कोल्हापूरची हद्दवाढ करा, आमदार जयश्री जाधव यांची अधिवेशनात मागणी
schedule08 Mar 23 person by visibility 710 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गेल्या पन्नास वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ रखडली आहे. कोल्हापूरनंतर स्थापन झालेल्या अनेक महानगरपालिकांची एकदा-दोनदा नव्हे, तर अनेकदा हद्दवाढ झाली. त्यामुळे त्या शहरांचा विकास झाला. परंतु कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नसल्याने, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनेतून निधी मिळवण्यास अडचणी येत आहेत. परिणामी शहराच्या सर्वांगीण विकास खुंटला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ करणे गरजेचे बनले आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत आहे. या प्रस्तावास सरकाारने त्वरित मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे केली.
महापालिका निवडणुकीनंतर हद्दवाढीसंबंधी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री उदय सामंत यांनी दिले.