Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सीईटी सेलचे गणित चुकले, पंधराहून अधिक प्रश्नांच्या उत्तराचे पर्यायच चुकीचे ! सीएमओ ऑफिसकडे तक्रार !! कोरे अभियांत्रिकीमध्ये ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानफावल्या वेळेचा सदुपयोग, वर्गातील सगळया विद्यार्थ्यांनी केल्या कविता ! साकारला कवी उमलताना कवितासंग्रह !!ज्ञानदानाला दातृत्वाची जोड देत प्राचार्य एस. एस. चव्हाण यांनी दिला विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार – इंद्रजीत देशमुखजिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या ग्रामपंचायतींना सूचना, पिण्याच्या पाण्याचे दैनंदिन शुद्धिकरण करा इरिगेशन फेडरेशनच्या अध्यक्षपदी विक्रांत पाटील, उपाध्यक्षपदी सुभाष शहापुरेएमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनच्या ४७ व्या राज्यव्यापी अधिवेशनचे थाटात उद्घाटनबाबा देसाईंच्या स्नेहधाग्यांनी सर्वपक्षीय एकवटले, शोकसभेत आठवणींनी गहिवरलेगोल्ड क्लस्टरच्या माध्यमातून कोल्हापुरातील सुवर्ण उद्योगाला नवी झळाळी - आमदार अमल महाडिकविद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा – शिक्षणाधिकारी मीना शेंडकर

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीमध्ये ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

schedule27 Apr 25 person by visibility 36 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमास) अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा गुण गौरव समारंभ उत्साहात झाला. या कार्यक्रमात ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या वर्षीचा बेस्ट आउटगोइंग स्टुडेंट होण्याचा मान तनिषा शिंदे हिने पटकावला.

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मयुरा ग्रुपचे कार्यकारी संचालक रवी डोल्ली उपस्थित होते. त्यांनी मनोगतात उद्योजक होण्याचा संस्मरणीय व प्रेरणादायक प्रवास सांगितला. तसेच महाविद्यालयाचे शिक्षण पद्धती, इमारती व व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही.कारजिन्नी, यांनी उद्योग क्षमता ही आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले. 
गुणगौरव कार्यक्रमांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षातील रँक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा गौरव केला जातो त्याच बरोबर देश पातळीवरील गेट सारख्या स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या कार्यक्रमांमध्ये झाला.

महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.बी. टी. साळोखे यांनी प्रास्ताविक केले. अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे यांनी कोरे अभियांत्रिकी विषयी माहिती सांगितली. यावेळी राजाराम काळे, डॉ के. आय. पाटील, प्रा. डी. बी मिरजकर, उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाचे नियोजन डॉ. मार्क मोनिस, प्रा. गणेश कांबळे, डॉ. समाधान जाधव, प्रा. मिलींद कामत यांनी केले. तन्वी पाटील, श्रेयस श्रीराम, कृतिका पाटील, वैष्णवी पाचफुले, राजनंदिनी पाटील, ओमकुमार हिरेमठ, अदिती घाटगे, वैष्णवी भोकरे, ज्ञानदा घेवडे, प्रीतम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक डॉ. सौ.व्ही. डी. पाटील यांनी आभार  मानले.
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes