Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
तुटलेली दोरी पुन्हा बांधता येते, मुश्रीफ यांच्या विधानावर सतेज पाटलांचे मिश्किल उत्तर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त संविधान दौड, 1200 स्पर्धकांचा सहभाग राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 67 जणांनी मागितली उमेदवारी, 39 इच्छुकांच्या मुलाखती मुरगूडमध्ये मंडलिकच, कागल मुश्रीफ-समरजितचे, पन्हाळयाचा गड कोरेंचा, जयसिंगपुरात यड्रावकरच ! गडहिंग्लजमध्ये कोरे पराभूत, शिरोळमध्ये अशोक मानेंना झटका ! !शिवसेनेकडे उमेदवारांची तगडी फौज ! राष्ट्रवादीतही वाजतगाजत मुलाखती ! !भाषणबाजीत हरवला सिनेटमधील प्रश्नोत्तराचा तास ! मूळ विषयापेक्षा अवांतर चर्चा जास्त ! !सिनेट सदस्यांची विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनेमहायुतीचा फॉर्म्युला ठरला ? २९ डिंसेबरपर्यंत उमेदवारांची घोषणा ! निवडणूक कामासाठी गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारीसरोज पाटील यांना रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार, २५ डिसेंबरला गडहिंग्लज येथे वितरण

जाहिरात

 

रेशन बचावसाठी शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

schedule20 Sep 22 person by visibility 851 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
“रेशन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, शिवसेना झिंदाबाद, रेशनवर गहू तांदूळ मिळालेच पाहिजे”अशा घोषणा देत रेशन बचावसाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.जिल्हाधिकरी राहुल रेखावार यांना मागण्यांचे निवेदन दिले. कार्यकर्त्यांनी मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या.
केंद्र व राज्य सरकारकडून ग्राहकांना स्वेच्छेने अन्नधान्य योजनेतून बाहेर पडण्याची सक्ती केली जात आहे. याला विरोध करण्यासाठी शिवसेनेतर्फे मंगळवारी (ता.२० सप्टेंबर) मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चात रेशनकार्डधारकासह महिलांचा मोठा सहभाग होता. दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, समन्वयक हर्षल सुर्वे आदी पदाधिकारी मोर्चाच्या अग्रभागी होते. ‘रेशनचा अधिकार कायम करा, रेशनसाठी उत्पन्नाची किमान मर्यादा दोन लाख रुपये करा, रेशनवर तेल, डाळ आणि साखर मिळाले पाहिजे, उत्पन्नावर आधारित रेशनकार्ड बंद करू नका, गॅस सिलिंडरची किंमत ५०० रुपये करा, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करा’ अशा विविध मागण्या करण्यात आल्या. व्हिनस कॉर्नर, बसंत बहार रोड, ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी मोर्चा मार्ग दणाणला.
मोर्चामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील, तानाजी आंग्रे, कागल तालुका प्रमुख संभाजी भोकरे, करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील, राजू यादव, माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, प्रतिज्ञा उत्तुरे, राजू जाधव, अवधूत साळोखे, धनाजी दळवी, दीपक गौड, अनिल पाटील, कमलाकार जगदाळे, विशाल देवकुळे, सुशिल भादिंगरे, पोपट दांगट, महेश उत्तुरे, राहुल माळी, मंजित माने आदींचा सहभाग होता.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes