Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
 अभियंता तरुण पिढीने उद्योजकीय मानसिकता बाळगावी - दीपक जोशी२१ लिटर दुधाची म्हैस, ३५ लिटर दुधाची गाय ठरली गोकुळश्रीकोल्हापुरात गव्हर्मेंट लॉ कॉलेज सुरू करा-: अमल महाडिकांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीएनएमएमएस परीक्षा 28 डिसेंबरलासीपीआरमधील वैद्यकीय बिलांच्या चौकशीसाठी समिती, पालकमंत्र्यांचे आदेशाने समिती स्थापन रहिवासाचा कोणताही पुरावा ग्राह्य धरा : माजी नगरसेवकांची आयुक्तांच्याकडे मागणी महापालिकेची अंतिम मतदार यादी पुन्हा लांबणीवर, 15 डिसेंबरला यादी जाहीर होणार खाबुगिरीची सेवा, सीपीआरमधील मॅडम, सरांच्या नावावर लाखोची आकडेमोड! वैद्यकीय बिल मंजुरीत डल्ला !!ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचे धरणे आंदोलन, संचमान्यतेतील त्रुटी दूर कराशिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांची कोल्हापुरात बदली

जाहिरात

 

कोल्हापुरात धक्कादायक घटना, मुलाने केला आईचा खून

schedule15 Oct 25 person by visibility 721 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातीर राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क भारतनगर येथे मुलाने आईच्या डोक्यात वरंवटा घालून खून केला. बुधवारी (१५ ऑक्टोबर २०२५) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. दारुला पैसे देत नसल्याच्या रागातून हा खून करण्यात आल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे. सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पोलिसांनी, विजय अरुण निकम (वय३५ वर्षे) याला या गुन्हयाप्रकरणी अटक केली आहे. राजारामपुरी पोलिसांनी, विजयला घरातूनच अटक केली. सावित्रीबाई आणि मुलगा विजय हे दोघे भारतनगर येथे राहत होते.  विजय हा सेट्रिंगची व डिजीटल फलक लावण्याची काम करतो. त्याला दारुचे व्यसन आहे. त्याची पत्नी आणि दोन मुली विजापूर येथे माहेरी आहेत. विजयने बुधवारी सकाळी दारुच्या नशेत आईकडे पैसे मागितले. पैसे देण्यास आईने नकार दिला. पैसे दिले नाहीत या रागातून त्याने वरंवटा आईच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात सावित्रीबाई या जाग्यावरच ठार झाल्या. विजयने फोन करुन बहिणीला आईचा खून केल्याचे सांगितले. शेजाऱ्यानांही हा प्रकार कळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes