Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्राथमिक दूध संस्थांच्या न्यायासाठी गोकुळच्या संचालकांनी ठोकला शडडूजिल्हा परिषदेची सत्ता लाडक्या बहिणींच्या हाती ! सहापैकी पाच पदावर महिला !!-शिक्षक पात्रता परीक्षा एकवीस जूनला, आवेदनपत्र भरण्याची मुदत सोळा एप्रिलपर्यंतआयटी. पार्कच्या जागा हस्तांतरणाचा मार्ग सुकर, औद्योगिक विकास महामंडळाने भरले ५ कोटी ६० लाखनिलंबित कर्मचाऱ्यांच्यावर लाखो रुपयांचा खर्च, महापालिका त्यांना फुकट का पोसते ? नगरसेवकांचा सभागृहाला सवालजिप समिती सभापतिपदासाठी नावे घोषित ! सारिका नांदेकर, शीतल यादव विद्या पाटील, श्रद्धा गायकवाड !!पाटाकडील तालीम मंडळाने जिंकली चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा ! खंडोबा तालीम मंडळ उपविजेता !!कोल्हापूर-नवी मुंबई ! इंडिगो एअरलाईन्सची दिवसातून दोन वेळा विमान सेवा !!निरोगी आरोग्यासाठी होमिओपॅथीसुध्दा सक्षम पर्याय - डॉ. धर्मेंद्र शर्मा संचालक म्हणून आम्ही प्राथमिक दूध संस्थांच्या पाठीशी, अदृश्य शक्तीचा डाव उधळून लावू- नविद मुश्रीफ

जाहिरात

 

विवेकानंदमध्ये बारावीतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

schedule21 May 24 person by visibility 962 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : बारावी परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा विवेकानंद कॉलेजमध्ये  सत्कार करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते कला, वाणिज्य् व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सेक्रेटरी  प्राचार्या शुभांगी गावडे व मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले.
विज्ञान शाखेत उस्ताद अल्तमाश मुश्ताक 95.00 टक्के  गुण मिळवून प्रथम आला. माने ओम रमेश 94.83 टक्के गुणांसह व्दितीय तर  राम अर्चनाकुमारी दरोगा हिने 92.33 टक्के गुण मिळवून तिसरी येण्याचा मान मिळविला. 
वाणिज्य शाखेत शेवरमनी खुशी प्रेम 95.33 गुण मिळवून प्रथम, पाटील शुभम प्रबोध 93.83 गुण मिळवून व्दितीय आणि गोंधळी वैभवी अनिल 93.00 टक्के गुण संपादन करुन तिसरी आली.
 कला शाखेत लवटे विवेक कृष्णात 90.83 गुण मिळवून प्रथम , कु. पाटील श्रावणी नंदकुमार, 88.67 गुण संपादन व्दितीय, तर नदाफ नाझिया राकेश 87.67 टक्के गुण मिळवले.
कला शाखेचा निकाल 86.34 , वाणिज्य शाखेचा 98.53 टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल 99.88 टक्के इतका लागला. सरासरी निकाल 97.63 टक्के इतका लागला आहे. विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांनी मार्गदर्शन केले.
 प्रा..एम.ए.कुरणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सौ यु.आर.हिरकुडे यांनी स्वागत मानले.  प्रा.विश्वंभर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes