Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा  स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स, शाळेत उभारले अद्ययावत स्वच्छतागृहेडीवाय  पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या दहा  विद्यार्थ्यांची क्यू-स्पायडर्स निवडशिक्षक बँकेचा सभासद हिताचा निर्णय ! कर्जाचा व्याजदर नऊ टक्के !!भाजप जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला, इच्छुकांच्या मुलाखतीला प्रारंभअंगारकी संकष्टीला लालपरीची भक्तिमय धाव, कोल्हापूर विभागातर्फे विशेष बस सेवाकोल्हापूरच्या समाजकारण - राजकारणातील आश्वासक चेहराशिक्षण समितीचा डिजीटल प्रयोग : एका तासात स्कॉलरशिप निकाल पालकांच्या मोबाईलवरपिंड कार्यकर्त्याचा, वृत्ती साऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याचीकोल्हापूर महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची इसरोकडे झेप विमान प्रवासासह अभ्यास सहलीचे आयोजनतीन पिढयांचे समाजकारण, लोकांच्यासोबत जुळलेली नाळ कायम

जाहिरात

 

कसबा वाळवे येथील दारू दुकान परवाना निलंबित करा

schedule20 Jun 24 person by visibility 442 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील देशी दारू दुकान परवाना निलंबित करा, अशी मागणी दिलीप इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केली. परवाना देताना प्रशासनाने संगणमत केल्याचा आरोप यांनी केला. राधानगरी तालुक्यातील येथील देशी दारू दुकान संजय मारुती इंगवले यांनी खोटी कागदपत्रे तयार करून दारू दुकानांचे लायसन हडप केले आहे. इंगवले यांच्यावर राधानगरी पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे .तरीही राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी इंगवले यांच्या पाठीशी राहतात असा आरोप दिलीप इंगवले यांनी केला. कसबा वाळवे येथील देशी दारू दुकान रामचंद्र कृष्णाजी इंगवले यांच्या नावे होते. रामचंद्र यांचा मुलगा संजय इंगवले हा चुलते मारुती कृष्णाजी इंगवले यांना दत्तक गेला आहे. तरीही संजय इंगवले यांनी रामचंद्र इंगवले यांचा मुलगा असलेला भासवून त्यांचाच वारस असल्याची कागदपत्रे तयार करून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कागदपत्रे सादर केली आहेत .संजय इंगवले यांचा खोटा दस्तावेज असतानाही राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून संजय इंगवले यांच्या परवान्यावर स्वाक्षरी दिली आहे, असा आरोपी त्यांनी केला. परवाना देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजपत्रांमधील टंकलिखित मजकुराखाली काही मजकूर हस्तलिखित साध्या पेनाने लिहून हे राजपत्र राज्यपालांच्या आदेशाने असल्याचे भासवलेले आहे. त्यामुळे सरकारची फसवणूक झाली असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी ही त्यांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes