Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विद्यार्थीप्रिय शिक्षक ! उत्तम वाचक - वक्ते अन् प्रगतशील शेतकरीही !!बाजार समिती एक सचिव दोन, शासकीय सचिव नियुक्तीविरोधात वळंजूची तक्रारबाजार समिती सभापती नानासो कांबळे यांचा कार्यालयीन प्रवेशसमूह विद्यापीठांनी मानांकन उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे: कुलपती जिष्णू देव वर्मागोकुळमध्ये शह-काटशहाचे राजकारण! आमदारांची तक्रार, दोन दिवसात सहाय्यक निबंधकांची बदली शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा वगळून जनगणना प्रशिक्षण आयोजित करा - भरत रसाळेगोकुळमधील वाद चिघळला : प्रकाश बेलवडे यांच्या विरोधात घोषणा, दूध संस्था प्रतिनिधींचा सहाय्यक निबंधक कार्यालयावर मोर्चासंयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळतर्फे शिवजयंती महोत्सववेताळमाळ तालीम मंडळ ठरला सतेज चषकाचा मानकरी ! दिलबहार तालीम मंडळाला उपविजेतेपद !!विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रेंचा कार्यालयीन प्रवेश धुमधडाक्यात

जाहिरात

 

कसबा वाळवे येथील दारू दुकान परवाना निलंबित करा

schedule20 Jun 24 person by visibility 533 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील देशी दारू दुकान परवाना निलंबित करा, अशी मागणी दिलीप इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केली. परवाना देताना प्रशासनाने संगणमत केल्याचा आरोप यांनी केला. राधानगरी तालुक्यातील येथील देशी दारू दुकान संजय मारुती इंगवले यांनी खोटी कागदपत्रे तयार करून दारू दुकानांचे लायसन हडप केले आहे. इंगवले यांच्यावर राधानगरी पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे .तरीही राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी इंगवले यांच्या पाठीशी राहतात असा आरोप दिलीप इंगवले यांनी केला. कसबा वाळवे येथील देशी दारू दुकान रामचंद्र कृष्णाजी इंगवले यांच्या नावे होते. रामचंद्र यांचा मुलगा संजय इंगवले हा चुलते मारुती कृष्णाजी इंगवले यांना दत्तक गेला आहे. तरीही संजय इंगवले यांनी रामचंद्र इंगवले यांचा मुलगा असलेला भासवून त्यांचाच वारस असल्याची कागदपत्रे तयार करून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कागदपत्रे सादर केली आहेत .संजय इंगवले यांचा खोटा दस्तावेज असतानाही राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून संजय इंगवले यांच्या परवान्यावर स्वाक्षरी दिली आहे, असा आरोपी त्यांनी केला. परवाना देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजपत्रांमधील टंकलिखित मजकुराखाली काही मजकूर हस्तलिखित साध्या पेनाने लिहून हे राजपत्र राज्यपालांच्या आदेशाने असल्याचे भासवलेले आहे. त्यामुळे सरकारची फसवणूक झाली असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी ही त्यांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes