+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust.लोहिया हायस्कूलची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत धडक adjust कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांचा अवॉर्ड ऑफ ऑनरने गौरव adjustराजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेत सर्व प्रश्नांची उत्तरे देणार - अमल महाडिक adjustकोल्हापुरात निघणार २५ हजार शिक्षक-कर्मचाऱ्यांचा मोर्चा! आंदोलनात पालकांचाह सहभाग !! adjust पर्यटन व्हिलेज स्पर्धेत पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक adjustचांदेकरवाडीच्या कुस्ती मैदानात सुभाष निऊंगरेचा प्रेक्षणीय विजय adjustशेतकरी संघ बचावासाठी धडक मोर्चा ! पालकमंत्री- जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध !! adjust चेतन नरकेंची मलेशियातील ग्लोबल सीएफओ समिटमध्ये निवड adjustसासूबाई जोरातमध्ये उलगडणार सासू-जावयाची धमाल गोष्ट adjustवीरशैव बँकेला चार कोटी ७१ लाखाचा नफा, सभासदांना दहा टक्के लाभांश
Screenshot_20230905_091804~2
Screenshot_20230903_122011~2
schedule14 May 23 person by visibility 418 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या गेल्या पन्नास वर्षातील राजकीय, सामाजिक वाटचालीवर आधारित ‘कोल्हापूरचे महापौर’ या पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकार गुरुबाळ माळी, आप्पासाहेब माळी आणि सतिश घाटगे लिखित या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, महापालिकेचा पाच दशकाची कामगिरी,महापौरांची कारकिर्द उलगडण्यात आली आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून ते आजअखेर शहराचे मानाचे पद भूषविणाऱ्या महापौरांच्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकला आहे. महापौरांची कारकिर्द उलगडताना ज्या त्या काळातील राजकीय घडामोडी, महापौर निवडीचे नाट्य, पडद्याआडच्या घडामोडी, लोकप्रतिनिधी म्हणून महापौरांचे योगदान, शहर विकासाच्या पाऊलखुणा या पुस्तकात पाहावयास मिळतात. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे २०२२ मधील उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये अक्षर प्रकाशनच्या ‘कोल्हापूरचे महापौर’पुस्तकास विशष पुरस्कार मिळाला आहे. येत्या २५ मे २०२३ रोजी शाहू स्मारक भवन येथे सकाळी १०.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा आहे.