महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : सरकारने विविध मागण्यांची पूर्तता करावी यासाठी ग्रामसेवकांनी, सोमवारी(ता.१२ सप्टेंबर) जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. ग्रामसेवकांच्या शिष्टमंडळाने, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेउन १९ मागण्यांचे निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा कोल्हापूर निवेदन दिले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन. के. कुंभार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनात बाबासाहेब कापसे, के. टी. सिताप, राजेंद्र भोपळे, आनंदा तळेकर, राहूल सिदनाळे, सुजाता कांबळे, लता कणसे, सागर खोत, प्रवीण पोवार, सुधाकर रेळेकर, विष्णू गावडे, सम्राट रानगे, उमा पाटील, टी. जे. अत्तार, दिपक पाटील, आर.डी.कुंभार, शिवाजी वाडकर, बी. के. कांबळे यांच्या नावानिशी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.
‘ग्रामसेवकांमधून ग्रामविकास अधिकारीपदी रखडलेली पदोन्नती तत्काळ द्यावी, निलंबन कालावधी सेवेत कायम धरण्यात यावा, कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होताच त्यांना कायम द्यावेत, वैद्यकीय बिले बजेटसह त्वरित मिळावेत, ग्रामविकास विभाग सोडून इतर कामे लावू नयेत.’ आदी मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत.
……………………………