Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सोलापूरच्या डेप्युटी सीईओ स्मिता पाटील यांची कोल्हापूरला बदलीशंभर टक्के निधीवर सदस्य ठाम, ५० – ५० चा फॉर्म्युला अमान्य ! अध्यक्ष - सीईओंना गुरुवारी पत्र देणार, पदाधिकाऱ्यांची कोंडी ! ! गांधीनगरातील व्यापाऱ्यावर पाच हजारांचा दंड ; १४४ किलो प्लास्टिकचा साठा जप्तमानवकल्याणाचा भाव जागृतीसाठी विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज - डॉ. भूषण पटवर्धन महसूलमंत्र्यांच्या सोबत क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक !  सातबारा – रेडीरेकनर - प्रॉपर्टी कार्डसंदर्भात सकारात्मक चर्चा ! !कंगना राणावतांच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक, हाती घेतले चप्पलगोकुळचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करा : सर्किट बेंचचा आदेशसत्यशोधक इतिहास परिषदेतर्फे रविवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनसाहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात यावे : डॉ. सुनीलकुमार लवटे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेतर्फे दिवंगत सभासदाच्या वारसांना अर्थसहाय्य

जाहिरात

 

जलतरण तलाव सरकारी, मात्र निधीचे वावडे का ? कृती समितीची पालकमंत्र्यांना विचारणा

schedule20 Jun 24 person by visibility 667 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा नियोजन समितीला छत्रपती शिवाजी स्टेडियममधील जलतरण तलावातील सुविधा व देखभालीचे वावडे आहे का ? असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती स्विमिंग हब फाउंडेशन कोल्हापूरने केला आहे. 
 पत्रकात म्हटले आहे, “कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय विकास योजनांच्या कोट्यवधी रुपयांच्या घोषणांचा पाऊस पडत आहे, ही बाब स्वागतार्हआहे. कोल्हापुरातील सरकारी स्टेडियम म्हणून शिवाजी स्टेडियम ओळखले जाते.  येथील जलतरण तलावात जलतरणाचा  सराव करुन कित्येक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुले मुली, खेळाडू म्हणून तयार होऊन त्यांनी नावलौकिक उंचावला आहे. असंख्य खेळाडू या ठिकाणी सराव करत असतात. 
नजीकच्या स्टेडियमसाठी दीड दोन कोटी रुपयांचा निधी दुरुस्तीसाठी मिळाला,  पण जलतरण तलावासाठी निधी देता येत नाही म्हणजे  पालकमंत्री व राज्य नियोजन मंडळास या जलतरण तलावाची वावडे आहे काय ?  असा सवालही केला आहे. 
खेळाडू व सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी जलतरण तलावास पालकमंत्री व राज्य नियोजन मंडळांनी या तलावासाठी निधी देऊन सुविधा उपलब्ध कराव्यात असे म्ह्टले आहे. कृती समितीचे रमेश मोरे, अशोक पोवार, उमेश कडोलीकर, समीर चौगुले, अभिजीत कपडेकर, निलेश जाधव, प्रकाश आमते, राजाभाऊ मालेकर, लहुजी शिंदे, महादेवराव जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नावांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes