Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवकालीन बारा किल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन ! पन्हाळा, रायगड, प्रतापगडचा समावेश शक्तीपीठ महामार्गवरुन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरविण्याचा विरोधकांचा प्रयत्न : आमदार राजेश क्षीरसागरमहानंदा मोहिते यांच्या घुंगुरमाळा कवितासंग्रहाचे शनिवारी प्रकाशनआई अंबाबाई, शक्तिपीठ महामार्ग रद्द होऊ दे ! शेतकऱ्यांची शेती वाचू दे !!शिक्षक - संस्था चालकांनी उगारली आंदोलनाची छडी ! अन्यायी संच मान्यतेच्या विरोधात कोल्हापुरात जंगी मोर्चा !!कोल्हापुरात वंध्यत्व विषयक दोनदिवसीय कार्यशाळानूतन मराठी विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरीपाचवी शिष्यवृत्ती, आठवी एनएमएमएस परीक्षेसंबंधी शिक्षकांसाठी कार्यशाळाजरगनगरातील प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमाकोल्हापूर जिल्हा शंभर टक्के साक्षर बनविण्यासाठी प्लॅनिंग-जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

जाहिरात

 

कोल्हापुर चेंबर ऑफ इंडस्ट्रीजच्या उपाध्यक्षपदी राजू पाटील

schedule01 Nov 24 person by visibility 162 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर :  शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, स्मॅक क्लस्टरचे चेअरमन हिंद गिअर व आर. एन. डी. इंडस्ट्रीजचे राजू तुकाराम पाटील यांची कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. 

Serva sixa abiyan

schedule27 Oct 24 person by visibility 173 category

 *महाविकास आघाडीतील उमेदवारांनी घेतली आमदार सतेज पाटील यांची सदिच्छा भेट*
*कोल्हापूर,:* महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील, सत्यजीत पाटील- सरूडकर, गणपतराव पाटील आणि राजेश लाटकर यांनी आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालयावर आज रविवारी सदिच्छा भेट घेतली. या सर्वांना मोठ्या मताधिक्यांने निवडून आणण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
     गेली काही दिवसापासून, महाविकास आघाडीतील जागा वाटपावर चर्चा सुरू होती. या सर्व घडामोडी मध्ये काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे देखील सहभागी होते. अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील, महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले असून, या आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार के. पी. पाटील, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सत्यजीत पाटील- सरूडकर, काँग्रेसचे शिरोळ मधील उमेदवार गणपतराव पाटील आणि उत्तर कोल्हापूरचे उमेदवार राजेश लाटकर यांनी आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पार पडलेल्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यात या सर्वांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. यावेळी अनेक राजकीय मुद्द्यावरही चर्चा होऊन, मतदार संघात घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे याबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी, काँग्रेसचे करवीर तालुका अध्यक्ष शंकरराव पाटील, उद्योगपती आनंद माने, माजी महापौर भीमराव पोवार, आदी उपस्थित होते.

Serva sixa abiyan

schedule24 Oct 24 person by visibility 175 category

बातमी

एनआयटीमध्ये रक्तदान शिबीर

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये रक्तदान शिबीर संपन्न झाले. विद्यार्थी व स्टाफनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. देशासाठी सीमेवर लढणारे सैनिक, अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेचे रूग्ण आदींच्या जीवीताच्या रक्षणासाठी रक्तदान करणे हे आपले कर्तव्य असल्याचे एनआयटी संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नमुद केले. त्यांनी वैभवीलक्ष्मी ब्लड सेंटरचे संचालक धनंजय साळोखे यांचे स्वागत केले. प्रा. किरण वळीवडे यांनी वैभवीलक्ष्मीच्या सर्व स्टाफचे स्वागत केले. मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. एनआयटीच्या सोशल क्लबचे समन्वयक प्रा. रविंद्र यादव यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. मेकॅनिकल व इलेक्ट्रीकलच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून योगदान दिले.

Serva sixa abiyan

schedule24 Oct 24 person by visibility 175 category

*पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी पालकमंत्रांच्या चार कॉन्ट्रॅक्टरांच्या पार्टीला हद्दपार करा*

 *समरजितसिंह घाटगे*
*अलोट जनसागराच्या साक्षीने दाखल केला उमेदवारी अर्ज*
कागल प्रतिनिधी

कागलमधील विधानसभेची निवडणूक भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या विरोधात,भयमुक्त वातावरणासाठी, हुकूमशाही व दंडूकशाहीला धडा शिकवणारी आहे.पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी पालकमंत्रांच्या चार कॉन्ट्रॅक्टरांच्या पार्टीला हद्दपार करा.असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केले.
    अलोट जनसागराच्या साक्षीने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कागल येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
      घाटगे पुढे म्हणाले,परिवर्तन घडवायचे म्हणून एवढ्या उन्हातान्हात जनसागर लोटला आहे. चुकीच्या विचारधारेला हद्दपार करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. विरोधकांच्या पायाखायची वाळू घसरल्याने ते आमच्या घरासमोर पुड्या, लिंबू,मिरची टाकत आहेत.जेवढ्या पुड्या टाकायच्या तेवढ्या टाका.यावरूनच तुम्ही पराभव मान्य करत असून पुरोगामीची भाषा तुम्हाला शोभत नाही.पालकमंत्री मुश्रीफांनी शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भातील खोटा जीआर काढून शेतकऱ्यांना फसवलं. शक्तिपीठ महामार्ग रद्द झालेला नाही.पण काळजी करू नका महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर शक्तीपीठ महामार्ग रद्दचा पहिला जीआर रद्द करण्यासाठी आमदार सतेज पाटील व आम्ही संयुक्तपणे पाठपुरावा करू.
    पालकमंत्री महोदय कधीतरी आयुष्यामध्ये कोणाबरोबर तरी प्रामाणिक राहणार आहेत की नाहीत. या गद्दारीला आपल्याला उत्तर द्यायचं आहे. त्यासाठी मी आपल्याला एवढंच सांगतो हा समरजीतसिंह घाटगे तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे. मी आपल्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे.कागल तालुक्यात विकासकामांत ७०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण चर्चेत आहे.पालकमंत्र्यांचे लाडके चारच कॉन्टॅक्टर यामध्ये सहभागी असावेत. राज्यामध्ये लाडकी बहीण योजना तर कागलमध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना आहे.ही चुकीची विचारधारा थांबवायची आहे. 
  गोकुळचे माजी चेअरमन रणजीत पाटील म्हणाले," विरोधकांना पराभव दिसू लागल्याने ते दंडूकशाहीचा वापर करतील. त्यांच्या दडपणाला बळी पडू नका अतिशय खालच्या पातळीवर राजकारण विरोधकांकडून सुरू आहे."
   काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर म्हणाले, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार,उद्धव ठाकरे आणि सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात वाढलेली झुंडशाही गाडण्यासाठी सर्वांनीच परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकत्र येऊया."
   स्वागत व प्रास्ताविक प्रा.सुनिल मगदूम यांनी केले. यावेळी शिवानंद माळी, संभाजी भोकरे,बाळासाहेब हेगडे,गौरव पनोरेकर यांनी मनोगत व्यक्त केली. 
यावेळी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे,अखिलेशराजे घाटगे,श्रेयादेवी घाटगे,यश घाटगे,करणसिंह घाटगे, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी,शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे ,राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील बाबासाहेब पाटील( खातेदार), जनार्दन निऊंगरे,संतोष चिक्कोडे,एकनाथ देशमुख,सुनिल गुरव,युवराज बरगे, भिमराव कोमारे, यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार राजू जाधव यांनी मानले.

चौकट१
स्वाती कोरींचा मोठ्या बहिणीप्रमाने मान-सन्मान राखू
जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार स्व.श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या स्वातीताई कोरी यांनी आम्हाला कागल गडहिंग्लज उत्तूरमधील परिवर्तनाच्या लढाईत जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोठे बळ मिळाले आहे.येत्या काळात स्वातीताईंचा मोठ्या बहिणी प्रमाणे मानसन्मान राखू. अशी ग्वाही घाटगे यांनी यावेळी दिली

चौकट२
कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह

समरजितसिंह घाटगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागल गडहिंग्लज उत्तूर विभागातून आबालवृद्धांसह तरुणांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत प्रचंड गर्दी केली होती.हालगिचा कडकडाट, कैताळ व तुतारीचा निनाद व ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते मोठ्या उत्साहात गैबी चौकात उत्स्फूर्तपणे एकत्र आले.यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. गैबी चौकातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यार्यंत राजे समरजीतसिंह घाटगे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतले.
 रणरणत्या उन्हात ही कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्तपणा ओसंडून वाहत होता, गैबी चौक ते एसटी स्टँड जवळील शिवाजी महाराज 
चौकापर्यंतचा परिसर रॕलीतील कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता..

चौकट ३
लक्षवेधी फलक

 वारसा शाहूंचा-लढा सर्वसामान्यांचा, गाढूया गद्दारी-वाजवूया तुतारी,राम कृष्ण हरी - वाजवा तुतारी, ठरलं तर मग आता समरजीतसिंह राजेच आमदार, डर जरुरी है, बदल हवा..तर आमदार नवा.. गाढूया मंत्र्यांची गद्दारी वाजुया समारजित राजेंची तुतारी,नको ईडी..नको गद्दार आता समरजीतसिंह राजेच आमदार.. अशा आशयाचे लक्षवेधी फलक झळकवत कार्यकर्ते तशा घोषणा देत होते.

छायाचित्र१) कागल येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कागल येथे झालेल्या जाहीर सभेत
 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार समरजितसिंह घाटगे

२)रॕलीत मोठ्या संख्येने सहभागी नागरिक

Serva sixa abiyan

schedule23 Oct 24 person by visibility 175 category

शक्तीपीठ महामार्ग अखेर रद्द

पालकमंत्री हसन मुश्रीफ

जनरेट्यामुळे शासनाचा निर्णय : शेतकऱ्यांनी केला एकच जल्लोष

कागल, दि. २२
शेतकऱ्यांच्या आड येणारा शक्तीपीठ महामार्ग अखेर रद्द झाल्याचा अध्यादेश निघाला असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर आज केले. मंत्री मुश्रीफ यांनी ही घोषणा करताच उपस्थित शेतकऱ्यांनी एकच जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी केली. 

कागल येथे आयोजित नियोजन बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी शक्तिपीठ रद्द झाल्याच्या अधिसूचनेची प्रत माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्याकडे सोपवली.

यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, शक्तीपीठ महामार्गामुळे असंख्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी याला प्रचंड मोठा विरोध केला होता. अनेकदा आंदोलनेही केली होती. यामध्ये माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी पुढाकार घेतला होता. हा शक्तिपीठ महामार्ग आज रद्द झाल्याने या सर्वांच्या लढ्याला यश आलं आहे.
मंत्रिमंडळात पाठपुरावा करून हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करू शकलो, याचा मला विशेष आनंद आहे.

माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन अनेक शेतकरी भूमिहीन होणार होते. या विरोधात आम्ही सर्वांनी लढा उभारला होता. मंत्री मुश्रीफांकडे हा महामार्ग रद्द होण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांनी जाणीवपूर्वक यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे

यावेळी, केडीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ संचालक युवराज पाटील, नवीद मुश्रीफ,अमरीश घाटगे, धनराज घाटगे, डी. एम. चौगले, बाळासाहेब तुरंबे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****************
फोटो ओळी-
कागल येथे आयोजित नियोजन बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी शक्तिपीठ रद्द झाल्याच्या अधिसूचनेची प्रत माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्याकडे सोपवली.
==========

Serva sixa abiyan

schedule20 Oct 24 person by visibility 178 category

*कृती समितीची विश्वासाहर्ता कायमपणे टिकणे महत्वाचे : शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण* 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात कृती समितीच्या कामाबाबत जनतेमध्ये विश्वासार्हता आहे. टोल सह विविध प्रश्न कृती समितीने जनआंदोलने उभी करून मार्गी लावले आहेत. अशा अनेक चळवळीत कोल्हापूरचा नागरिक म्हणून राजेश क्षीरसागर यांच्यासह आम्ही शिवसेनेचे सर्वच पदाधिकारीही अग्रभागी राहिलो आहे. त्यामुळे कृती समितीची विश्वासार्हता टिकून राहणे गरजेचे आहे. काल महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत साडेचार हजार कोटी केवळ कागदावरच, साडेचार हजार कोटी गेले कुठे? अशा पद्धतीची वक्तव्ये करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या निधीबद्दल जनतेमध्ये साशंकता निर्माण करण्याचा एकप्रकारे प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता कृती समितीतील प्रतिनिधी हे जाणकार आहेत त्यांना निधी मंजुरीच्या प्रक्रीयेबाबत माहिती असणे आवश्यक आहे. कोणताही निधी मंजूर होत असताना किंवा विकासकाम होत असताना त्याकरिता आवश्यक निधी हा टप्प्याटप्प्याने संबधित खात्याकडे वर्ग केला जातो. या शासकीय प्रक्रीयेबद्दल कृती समितीचे सदस्य अज्ञभित असणे अशक्य आहे. मंजूर केलेला निधीतून टप्प्याटप्प्याने कामे केली जात आहेत व होणार आहेत हे समस्त कोल्हापूरवासियांना माहित आहे. पूरस्थिती नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून मंजूर रु.३२०० कोटी निधीतून करावयाच्या उपाययोजनांचे विविध टप्पे करण्यात आले आहेत. कन्व्हेन्शन सेंटरसाठीही रु.२७७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचे सादरीकरणही जिल्हा प्रशासनाने केले आहे. रंकाळा तलावावर सुरु असलेल्या सुशोभीकरणाची छायाचित्रे प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध केली आहेत. रस्त्यांच्या कामांच्या शुभारंभास कृती समितीमधील सदस्य नारळ फोडायला होते. पंचगंगा नदी घाटावरील विद्युतीकरणाद्वारे केलेले सुशोभिकरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. हे वास्तविक चित्र कोल्हापुरातील जनता उघड्या डोळ्याने पाहत असताना कृती समितीने केलेली वक्तव्ये ही जनसामान्यात गैरसमज निर्माण करणारी होत आहेत. यामुळे कृती समितीच्या जनसामान्यातील विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता निर्माण होत आहे. ही विश्वासाहर्ता टिकणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.

यात पुढे म्हंटले आहे कि, कोल्हापूर शहराच्या इतिहासात आजतागायत कोट्यावधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी मंजूर झाला नाही. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे ४५०० कोटींचा निधी मंजूर केला. याची माहिती समस्त कोल्हापूरवासियांना आहे. मंजूर केलेल्या निधी अंतर्गत होणाऱ्या कामांचे उद्घाटन करण्याचा हक्कही निधी मंजूर करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असणे साहजिकच आहे. परंतु, मंजूर केलेला निधी मिळालाच नाही कागदावरच आहे अशी भूमिका घेवून जनतेमध्ये गैरसमज निर्माण होईल अशी वक्तव्ये जाणकार कृती समितीकडून होणे आश्चर्यकारक आहे. 

 गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात विकासाचे काम सुरु आहे. कोल्हापूरच्या विकासाचेच ध्येय ठरवून महानगपालीकेस निधी मंजूर केला जात आहे. परंतु, कालच्या बैठकीतून जाणीवपूर्वक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या निधीबाबत साशंकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. गेल्या अनेक वर्षात कोल्हापूरला मिळालेला निधी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेला निधी याची तुलना कृती समिती सदस्यांनी करावी आणि एकप्रकारे सुरु असलेला पक्षपातीपणा थांबवून कोल्हापूरच्या विकासाच्या मार्गात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही या पत्रकाद्वारे शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केले आहे.

प्रति,
मा.संपादकसो,
दैनिक/वृत्तवाहिनी/वेब पोर्टल,
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक/वृत्तवाहिनी/वेब पोर्टल वर प्रसिद्ध करून सहकार्य करावे, ही विनंती.
आपला,
नंदू सुतार,
स्वीय्य सहाय्यक तथा 
कार्यालय प्रमुख, शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, कोल्हापूर.

Serva sixa abiyan

schedule19 Oct 24 person by visibility 178 category

🍁🆂︎🅼︎🅰︎🅺︎update...
🪙 सुवर्णमहोत्सवी वर्ष
> ५० वर्षांची कार्य सेवा

🚨 *शिरोली एमआयडीसी ठाण्याचे नूतन सपोनि सुनील गायकवाड*
•------------------------------•

शिरोली एमआयडीसी ठाण्याचे नूतन सहायक पोलीस निरीक्षक [सपोनि] म्हणून सुनील गायकवाड यांची नेमणूक झाली. 

सपोनि पंकज गिरी सपोनि यांची पोलीस निरीक्षक पदी बढती होऊन मुंबई येथे बदली झाली. त्यांच्या जागेवर गायकवाड आले. त्यांनी बुधवारी पंकज गिरी यांचे कडून पदभार स्वीकारला. 

सुनील गायकवाड हे यापूर्वी पोलीस महानिरीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे कार्यरत होते.

Serva sixa abiyan

schedule10 Oct 24 person by visibility 186 category

[10/10, 5:25 PM] Varmble Engnir Association: दि.10 नोव्हेंबर 2013 रोजी आर.आय.टी.कॉलेज,सांगली येथे पदविदान समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्री.रतन टाटाजी आले होते. त्यावेळी कोल्हापूरातील अनेक नामवंत उद्योजकांच्या शिष्टमंडळाने त्यांचे भेट घेतली त्यावेळचा अविस्मरणीय क्षण. सदरचा फोटो कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या फोटो गॅलरीतही लावण्यात आलेला आहे. असोसिएशन तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली.
[10/10, 5:32 PM] Varmble Engnir Association: कोल्हापूरच्या उद्योगनगरीने गेली अनेक वर्षे टाटा उद्योग समूहास विविध सुटया भागांचा पुरवठा करतात. टाटा उद्योग समूहामुळे उच्च गुणवत्ता, यामधील सातत्य, वेळेचे नियोजन आणि अश्या अनेक गोष्टी ज्या येथील उद्योजकांना शिकण्यास मिळाल्या आणि रतन टाटा हे येथील उद्योग नगरीचे प्रेरणा स्थान आहे. स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी येथील उद्योगांना अनेकवेळा विविध कार्यक्रमातून मार्गदर्शन केले आहे. त्यांच्यामुळे येथील उद्योगांचा विकास आणि उद्योगांची वाढ झाली. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन तर्फे स्वर्गीय रतन टाटा यांना भावपूर्ण श्रध्दांजली. 

बाबासो कोंडेकर
अध्यक्ष
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन

Serva sixa abiyan

schedule04 Oct 24 person by visibility 190 category

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज च्या अकरा मजली अत्याधुनिक नवीन इमारतीचा बांधकाम शुभारंभ आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.याप्रसंगी अध्यक्ष म्हणून मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.
 गुणवत्ते बरोबर मुलांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी संस्थेने पुढाकार घ्यावा आणि आपल्यालौकिकाची परंपरा यापुढेही कायम ठेवावी असे उदगार माननीय छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केले. इमारतीचे बांधकाम सात मजल्यावरच न थांबवता ते सलग अकरा मधले पूर्ण करणे कामी संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन याप्रसंगी शाहू महाराज यांनी दिले. मालोजीराजे यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेच्या कार्याचा गौरव केला आणि संस्थेच्या कार्याविषयी समाधान व्यक्त करून नवीन बांधकामात शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे बांधकाम समितीचे चेअरमन प्राध्यापक विनय पाटील यांनी केलें कॉलेज च्या लौकिकांका बाबत आणि कार्याबद्दल मा. प्राचार्य डॉ. व्हीं एम पाटील यांनी महिती दिली. कार्यक्रमाचे आभार वाईस चेअरमन श्री डी जी किल्लेदार यांनी मांनले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सर्व संचालक सर्व शाखाप्रमुख आणि न्यू कॉलेजचा सर्व स्टाफ आणि निमंत्रित उपस्थित होते

