भैया मानेंना काँग्रेसचाच पर्याय, महायुतीच्या भांडणात उमेदवारीच्या लॉटरीची शक्यता कमी - सतेज पाटील
schedule15 Mar 26 person by visibility 420 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " महायुतीच्या भांडणामध्ये भैय्या मानेना उमेदवारीची लॉटरी लागण्याची शक्यता नाही. तेव्हा त्यांच्यासाठी आम्हीच (काँग्रेस) हाच पर्याय असणार आहे " अशी राजकीय टिप्पणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी राजकीय टोलेबाजी केली. रविवारी 15 जानेवारी 2026 रोजी गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्प येथे कार्यक्रम झाला. याप्रसंगी गोकुळ तर्फे उत्पादित केलेल्या आईस्क्रीम चा शुभारंभ झाला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के पी पाटील, राजेश पाटील, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात दूध उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना आमदार सतेज पाटील यांनी व्यासपीठावर उपस्थित नेते मंडळी व संचालकांची नावे घेतली. व्यासपीठाकडे बघत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने दिसत नाहीत? कोठे गेले ? असा उल्लेख केला. दरम्यान भैया माने हे तोपर्यंत व्यासपीठावरून बाहेर पडले होते.
व्यासपीठावरील नेते मंडळीकडे पाहत सतेज पाटील पुढे म्हणाले, महायुतीच्या भांडणामध्ये भैय्या माने यांना उमेदवारीची लॉटरी लागेल असे वाटत नाही. तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी पर्याय असणार आहोत असे विधान केले त्यांच्या या विधानावर उपस्थितात चांगलाच हशा पिकला. भैया माने हे पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीची लढाई करता तयारी करत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातून आमदार करणार अशी घोषणा यापूर्वी केली आहे. दरम्यान पुणे पदवीधर मतदार संघातून भारतीय जनता पक्षही निवडणुकीची तयारी करत आहे. क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याकडेही महायुतीचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे मंत्री मुश्रीफ यांनी भैय्या माने यांना निवडून आणू अशी घोषणा कागलमध्ये यापूर्वी एका कार्यक्रमात केले आहे. महायुतीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळणार? हे अजून स्पष्ट नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर गोकुळ येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांनी राजकीय विधान केल्यामुळे चर्चेचा विषय ठरला. दरम्यान आमदार पाटील यांच्या या विधानावर मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळ मधील कार्यक्रमादरम्यान कोणतेही भाष्य केले नाही.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी राजकीय टोलेबाजी केली. रविवारी 15 जानेवारी 2026 रोजी गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्प येथे कार्यक्रम झाला. याप्रसंगी गोकुळ तर्फे उत्पादित केलेल्या आईस्क्रीम चा शुभारंभ झाला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के पी पाटील, राजेश पाटील, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात दूध उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना आमदार सतेज पाटील यांनी व्यासपीठावर उपस्थित नेते मंडळी व संचालकांची नावे घेतली. व्यासपीठाकडे बघत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने दिसत नाहीत? कोठे गेले ? असा उल्लेख केला. दरम्यान भैया माने हे तोपर्यंत व्यासपीठावरून बाहेर पडले होते.
व्यासपीठावरील नेते मंडळीकडे पाहत सतेज पाटील पुढे म्हणाले, महायुतीच्या भांडणामध्ये भैय्या माने यांना उमेदवारीची लॉटरी लागेल असे वाटत नाही. तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी पर्याय असणार आहोत असे विधान केले त्यांच्या या विधानावर उपस्थितात चांगलाच हशा पिकला. भैया माने हे पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीची लढाई करता तयारी करत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातून आमदार करणार अशी घोषणा यापूर्वी केली आहे. दरम्यान पुणे पदवीधर मतदार संघातून भारतीय जनता पक्षही निवडणुकीची तयारी करत आहे. क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याकडेही महायुतीचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे मंत्री मुश्रीफ यांनी भैय्या माने यांना निवडून आणू अशी घोषणा कागलमध्ये यापूर्वी एका कार्यक्रमात केले आहे. महायुतीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळणार? हे अजून स्पष्ट नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर गोकुळ येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांनी राजकीय विधान केल्यामुळे चर्चेचा विषय ठरला. दरम्यान आमदार पाटील यांच्या या विधानावर मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळ मधील कार्यक्रमादरम्यान कोणतेही भाष्य केले नाही.