Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
क्रीडाई कोल्हापूरतर्फे योग दिन साजराउद्धव ठाकरे अन् कार्यकर्त्यांमधील नाते घट्ट, फुटीर खासदारांना मतदार धडा शिकवतीलमहापालिकेचा वॉच अनधिकृत पाणी कनेक्शनवर, मीटर रीडरांच्या बदल्या होणारराज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे २८ जूनला पुरस्कार वितरणवारणा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन साजराकोल्हापूरसाठी हवे विशेष पॅकेज, राजेश क्षीरसागरांची अमित शहांच्याकडे मागणीजिल्ह्यात एक लाखाहून अधिक एकल महिला, त्यांच्या सक्षमीकरणाला जिपकडून प्राधान्य – सीईओ डॉ. जॅसमिनश्री आंनदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या डिप्लोमा विभागाचा निकाल 93 टक्केगांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर जेसीबी, बांधकामे पाडण्यास सुरुवात कोल्हापूर फर्स्टतर्फे गृहमंत्र्यांना निवेदन, ईएसआय मेडिकल कॉलेजची मागणी

जाहिरात

 

अमृत अंतर्गत कोल्हापूरला ३५४ कोटी निधी मंजुरीची शक्यता :राजेश क्षीरसागर

schedule30 May 23 person by visibility 497 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतेसाठी मलनिस्सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ शासन स्तरावर सादर करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश शक्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून शहरात जिथे भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही त्या ठिकाणी सुमारे २१५ कि.मी. पाईपलाईनची भुयारी गटर करणे, शहरात १०१ एम.एल.डी क्षमतेचे मलनिःसारण केंद्र उभारणे आणि रंकाळा तलाव संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी आवश्यक ३५४ कोटी रुपये इतक्या रक्कमेचे स्वतंत्र तीन प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. याबाबत दोन दिवसांपूर्वी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांची भेट घेतली आणि निधी मंजुर करावा अशी मागणी केली. यासह अव्वर मुख्य सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठ यांच्याशीही चर्चा केली. सद्यस्थितीत प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी शासन स्तरावर सादर करण्यात आले असून, लवकरच अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून कोल्हापूर शहरात जिथे भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही त्या ठिकाणी भुयारी गटर करणे, शहरात मलनिःसारण केंद्र उभारणे आणि रंकाळा तलाव संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी ३५४ कोटी निधी मंजूर होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती  क्षीरसागर यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes