Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळतर्फे ४० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कारकोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. संजय डिक्रूज, उपाध्यक्षपदी अॅड. नेताजी पाटील जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या ! मनिषा देसाई, अरुण जाधवांचा समावेश !!अभिषेक बोंद्रे, संताजी घोरपडे, प्रसाद जाधवांचा भाजपात प्रवेशदिलीप पोवार, उत्तम कोराणेसह 55 जण भाजपमध्ये, मुंबईत प्रवेशाचा धमाका ! मुश्रीफांना धक्का!गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या अध्यक्षपदी रोहित बांदिवडेकर, उपाध्यक्षपदी सदानंद घाटगेबदलीस पात्र शिक्षकांना पर्याय निवडण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत अर्जाची मुदतऑक्टोबरमध्ये झेडपी, नोव्हेंबरमध्ये नगरपालिका ! डिसेंबरमध्ये महापालिका निवडणुकीची शक्यता !!नगररचना कार्यालयात  जनसुनावणी ! ढिम्म अधिकारी, आंदोलकांकडून दगड पूजण्याचा प्रकार!!स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आप उतरणार

जाहिरात

 

कोल्हापुरात घडलेला, पुरस्कारांनी गौरविलेला गाभ झळकला सिनेमागृहात

schedule21 Jun 24 person by visibility 465 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माध्यम कोणतेही असो हटके कलाकृती तयार करायची अशी खासियत असलेला तरुण दिग्दर्शक अनुप जत्राटकर आणि नव्या दमाचा निर्माचा मंगेश नारायण गोटुरे यांनी वेगळया विषयावर गाभ हा सिनेमा तयार केला आहे. या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ही कलाकृती कोल्हापुरच्या मातीत तयार झाली आहे. निर्माता, दिग्दर्शक, बहुतांश कलाकार, तंत्रज्ञ आणि बहुतांश शूटिंग जिल्हा परिसरात झाले आहे. प्रदर्शनापूर्वीच वेगवेगळया चित्रपट महोत्सवात गाभ हा सिनेमा गौरविला. समीक्षकांनीही तो नावाजला आहे. २१ जून २०२४ पासून हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
निखळ मनोरंजनासोबतच सामाजिक भान जपणारा हा सिनेमा आहे. माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा हे सिनेमाचं सूत्र आहे. या सिनेमात अभिनेता कैलास वाघमारे व सायली बांदेकर ही फ्रेश जोडी पडद्यावर झळकणार आहे. या दोघासोबत विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत.
सिनेमात दोन गाणी आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले आहे. छायातचित्रण वीरधवल पाटील यांनी तर संकलन रवींद्र चांदेकर यांनी केले आहे. चंद्रशेखर जनवाडे यांची गीते आहेत. रवींद्र चांदेकर यांचे पार्श्वसंगीत आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांनी गाणी स्वरबद्ध केली आहेत. विविध महोत्सवात मिळून या सिनेमाने २७ पुरस्कार मिळवले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes