Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक ! पदाधिकारी -अधिकारी - शिक्षक संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक !!केआयटीचा प्लेसमेंटमध्ये नवा इतिहास ! १५७ कंपन्यांकडून ६५२ विद्यार्थ्यांची  निवड !! जज डडसांगलीत शिक्षकांच्या आंदोलनाला प्रतिसाद, बहुसंख्य शाळा बंदकोल्हापूरात चार ऑगस्टला राज्यव्यापी परिषद, बाजार समितीच्या सेस विरोधात आंदोलनाची दिशा ठरणारचुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षकांचा हल्लाबोल, सरकार- प्रशासनाविरोधात उमटला रोषजिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहायकावर कारवाईची मागणीतीन महिन्यात तीन अध्यक्ष, गोकुळच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी प्रदीप मालगावेसंस्थेच्या नावांनी बनावट नियुक्ती आदेश, चार शिक्षिकांसह लिपिकाविरोधात पोलिसात गुन्हाविवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. मिलिंद हुजरे

जाहिरात

 

अमृत अंतर्गत कोल्हापूरला ३५४ कोटी निधी मंजुरीची शक्यता :राजेश क्षीरसागर

schedule30 May 23 person by visibility 510 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतेसाठी मलनिस्सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ शासन स्तरावर सादर करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश शक्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून शहरात जिथे भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही त्या ठिकाणी सुमारे २१५ कि.मी. पाईपलाईनची भुयारी गटर करणे, शहरात १०१ एम.एल.डी क्षमतेचे मलनिःसारण केंद्र उभारणे आणि रंकाळा तलाव संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी आवश्यक ३५४ कोटी रुपये इतक्या रक्कमेचे स्वतंत्र तीन प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. याबाबत दोन दिवसांपूर्वी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांची भेट घेतली आणि निधी मंजुर करावा अशी मागणी केली. यासह अव्वर मुख्य सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठ यांच्याशीही चर्चा केली. सद्यस्थितीत प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी शासन स्तरावर सादर करण्यात आले असून, लवकरच अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून कोल्हापूर शहरात जिथे भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही त्या ठिकाणी भुयारी गटर करणे, शहरात मलनिःसारण केंद्र उभारणे आणि रंकाळा तलाव संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी ३५४ कोटी निधी मंजूर होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती  क्षीरसागर यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes