Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार-  आमदार सतेज पाटीलउद्योग क्षेत्रातील नवीन संधीविषयी कोल्हापुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमकिकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ईडीमार्फत  चौकशी करा - राजवर्धन नाईक निंबाळकरसंच मान्यता  त्रुटी  दुरुस्तीसाठी शिक्षण उपंचालकांसोबत चर्चा कोल्हापूर फर्स्टतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार ! कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विकास परिषद भरविणार !!डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सतंत्रज्ञान युगात जीआयएसचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक : कुलगुरू  डी. टी. शिर्केमार्केट सेस चालूच राहणार, कोल्हापूर बाजार समितीचे राष्ट्रीय बाजार समितीत वर्गीकरण नाही - मंत्री जयकुमार रावळ सार्वजनिक कार्यक्रमात अश्लिल - आक्षेपार्ह नृत्य सादरीकरणास प्रतिबंध करा - कलापथक निर्माता असोसिएशनराज्यस्तरीय तेली समाजाच्या व्यासपीठावर मंत्री बावनकुळे - विजय वडेट्टीवारांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी ! पक्ष प्रवेशाची ऑफर, एक नंबर मंत्रीपदासाठी शुभेच्छा!!

जाहिरात

 

कोल्हापूर उत्तर तर जिंकणारच, दक्षिणचा आमदारही शिवसेना ठरविणार – राजेश क्षीरसागर

schedule07 Oct 24 person by visibility 779 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला पोषक वातावरण आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ जिंकूच शिवाय कोल्हापूर दक्षिणचा आमदारही शिवसेना ठरवेल.’असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
शिवसेनेतर्फे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी झाला. कळंबा येथील अमृतसिद्धी मंगल कार्यालय येथे हा मेळावा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनामुळे सामान्य माणूस सुखावला असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. याप्रसंगी क्षीरसागर यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्या माध्यमातून कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकासकामे केली आहेत. दोन्ही मतदारसंघात भगवा फडकेल. महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मात्र सगळी पदे आपल्याच घरात पाहिजेत असे काही जण म्हणत आहेत. पण जनता सर्वश्रेष्ठ असते. जनता सर्व ठरवत असते.’असा टोलाही लगाविला. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात नागरी सुविधासाटी निधी दिल्याचे क्षीरसागर यांनी आकडेवारीसह सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचेही भाषण झाले. मेळाव्याला माजी नगरसेवक अमोल माने, शिवाजी जाधव, रमेश खाडे, किशोर घाटगे, महेंद्र घाटगे, रणजित जाधव, अमरजा पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर यांनी प्रास्ताविक केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes