Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जागतिक दर्जाच्या संशोधनाकडे वाटचाल करा - डॉ. विनायक पारळे राजर्षी शाहू आघाडीचा वचननामा प्रसिद्ध ! व्ही. बी. पाटील म्हणाले, महाविकास - महायुतीचे राजकारण घराणेशाहीचे- पैशाचे.तेच प्रेम…तोच पाठिंबा… आमची नाळ जनतेशी जुळलीय ! अण्णांची स्वप्नं सत्यजीत पूर्ण करणार- जयश्री जाधवमंगळवार पेठेत दिसतेय जाधव कुटुंबीयांच्याप्रती प्रेम सतेज पाटलांचा तरुणाईशी संवाद, कोल्हापूरच्या विकासासंबंधी चर्चाकोल्हापुरात काँक्रिटचे रस्ते, आयटी हबला प्राधान्य ! झोपडपट्टीवासियांना प्रॉपर्टी कार्ड, गरीबांना पक्की घरे !!गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील शिवसेनेत जाणार, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शनिवारी प्रवेशभागीरथी नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अरूंधती धनंजय महाडिक, उपाध्यक्षपदी वैष्णवी महाडिकमदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे संगीत महोत्सवास प्रारंभ, शुक्रतारा कार्यक्रमाने जिंकली मनेभ्रष्टाचार करणार नाही, टक्केवारी खाणार नाही - आपच्या उमेदवारांचे शपथपत्र

जाहिरात

 

खस्ता मातीशी नाळ जोडणाऱ्या ग्रामीण जीवनाचा ठाव घेणारी कादंबरी

schedule28 Mar 23 person by visibility 476 categoryसामाजिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  गाव पांढरी , या पांढरीचा प्रमुख घटक असलेला शेतकरी ,त्याची गावपांढरीच्या मातीशी जुळलेली नाळ , रानात मातीत सोने पिकवत असताना बळीराजाची होणारी कुतरओढ़ ,,,आणि तो घेत असलेल्या खस्ता याचे अप्रतिम आणि वस्तुनिष्ठ चित्रण म्हणून प्रा. पी. एस. पाटील यांच्या 'खस्ता' या कादंबरीकड़े पहावे लागेल असे उदगार शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. राजेश पाटील यांनी राधानगरी येथे बोलताना काढले.         अथर्व प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रा. पी .एस. पाटील लिखित ' खस्ता' या कादंबरीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार पक्षाचे कोल्हापूर शहर चिटणीस भाई बाबुराव कदम हे होते. निवृत्त सहायक पोलीस आयुक्त आणि कोल्हापूर जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी- कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ मांढरे, राधानगरीचे गटविकास अधिकारी ड़ॉ. संदीप भंडारी, वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील, प्राथमिक शिक्षक बॅंकेचे संचालक राजेंद्र पाटील -कन्थेवाड़ीकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झालाा. राजेेेश पाटील यानी ही कादंबरी ग्रामीण जीवनाचा ठाव घेणारी साहित्यकृती असल्याचे सांगितले. कुळव, बांडगे,जोत, नांगरट ,या शब्दवैभवात भर घालणाऱ्या शब्दांसह राधानगरी पंचक्रोशीत असणाऱ्या अनेक दुर्लभ आणि बहुपयोगी वनस्पती ,त्यांची उपयुक्तता आणि दैनंदिन ग्रामीण जीवनात पदोपदी त्यांची सिद्ध होणारी उपयुक्तता खस्ता कादंबरीच्या माध्यमातून जगासमोर येईल ,असे मत व्यक्त केले.विजया पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मधुकर मुसले यानी केले. ययाती पाटील यानी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन लाड, संतोष पाटील, चंद्रशेखर पाटील,प्रकाश कानकेकर आदिनी परिश्रम घेतले .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes