+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule14 May 23 person by visibility 454 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या गेल्या पन्नास वर्षातील राजकीय, सामाजिक वाटचालीवर आधारित ‘कोल्हापूरचे महापौर’ या पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकार गुरुबाळ माळी, आप्पासाहेब माळी आणि सतिश घाटगे लिखित या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, महापालिकेचा पाच दशकाची कामगिरी,महापौरांची कारकिर्द उलगडण्यात आली आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून ते आजअखेर शहराचे मानाचे पद भूषविणाऱ्या महापौरांच्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकला आहे. महापौरांची कारकिर्द उलगडताना ज्या त्या काळातील राजकीय घडामोडी, महापौर निवडीचे नाट्य, पडद्याआडच्या घडामोडी, लोकप्रतिनिधी म्हणून महापौरांचे योगदान, शहर विकासाच्या पाऊलखुणा या पुस्तकात पाहावयास मिळतात. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे २०२२ मधील उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये अक्षर प्रकाशनच्या ‘कोल्हापूरचे महापौर’पुस्तकास विशष पुरस्कार मिळाला आहे. येत्या २५ मे २०२३ रोजी शाहू स्मारक भवन येथे सकाळी १०.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा आहे.