Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रामसिना ग्रुपकडून द सिटी सेंटर प्रीमियम व्यावसायिक प्रकल्पाचे भूमिपूजन जनहित याचिकेचा प्रभाव : बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम, पदसंख्येत मोठी वाढपुस्तक : मानवी भावना, ज्ञान आणि संस्कृतीच्या संवादाचे प्रभावी माध्यमकोल्हापुरात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती ! मिलेटचे १० विविध प्रकार !! युवाशक्ती जागर यात्रेत कृष्णराज महाडिकांचे तडाखेबाज भाषण,  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतून यात्रेला प्रारंभतत्कालिन सहायक निबंधक सुजय कदम यांची चौकशी होणार, अपर निबंधकांनी दिले आदेशमिलेट रांगोळीतून साकारली शाहू महाराजांची प्रतिमाशैक्षणिक संस्थांमध्ये समुपदेशक नेमण्याची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीकौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे शोकसभा,  डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना श्रद्धांजलीखाजगी शिक्षक सेवक पतसंस्थेतर्फे शिष्यवृत्ती सराव परीक्षा, 1800 विद्यार्थ्यांचा सहभाग

जाहिरात

 

युवाशक्ती जागर यात्रेत कृष्णराज महाडिकांचे तडाखेबाज भाषण,  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतून यात्रेला प्रारंभ

schedule22 Apr 26 person by visibility 15 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ आपले नेते किंवा गुरू नाहीत. तर ते माझ्यासाठी विद्यापीठ आहेत.त्यामुळे आपण युवा कार्यकर्त्यांसाठी सारथी म्हणून काम करण्यातस तयार आहे. जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्याला थांबवू शकणार नाही’असे तडाखेबाज भाषण भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केले.

निमित्त होतं, भारतीय जनता पक्ष, युवा मोर्चांतर्फे आयोजित जागर यात्रा उद्घाटनेचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री नितेश राणे, खासदार धनंजय महाडिक आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जागर यात्रेचा प्रारंभ झाला. मुंबईतींल भाजप कार्यालय येथे हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी कृष्णराज महाडिक यांनी जोरदार भाषण केले. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करणे हे सुध्दा भाग्याचे असून, सबका साथ-सबका विकास ही पंतप्रधान मोदींची घोषणा सत्यात आणण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी, युवाशक्ती जागर यात्रेला शुभेच्छा दिल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘युवाशक्ती जागर यात्रा एक नवा इतिहास निर्माण करेल. युवाशक्तीला राष्ट्रीय विचाराने प्रेरित करण्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी तरुणाईची ताकत लागावी. यासाठी ही यात्रा महत्वपूर्ण आहे. तरुणाईच्या ऊर्जेला योग्य वळण देण्यासाठी आणि युवा मोर्चाचे संघटन  वाढविण्यासाठी ही यात्रा उपयुक्त ठरेल.’असा विश्वास व्यक्त केला. या यात्रेच्या उद्घाटनप्रसगी कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे रोपटे देऊन स्वागत केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes