Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, तंत्रज्ञान विकास केंद्रे म्हणून कार्य करावे- डॉ. सतीश भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, नवोन्मेष तंत्रज्ञान विकासाची केंद्रे म्हणून कार्य करावेशिवसेना ठाकरे पक्षाला महापालिकेत 12 जागा , काँग्रेस सोबत आघाडी गोकुळच्या दिनदर्शिकेतून उलगडतोय दुग्ध व्यवसाय,अद्ययावत माहिती  दूध उत्पादकांसाठी उपयुक्तएसफोरए लढविणार महापालिका निवडणूक - राजू मानेमंडल अधिकाऱ्याला २७ हजाराची लाच घेताना अटकमहाविकास आघाडी की स्वतंत्र ? शिवसेना ठाकरे पक्षाचा बुधवारी निर्णय, अरुण दुधवडकर करणार सतेज पाटलांशी चर्चाशिवाजी विद्यापीठाच्या पूर्णवेळ कुलगुरु निवडीसाठी प्रक्रिया सुरू, २७ जानेवारीपर्यंत मागविले अर्ज राष्ट्रगीत अवमान प्रकरणी ४९ नगरसेवकांची  निर्दोष मुक्तताइंडिया आघाडीतून आप बाहेर, महापालिका निवडणुकीसाठी एकला चलो रेचा नारा

जाहिरात

 

रस्त्यांचे भाग्य उजळले- एकाच रस्त्यासाठी दोन विभागाचा निधी !!

schedule29 Feb 24 person by visibility 386 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला रस्ता असो की महापालिकेने, त्याचा दर्जेदारपणा नेहमीच चर्चेचा ठरला आहे. अनेक ठिकाणी तर डांबरीकरणाच्या नावाखाली केवळ खडीकरणाचे काम सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्चून केलेले रस्ते किती दिवस टिकतात हा संशोधनाचा विषय ठरला असताना आणि शहरातील अनेक रस्ते उखडलेले असताना कोल्हापुरात मात्र एकाच रस्त्यासाठी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने निधीची तरतूद केली आहे. रस्ते कामात दोन्ही विभागांचा हा इंटरेस्ट वाहनधारक आणि नागरिकांत चर्चेचा ठरला आहे. रस्त्यांचे भाग्य उजळले, यंत्रणांची चांदी झाली अशा मिश्किल प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्य नगरोत्थान योजनेतून संभाजीनगर, कामगार चाळ ते निर्माण चौक, जरगनगर बस स्टॉपपर्यंतचा रस्त्यासाठी चार कोटी रुपयांची निधीची तरतूद आहे. महापालिकेच्या अखत्यारित हे काम होणार आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्माण चौक ते जरगनगर शेवटच्या बसस्टॉपपर्यंत रस्ता करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. दोन्ही विभागाकडून आता रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा हा राज्य सरकारच्या अखत्यारित काम करते. तर महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. दोन्ही विभाग अंतिमत: सरकारशी बांधिल. मात्र या दोन्ही विभागातील असमन्वय समोर आला आहे. शिवाय रस्ते कामातील इंटरेस्ट दिसून येत आहे.
…………………….
केवळ खडीकरण, डांबरीकरणाचा पत्ता नाही
शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात सध्या रस्त्याची कामे वेगाने सुरू आहेत. उपलब्ध निधी मुरवायचा म्हणून रस्ते दुरुस्तीची कामे होत आहेत.  नव्याने रस्ते तयार करताना पूर्वीचा रस्ता न उखडता त्यावर केवळ खडी टाकून काम पूर्ण केले जात असल्याचा दिखावा केला जात आहे. अनेक रस्त्यावर डांबरीकरणाचा पत्ता नाही. हॉकी स्टेडियम ते रामानंदनगर पूलपर्यंतच्या रस्त्यावर केवळ खडीकरण झाले आहे. रामानंदनगर पूल ते निर्मिती चौकपर्यंतचा निम्मा रस्ता दुरुस्त केला आहे, निम्या रस्त्यावर खड्डे आहेत. पाचगावातही रस्त्यावर केवळ खडीचा थर दिसत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes