Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नियुक्ती प्रभारी प्र-कुलगुरुंची, नावे चार अन् कुलगुरुंचा फैसला ! विद्यापीठाच्या वाटचालीतील नवा इतिहास !!वळसंगला मिळणार सनमडी-घोलेश्वर तलावातून पाणी ! जत तालुक्यातील २९ गावांसाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना !!काँग्रेसकडून तालुकाध्यक्षांच्या निवडी, करवीर, कागल, पन्हाळा, शिरोळचा समावेशडी वाय पाटील कृषी-तंत्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. ए. के. गुप्ताशिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव ! विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला प्रकुलगुरुपदी संधी !!टीईटी सक्तीच्या विरोधात राज्यभरातील शिक्षक संघटनांचा एल्गार, नऊ नोव्हेंबरला शिक्षकांचा मूक मोर्चाजिपसाठी शौमिका महाडिक कोणत्या गटातून लढणार ! नावाभोवती जोडले जाताहेत नवं-नवे मतदारसंघ !!बदलीसाठी बनावटगिरी, २६ शिक्षकांचे प्रमाणपत्र सदोष ! २७ शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पुणे-मुंबईत पडताळणी !!फुलेवाडीत बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरेंटची दुसरी शाखा, गुरुवारी उद्घाटन ! ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी डी वाय पाटील विद्यापीठाला पेटंट

जाहिरात

 

वळसंगला मिळणार सनमडी-घोलेश्वर तलावातून पाणी ! जत तालुक्यातील २९ गावांसाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना !!

schedule30 Oct 25 person by visibility 44 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जत तालुक्यातील २९ गावांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या पाणी पुरवठा योजनेंतर्गत तालुक्यातील  वळसंग या गावासाठी ‘सनमडी-घोलेश्वर तलाव’येथून पाणी पुरवठा योजना अंमलात येणार आहे. पाणीपुरवठा  व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवारी (२९ ऑक्टोबर २०२५) रोजी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत जत तालुक्यातील विविध गावांच्या पाणी पुरवठा योजनासंबंधी सविस्तर चर्चा झाली.  बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव  संजय खंदारे, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, जत तालुक्यातील संबंधित अधिकारी, सरपंच व जनप्रतिनिधी उपस्थित होते.

 बैठकीत पाटबंधारे विभागाच्या विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा देखील सविस्तर आढावा घेण्यात आला. अनेक लघुपाटबंधारे तलावांची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून उर्वरित कामांना गती देण्यात येणार आहे. बैठकीत चर्चेदरम्यान आमदार पडळकर यांनी, ‘जत तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्यांकडे मंत्री पाटील यांचे लक्ष वेधले.नागरिकांना स्वच्छ व मुबलक स्वरुपात पाणी पुरवठा झाला पाहिजे.’अशी भूमिका मांडली.

बैठकीत जत तालुक्यातील २९ गावांसाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. या योजनेमुळे प्रत्येक गावाला स्वच्छ, स्थिर आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल, तसेच नागरिकांवरील पाणीबिलाचा भारही कमी होईल. असे आमदार पडळकर यांनी सांगितले.  जत तालुक्याच्या पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी आवश्यक निधी, तांत्रिक साहाय्य आणि प्रशासनिक सहकार्य देण्याची ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली. 

दरम्यान तालुक्यातील विविध गावांना यापूर्वी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना मंजूर होती. मात्र प्रादेशिक नळ पाणी पुरवठाऐवजी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना राबवावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने निर्णय झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील बैठकीसाठी वळसंग येथील युवा सामाजिक कार्यकर्ते रमेश माळी हे मुंबईला गेले होते. गावासाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना असावी यासाठी त्यांचा आमदार पडळकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. वळसंगसह २९ गावांना स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.  

...........

 ‘वळसंग गावासाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना अंमलात आणावी असा प्रस्ताव सादर केला होता. गेली दोन वर्षे या पाणी योजनेसाठी पाठपुरावा सुरू होता. सनमडी-घोलेश्वर तलाव येथून पाणी उपसा करुन ते पाइपलाइनद्वारे वळसंगपर्यंत आणणे व गावात वितरित करण्याचा प्रस्ताव तयार आहे. पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत गावासाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. याबद्दल मंत्री व आमदारांचे आभार मानते. येत्या काही महिन्यात या योजनेच्या कामाला सुरुवात होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.’

- पूजा रमेश माळी, सरपंच वळसंग ग्रामपंचायत

...................

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes