील केआयटीत जागतिक दर्जाचे डिझाइन सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांसाठी उपलब्धकरुन दाखविलं…केएमटीला मिळतोय नवा चेहरा, सेवेचा परिघ विस्तारणार! रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही कायमची शाश्वती !! २७ कोटीचा घरफाळा थकीत, महापालिकेकडून स्टार बझारची इमारत सील ! सर्कीट बेंचकडून कारवाईला स्थगिती ! !महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ, लक्ष्मीपुरीत साकारले कलापुरीचे कलादालनतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर रंगकर्मी - कलाकारांचा बहिष्कार, दौऱ्यात काळे झेंडे दाखविणार

जाहिरात

 

जलतरण तलाव सरकारी, मात्र निधीचे वावडे का ? कृती समितीची पालकमंत्र्यांना विचारणा

schedule20 Jun 24 person by visibility 671 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा नियोजन समितीला छत्रपती शिवाजी स्टेडियममधील जलतरण तलावातील सुविधा व देखभालीचे वावडे आहे का ? असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती स्विमिंग हब फाउंडेशन कोल्हापूरने केला आहे. 
 पत्रकात म्हटले आहे, “कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय विकास योजनांच्या कोट्यवधी रुपयांच्या घोषणांचा पाऊस पडत आहे, ही बाब स्वागतार्हआहे. कोल्हापुरातील सरकारी स्टेडियम म्हणून शिवाजी स्टेडियम ओळखले जाते.  येथील जलतरण तलावात जलतरणाचा  सराव करुन कित्येक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुले मुली, खेळाडू म्हणून तयार होऊन त्यांनी नावलौकिक उंचावला आहे. असंख्य खेळाडू या ठिकाणी सराव करत असतात. 
नजीकच्या स्टेडियमसाठी दीड दोन कोटी रुपयांचा निधी दुरुस्तीसाठी मिळाला,  पण जलतरण तलावासाठी निधी देता येत नाही म्हणजे  पालकमंत्री व राज्य नियोजन मंडळास या जलतरण तलावाची वावडे आहे काय ?  असा सवालही केला आहे. 
खेळाडू व सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी जलतरण तलावास पालकमंत्री व राज्य नियोजन मंडळांनी या तलावासाठी निधी देऊन सुविधा उपलब्ध कराव्यात असे म्ह्टले आहे. कृती समितीचे रमेश मोरे, अशोक पोवार, उमेश कडोलीकर, समीर चौगुले, अभिजीत कपडेकर, निलेश जाधव, प्रकाश आमते, राजाभाऊ मालेकर, लहुजी शिंदे, महादेवराव जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नावांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes