+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआजरीज इको व्हॅलीचे उद्घाटन समारंभ उत्साहात adjustखस्ता मातीशी नाळ जोडणाऱ्या ग्रामीण जीवनाचा ठाव घेणारी कादंबरी adjustआसगावकर यांच्या फंडातून वसतीगृह, निवासी शाळांना प्रिंटर वाटप adjustशिवसेना ठाकरे गटातर्फे शुक्रवारी महापालिकेवर धडक आंदोलन adjustहसन मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखेंचा पुढाकार adjustआमचं ठरलंयला उत्तर सभासदांनी ठरवलंयनी ! राजारामच्या आखाड्यात महाडिक –पाटलांचे शड्डू लागले घुमू !! adjustआमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा बुधवारपासून : सत्यजित जाधव adjustगावकऱ्यांनी गिरवले अर्थकारणाचे धडे : घोडावत विद्यापीठाचा 'अर्थ प्रबोधन' कार्यक्रम adjustशिवाजी विद्यापीठाला भुयारी मार्गासाठी आठ कोटी ४८ लाखाचा निधी मंजूर adjustदिलबहार पराभूत, झुंजार क्लब प्रथमच उपांत्य फेरीत
Screenshot_20230226_214758
Screenshot_20230217_165558
Maharashtra-News-1IMG-20200920-WA0002
schedule31 Jan 23 person by visibility 1005 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : श्री श्री रविशंकरजी आणि पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी, अध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत दोन दिग्गज व्यक्तिमत्वे. दोघांचीही ख्याती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर. मंगळवारी (31 जानेवारी) सुमंगलम महोत्सवस्थळी हे दोन अध्यात्मिक गुरू एकमेकांना भेटले. एकमेकांच्या कार्याची स्तुती केली. याप्रसंगी बोलताना श्री श्री रविशंकरजी यांनी "सुमंगलम महोत्सव हा भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा महोत्सव आहे. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना सोबत घेऊन पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांनी अध्यात्मिक, सामाजिक, कृृषी, पर्यावरणासंबंधी  प्रबोधन आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात  जे कार्य करत आहेत ते प्रेरणादायी आहे"असे कौतुकोदगार काढले.
कणेरी मठ येथे वीस ते २६ फेब्रुवारी या कालावधीत सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव होत आहे‌. या महोत्सवाची सध्या कणेरी मठ परिसरात तयारी सुरू आहे. श्री श्री रविशंकरजी हे ३१ जानेवारी व एक फेब्रुवारी असे दोन दिवस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी कनेरी मठ परिसरात भेट दिली. सुमंगलम महोत्सव स्थळाची पाहणी केली. पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते श्री श्री रविशंकरजी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रविशंकरजी यांच्या हस्ते काडसिद्धेश्वर स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सुमंगलम महोत्सवसंबंधी माहिती दिली. तसेच श्री श्री रविशंकरजी यांना महोत्सव कालावधीत सहभागी होण्याची विनंती केली. याप्रसंगी बोलताना श्री श्री रविशंकरजी यांनी पूज्यश्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या पुढाकारातून होत असलेले सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव भारतीय संस्कृती अध्यात्म पर्यावरण अशा विविध घटकांचे घडवणारे आहे. पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांचे कार्य साऱ्यांनाच प्रेरणादायी आहे. असे उद्गार काढले. यावेळी कर्नाटकातील अरविंद देशपांडे, रागवेंद्र कागवाड, कुष्णानंद, उद्योजक सुरेंद्र जैन आदी उपस्थित होते. डॉ.संदीप पाटील यांनी सूूत्रसंचाल केले.