Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरसाठी हवे विशेष पॅकेज, राजेश क्षीरसागरांची अमित शहांच्याकडे मागणीजिल्ह्यात एक लाखाहून अधिक एकल महिला, त्यांच्या सक्षमीकरणाला जिपकडून प्राधान्य – सीईओ डॉ. जॅसमिनश्री आंनदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या डिप्लोमा विभागाचा निकाल 93 टक्केगांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर जेसीबी, बांधकामे पाडण्यास सुरुवात कोल्हापूर फर्स्टतर्फे गृहमंत्र्यांना निवेदन, ईएसआय मेडिकल कॉलेजची मागणीशाहू महाराज हे बहुजन विचारांचे नायक! विषमतावादी विचारांचे कर्दनकाळ ! !गांधीनगर परिसरातील अनाधिकृत बांधकामावर उद्यापासून कारवाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची  शंभर टक्के निकालाची परंपरा कायमब्राह्मण सभा करवीरतर्फे ग्रंथदिंडी, ४० वारकरी बालचमूंचा सहभागरोटरी सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण शेंडगे, सचिवपदी अविनाश चिकनीस

जाहिरात

 

विवेकानंदमध्ये बारावीतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

schedule21 May 24 person by visibility 1061 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : बारावी परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा विवेकानंद कॉलेजमध्ये  सत्कार करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते कला, वाणिज्य् व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सेक्रेटरी  प्राचार्या शुभांगी गावडे व मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले.
विज्ञान शाखेत उस्ताद अल्तमाश मुश्ताक 95.00 टक्के  गुण मिळवून प्रथम आला. माने ओम रमेश 94.83 टक्के गुणांसह व्दितीय तर  राम अर्चनाकुमारी दरोगा हिने 92.33 टक्के गुण मिळवून तिसरी येण्याचा मान मिळविला. 
वाणिज्य शाखेत शेवरमनी खुशी प्रेम 95.33 गुण मिळवून प्रथम, पाटील शुभम प्रबोध 93.83 गुण मिळवून व्दितीय आणि गोंधळी वैभवी अनिल 93.00 टक्के गुण संपादन करुन तिसरी आली.
 कला शाखेत लवटे विवेक कृष्णात 90.83 गुण मिळवून प्रथम , कु. पाटील श्रावणी नंदकुमार, 88.67 गुण संपादन व्दितीय, तर नदाफ नाझिया राकेश 87.67 टक्के गुण मिळवले.
कला शाखेचा निकाल 86.34 , वाणिज्य शाखेचा 98.53 टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल 99.88 टक्के इतका लागला. सरासरी निकाल 97.63 टक्के इतका लागला आहे. विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांनी मार्गदर्शन केले.
 प्रा..एम.ए.कुरणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सौ यु.आर.हिरकुडे यांनी स्वागत मानले.  प्रा.विश्वंभर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes