Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसाठी मुख्यमंत्री सांगतील तसे महायुतीचे पॅनेल – मंत्री हसन मुश्रीफपदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता - गैरप्रकारची चौकशी होणार - मंत्री हसन मुश्रीफजिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग हा जिल्ह्याचा आत्मा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर महापालिकेतील समित्यांच्या सभापती उपसभापती निवडीतही रंगले नाट्य ! समान मतामुळे क्रीडा समिती पदाधिकारी निकाल चिठ्ठीद्वारे ! !उपाध्यक्षांनी पॉवर टिलर चालवत केली चिखलणी, शेतकऱ्यांसोबत लुटला झुणका भाकरीचा आस्वाददूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशास मुदतवाढएक दिवस बळीराजासाठी, पालकमंत्र्यांनी केली भात रोप लावण ! वृक्षारोपणाचा  कृतिशील धडा, बोरपाडळेतील खडके अॅकेडमीचा पर्यावरणवादी उपक्रमप्राचार्य व्ही. एम. पाटील यांचा जीवनप्रवास म्हणजे संघर्षातून घडलेला यशाचा दीपस्तंभकोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान चार वर्षात उभारणार, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मैदानाचा करार

जाहिरात

 

विवेकानंदमध्ये बारावीतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

schedule21 May 24 person by visibility 1088 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : बारावी परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा विवेकानंद कॉलेजमध्ये  सत्कार करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते कला, वाणिज्य् व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सेक्रेटरी  प्राचार्या शुभांगी गावडे व मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले.
विज्ञान शाखेत उस्ताद अल्तमाश मुश्ताक 95.00 टक्के  गुण मिळवून प्रथम आला. माने ओम रमेश 94.83 टक्के गुणांसह व्दितीय तर  राम अर्चनाकुमारी दरोगा हिने 92.33 टक्के गुण मिळवून तिसरी येण्याचा मान मिळविला. 
वाणिज्य शाखेत शेवरमनी खुशी प्रेम 95.33 गुण मिळवून प्रथम, पाटील शुभम प्रबोध 93.83 गुण मिळवून व्दितीय आणि गोंधळी वैभवी अनिल 93.00 टक्के गुण संपादन करुन तिसरी आली.
 कला शाखेत लवटे विवेक कृष्णात 90.83 गुण मिळवून प्रथम , कु. पाटील श्रावणी नंदकुमार, 88.67 गुण संपादन व्दितीय, तर नदाफ नाझिया राकेश 87.67 टक्के गुण मिळवले.
कला शाखेचा निकाल 86.34 , वाणिज्य शाखेचा 98.53 टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल 99.88 टक्के इतका लागला. सरासरी निकाल 97.63 टक्के इतका लागला आहे. विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांनी मार्गदर्शन केले.
 प्रा..एम.ए.कुरणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सौ यु.आर.हिरकुडे यांनी स्वागत मानले.  प्रा.विश्वंभर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes