Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
यंदा शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी : नगरसेवक ऋतुराज क्षीरसागरगोखले कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विजेत्यांना बक्षीस प्रदानप्राचार्य डॉ. धनाजी कणसे, डॉ. आर. आर. कुंभार, प्रा. अरुण पाटील, प्रा. गजानन माळी यांना राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कारनगरसेवक हमरीतुमरीवर, प्रशासनाचा मोठा निर्णय ! महापालिकेची गुरुवारची सर्वसाधारण सभा होणार पोलिस बंदोबस्तात ! !ज्ञानपीठ विजेते लेखक वि.स. खांडेकर हे मानवी जीवनाचे भाष्यकार, त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढे - डाॅ. भालचंद्र मुणगेकरखाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहिणी येडगे, व्हाइस चेअरमनपदी चेअरमनपदी शिवाजी सोनाळकर कोल्हापुरात मंत्र्यांच्या समर्थकांची अधिकाऱ्यांवर दमबाजी ! कार्यालय पेटवण्याची, बुटाने मारण्याची धमकी ! !डी वाय पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकारकार्यालयात नगरसेवकांची भांडणे, चौकात कार्यकर्ते आमनेसामने! महापालिकेचा बनतोय आखाडा, पदाधिकारी म्हणतात हा कौटुंबिक वाद !!आयुक्तांच्या कार्यालयातच शारंगधर देशमुख - आदिल फरास एकमेकांना भिडले !  चौकात कार्यकर्ते जमले, पोलिसांचा हस्तक्षेप- नेत्यांची फोनाफोनी!!

जाहिरात

 

यंदा शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी : नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर

schedule03 Sep 26 person by visibility 15 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर  यांच्या माध्यामातुन कोल्हापूरच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने  कोल्हापुरातील विकासकामांसाठी गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. यामाध्यमातून आमदार  क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नांनी शहरात विकासकामांचे अनेक नवे थर रचले जात आहेत आणि या माध्यमातून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचा आलेख उंचावला आहे. यामध्ये प्रामुख्याने पूर नियंत्रण प्रकल्प, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, रस्ते, रंकाळा सुशोभिकरण, गांधी मैदानाचे काम, केशवराव भोसले नाट्यगृह नुतनीकरण या प्रमुख विकासकामांसह सर्किट बेंच, आय.टी.पार्क, महापालिकेतील रोजंदारी कर्मचारी कायम करणे अशा कामांमुळे कोल्हापूर नव्या रुपात परिवर्तीत होताना दिसत आहे. आगामी काळातही असेच कोल्हापूरच्या विकासाचे थर रचण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, यंदा शिवसेनेच्या वतीने “विकासाच्या भगव्या दहीहंडी” चे ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून छत्रपती शिवाजी चौक, कोल्हापूर येथे थरार रंगणार असल्याची माहिती युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव व नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यावर्षी दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपये इतके बक्षीस देण्यात येणार आहे. इतर आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. तरी या दहीहंडी स्पर्धेत जास्तीत जास्त गोंविंदा पथकांनी सहभाग घ्यावा आणि कोल्हापूर वासियांनी या दहीहंडीचा थरार पाहण्यास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहनही नगरसेवक क्षीरसागर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes