Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिका अधिकाऱ्यांची कमाल, टाकावूतून टिकाऊ !  भंगारातील आरसी वाहनांचे ट्रकमध्ये रुपांतर ! !शिवकाळातील इतिहासाला वंदन करत सह्याद्री प्रतिष्ठानची पदभ्रमंती मोहीम, वाड्यावस्त्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपकोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी मंत्रालयात सामंजस्य करार, ३५ हजार प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम होणारजिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विनय प्रकाशदिप योजना- सभापती शीतल यादव  इंडिया आघाडीतर्फे शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने, निवेदन स्वीकारण्यास प्रशासनाचा नकारथायलंडमधील कंपन्यांना कोल्हापुरात उद्योग क्षेत्रासाठी गुंतवणुकीस स्वारस्यकेशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेला देण्यासाठी महापालिकेला घाई ! वीस मिनिटाच्या चर्चेअंती ठराव मंजूर ! !बहुमताच्या जोरावर राजोपाध्येनगरमधील सव्वा एकर जागा खासगी संस्थेला, महापालिकेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने ! पाणीपट्टी दरवाढ लांबणीवर ! !सरकारने दडपशाही करण्यापेक्षा आंदोलकांसोबत चर्चा करावी, शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी४१० दूध संस्थांच्या नोटिसावरुन शौमिका महाडिकांचा तत्कालिक संचालकांसह नेतमंडळीवरही निशाणा

जाहिरात

 

ग्रामसेवकांचे जिल्हा परिषदेसमोर भर पावसात आंदोलन

schedule13 Sep 22 person by visibility 929 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : सरकारने विविध मागण्यांची पूर्तता करावी यासाठी ग्रामसेवकांनी, सोमवारी(ता.१२ सप्टेंबर) जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. ग्रामसेवकांच्या शिष्टमंडळाने, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेउन १९ मागण्यांचे निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा कोल्हापूर निवेदन दिले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन. के. कुंभार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनात बाबासाहेब कापसे, के. टी. सिताप, राजेंद्र भोपळे, आनंदा तळेकर, राहूल सिदनाळे, सुजाता कांबळे, लता कणसे, सागर खोत, प्रवीण पोवार, सुधाकर रेळेकर, विष्णू गावडे, सम्राट रानगे, उमा पाटील, टी. जे. अत्तार, दिपक पाटील, आर.डी.कुंभार, शिवाजी वाडकर, बी. के. कांबळे यांच्या नावानिशी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.
 ‘ग्रामसेवकांमधून ग्रामविकास अधिकारीपदी रखडलेली पदोन्नती तत्काळ द्यावी, निलंबन कालावधी सेवेत कायम धरण्यात यावा, कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होताच त्यांना कायम द्यावेत, वैद्यकीय बिले बजेटसह त्वरित मिळावेत, ग्रामविकास विभाग सोडून इतर कामे लावू नयेत.’ आदी मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत.
……………………………

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes