Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमची युती सत्तेसाठी नव्हे तर कागलच्या विकासासाठी - जनतेच्या भल्यासाठी : हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगेकेआयटी बेस्ट नॉलेज सेंटर या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितडीवाय पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचा राष्ट्रीय विज्ञान मंचमध्ये सहभागकागलमधील भाजपा कार्यकर्त्यांनी माफ करावे - जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलसत्तेच्या गडबडीसाठी मुश्रीफांनी जनतेला फसविले, वापरा व फेका ही त्यांची निती - संजय मंडलिकांचा हल्लाबोलहिस्ट्री रिपीटस अगेन ! नेत्यांचे गळयात गळे – कार्यकर्ते एकमेकांच्या जीवावर !!राज्यस्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धेत मेन राजारामला सुवर्णपदक ! फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून आनंदोत्सव !!विषयनिहाय विद्यार्थ्यांचे अपडेट ज्युनिअर कॉलेजिअसचा आळशीपणा ! माध्यमिक शिक्षणकडून दोन दिवसाची मुदत !!शिक्षक बँकेतील राजकारण उफाळले ! सत्ताधारी- विरोधकांत वाकयुद्ध, आजी - माजींचा कारभार चव्हाटयावर!!चंदगड नगरपंचायतसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर, आमदार शिवाजी पाटलांच्या उपस्थितीत घोषणा

जाहिरात

 

माणिकराव साळुंखे यांना इंडियन केमिकल सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार

schedule28 Oct 24 person by visibility 1128 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांना इंडियन केमिकल सोसायटी या अग्रगण्य राष्ट्रीय संस्थेकडून  २०२४ साठीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. इंडियन केमिकल सोसायटी ही भारतातील रसायनशास्त्रज्ञांची मातृसंस्था आहे. यंदा शतकमहोत्सव साजरा करीत आहे.
  संस्थेच्या या शतकमहोत्सवी वर्षातील जीवनगौरव पुरस्कार डॉ. साळुंखे यांना जाहीर झाला आहे. येत्या १९ ते २१ डिसेंबर २०२४ रोजी जयपूर येथे संस्थेचे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्या अधिवेशनात डॉ. साळुंखे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासह संस्थेची मानद आजीव फेलोशीपही त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. साळुंखे यांनी जयपूर येथील राजस्थान केंद्रीय विद्यापीठासह देशातील पाच विविध विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविले आहे.
डॉ. साळुंखे यांनी रसायनशास्त्र, रसायन अभियांत्रिकीसह संबंधित उद्योगांमध्ये आपल्या संशोधनाच्या माध्यमातून मौलिक योगदान देऊन आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. त्यांच्या या कार्याचा संस्थेच्या शतकमहोत्सवानिमित्त जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करताना संस्थेला अभिमान वाटत आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष प्रा. जी.डी. यादव यांनी डॉ. साळुंखे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes