Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजर्षी शाहू महाराज : एक संक्षिप्त चरित्रच्या इंग्रजी आवृत्तीचे जपानी शिक्षणतज्ज्ञांकडून कौतुककोरे पॉलिटेक्निक येथे विद्यार्थी परिचय - मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहातबाळूमामा देवस्थानमधील गैरव्यवहारातील आरोपींना अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन – डॉ. युवराज येडूरेजैन समाजाच्या हितासाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण, माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील - पालकमंत्री प्रकाश आबिटकरजिल्ह्यातील सगळे दिग्ग्ज सत्तेत…राजकारणात माझ्यासारखा विरोधक एखादाच… मलाही सांभाळून घ्या ! सतेज पाटलांना मुश्रीफांच्या शुभेच्छा…प्रकाशअण्णा राजकारणात धुरंधर ! ! शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता -आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज :  शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंतड्रायव्हर सीटवर खासदार, बसमध्ये नगरसेवक ! पीएमईच्या नव्या वाहनातून फेरफटका !!ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे चार ऑगस्टपासून संतांचे संगती निरुपण सोहळा राज्यव्यापी व्यापारी परिषदेला राज्यातून प्रतिनिधी उपस्थित राहणारमहाराष्ट्रातील सामाजिक चळवळीला अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या साहित्‍याने लेखनबळ - संजय कृष्णाजी पाटील

जाहिरात

 

ग्रामसेवकांचे जिल्हा परिषदेसमोर भर पावसात आंदोलन

schedule13 Sep 22 person by visibility 934 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : सरकारने विविध मागण्यांची पूर्तता करावी यासाठी ग्रामसेवकांनी, सोमवारी(ता.१२ सप्टेंबर) जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. ग्रामसेवकांच्या शिष्टमंडळाने, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेउन १९ मागण्यांचे निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा कोल्हापूर निवेदन दिले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन. के. कुंभार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनात बाबासाहेब कापसे, के. टी. सिताप, राजेंद्र भोपळे, आनंदा तळेकर, राहूल सिदनाळे, सुजाता कांबळे, लता कणसे, सागर खोत, प्रवीण पोवार, सुधाकर रेळेकर, विष्णू गावडे, सम्राट रानगे, उमा पाटील, टी. जे. अत्तार, दिपक पाटील, आर.डी.कुंभार, शिवाजी वाडकर, बी. के. कांबळे यांच्या नावानिशी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.
 ‘ग्रामसेवकांमधून ग्रामविकास अधिकारीपदी रखडलेली पदोन्नती तत्काळ द्यावी, निलंबन कालावधी सेवेत कायम धरण्यात यावा, कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होताच त्यांना कायम द्यावेत, वैद्यकीय बिले बजेटसह त्वरित मिळावेत, ग्रामविकास विभाग सोडून इतर कामे लावू नयेत.’ आदी मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत.
……………………………

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes