महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : निवडणुकीच्या कालावधीत अधिकाधिक मतदारांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार व समर्थ वेगवेगळी शक्कल लढवतात. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापूरला सध्या मिसळपे चर्चा हा कार्यक्रम महायुतीच्यावतीने जोरदारपणे सुरू आहे. रोज वेगवेगळ्या भागात मिसळ पे चर्चा आयोजित करून मतदारांच्या पर्यंत उमेदवाराचे चिन्ह पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. लक्ष्मीपुरी मंडलातील उद्यमनगर, यादवनगर, गुजरी येथील कासार गल्ली या ठिकाणी मिसळ पे चर्चा आणि नमो संवाद हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, सत्यजित कदम, अजित ठाणेकर, गायत्री राऊत, संगीता खाडे,विशाल शिराळकर, संतोष लाड, कुलदीप गायकवाड, संदीप कुंभार, गिरीश साळोखे, मंगला निपाणीकर, तौफिक बागवान, संदीप व्हडगे, अवधूत भाटे उपस्थित होते.