+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Mar 23 person by visibility 628 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक भूमिका घेऊ" असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने संप माघारीचे घोषणा केली. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कर्मचाऱ्यांच्यात संपाबाबत संभ्रमावस्था आहे. संप पुढे कायम चालू ठेवायचा की आहे तो प्रस्ताव मान्य करायचा अशा मनस्थितीत कर्मचारी असल्याचे चित्र आहे. त्या साऱ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे सर्व केडर मधील संघटना प्रतिनिधींची मंगळवारी (२१ मार्च)सकाळी नऊ नंतर कोल्हापूर  जिल्हा परिषदेच्या आवारात चर्चा होणार आहे. या चर्चेत संपातील सहभाग कायम ठेवायचा की संपातून माघार घ्यायची याचा निर्णय होणार आहे. संघटना प्रतिनिधी यांच्यामध्ये जी चर्चा होईल ते जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना कळविण्यात येणार आहे. आता सकाळी होणाऱ्या चर्चेकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.अनेक कर्मचाऱ्यांना नवीन प्रस्ताव मान्य नसून सरसकट जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मताचे ते आहेत