मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची कंपनी प्रशासनाकडून अहवेलना, वीज कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात
schedule13 Jun 26 person by visibility 73 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समाजातील विविध घटकांच्या बैठका घेतात. न्याय देण्याचे आदेश देतात. मात्र त्यांच्या आदेशाची तंतोतंत अथवा प्रभावी अंमलबजावणी संबंधित प्रशासकीय अधिकारी करत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अहवेलना सुरू आहे असे मत भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी मांडले.
फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री असल्याने राज्यातील वंचित वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यां मांडण्याचे काम भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून करत असताना हे अनुभव आल्याचे संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे म्हणाले. ९ सप्टेंबर २०२४ रोजी फडणवीस यांनी संघटने सोबत बैठक घेतली. कामगारांच्या मागण्यासंबंधी सकारात्मक निर्णय घेतले. मात्र गेल्या दोन वर्षात त्यांनी घेतलेल्य निर्णयांची अंमलबजावणी वीज कंपनी प्रशासनाकडून न झाल्याने वीज कामगारांच्या समस्यां वाढल्या. कंत्राटदारांकडून कामगारांना दोन ते चार महिने वेतन मिळत नाही, रोजगारात सुरक्षितता नाही, कंत्राटदारांकडून आर्थिक पिळवणूक थांबत नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात अचानक कामबंद आंदोलनाची भूमिका घेण्याची तयारी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने चालू केली असल्याचे निलेश खरात यांनी सांगितले.