Serva sixa abiyan

schedule28 Sep 24 person by visibility 195 category

लोकराजा वकील मंडळ तर्फे प्रेस नोट
“शिवाजी विद्यापीठ विरुद्ध अभिषेक मिठारी यांनी दाखल केलेल्या केस मधे केलेली मागणी
शिवाजी विद्यापीठाने मान्य केले बाबत”
“ विद्यापीठ प्रशासनास नियम – नियमावलिंचे हँडबुक तयार करावे लागले.”
“आता उपलब्ध होणार विद्यापीठ नियम – नियमावलिंचे पहिलेवाहिले हँडबुक”
1. लोकराजा वकील मंडळ तर्फे तज्ञ संचालक आणि शिवाजी विद्यापीठचे सीनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी शिवाजी विद्यापीठ विरुद्ध दिवाणी दावा दाखल केला आणि यात विरुद्ध पक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, प्रभारी कुलगुरू आणि रजिस्ट्रार यांना पक्षकार केले गेले. सदर दावा याच वर्षी २३ जानेवारी २०२४ रोजी दाखल करण्यात आला आणि अवघ्या ७ महिन्यात लोकराजा वकील मंडळ तर्फे तज्ञ संचालक आणि शिवाजी विद्यापीठचे सीनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी केलेली मागणी विद्यापीठ यांनी मान्य केली.
2. सदर केस मधे वकील म्हणून एड रविराज बिर्जे यांनी बाजू मांडली. त्याना सहकार्य लोकराज वकील मंडळ यांचे अध्यक्ष एड योगेश सावंत, उपाध्यक्ष एड जयसिंग देसाई आणि सचिव एड कार्तिक पाटील यांचे लाभले.
3. काय होती मागणी (दावा विषय)
a. विशिष्ठ दिलासा अधिनियम आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ अन्वये शिवाजी विद्यापीठ विरोधात आदेश पारित करावा की त्यानी हँडबुक (नियम आणि परिनियम) उपलब्ध करुन द्यावे.
4. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १४(६)(इ) अन्वये हँडबुक (नियम आणि परिनियम) उपलब्ध करुन देणे आणि ते अद्ययावत ठेवणे हे कोणत्याही सार्वजनिक विद्यापीठ यांस बंधनकारक आहे. परंतु शिवाजी विद्यापीठ यांनी १९९३ पासून असे कोणतेही हँडबुक (नियम आणि परिनियम) उपलब्ध करुन दिले नाही आणि ते अद्ययावत ठेवले नाही.
5. हँडबुक म्हणजे नेमके काय असते?
a. ज्या प्रमाणे देश संविधान नुसार चालतो, त्याचप्रमाणे कोणतेही विद्यापीठ हे हँडबुक (नियम आणि परिनियम) अन्वये चालवले जात असते. विद्यापीठ कसे चालवावे याचे नियम म्हणजे हँडबुक असे आपण ढोबळ मानाने म्हणू शकतो.
b. हँडबुक मधे साधारण २२ प्रकारचे हेडिंग् असतात आणि प्रत्येक हेडिंग अंतर्गत असंख्य उपनियम असतात. उदा
i. नवीन विभाग कसे सुरू करावेत
ii. विभागातील विविध नियम नियमावली
iii. विद्यार्थी हिताच्या योजना व इतर नियमावली
iv. प्राध्यापक हिताच्या योजना व इतर नियमावली
v. महाविद्यालय हिताच्या योजना व इतर नियमावली
vi. नवीन महाविद्यालये कशी सुरू करावीत
vii. विद्यापीठ बैठक मधे कामकाज कसे चालवावे
viii. पदव्या कशा द्याव्यात
ix. आलेल्या निधीचा वापर कसा करावा
x. परीक्षेचे वेळी गैर प्रकार कसे टाळावेत.
xi. निवडणुका कशा घ्याव्यात
xii. विद्यार्थी तक्रार निवारण कसे करावे.
xiii. महाविद्यालय तपासणी कशी करावी
xiv. इत्यादी २२ हेडिंग
6. लोकराजा वकील मंडळ तर्फे तज्ञ संचालक आणि शिवाजी विद्यापीठचे सीनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी गेली दीड वर्ष हँडबुक तयार करावे असा पाठपुरावा केला. अगदी मुख्यमंत्री, राज्यपाल याना पत्रे काढली तसेच सिनेट मीटिंग मधे देखील संघर्ष केला. परंतु विद्यापीठ यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. याचा सव्वीस्तर वृत्तांत खालील प्रमाणे
a. पहिल्या अधिसभेत या विषयावर स्थगन प्रस्ताव आणला परंतु प्रशासनाने तो नाकारला
b. दुसऱ्या अधिसभेत या विषयावर प्रश्नोत्तराच्या सभेत प्रशासन उघडे पडले.
c. तिसऱ्या अधिसभेत या विषयावर दोन ठराव आणले.
d. अनेकवेळा प्रशासनास, मुख्यमंत्री, राज्यपाल यांना पत्रे काढली.
e. 12/04/2023 रोजी अभिषेक मिठारी यांनी परिनियम आणि विनिमय असणारे हँडबुक मिळविण्यासाठी आरटीआय अर्ज दाखल केला. त्याला 11/05/2023 रोजी असे उत्तर मिळाले की
 “शिवाजी विद्यापिठात परिनियम, विनियमांचे एकत्रित पुस्तक उपलब्ध नाही.”
f. विद्यापीठ वतीने दिलेली सदर माहिती ही धक्कादायक अशी होती. पाच लाखांहून अधिक विद्यार्थी, विभाग आणि संलग्न महाविद्यालये इत्यादींचे भवितव्य पाहता हँडबुक नसणे आणि त्याचे अद्ययावतीकरण आणि त्यानंतरची अनुपलब्धता पाहता शिवाजी विद्यापीठ कोणत्या वेदनादायक परिस्थितीमध्ये चालवले जात आहे याची कल्पनाच करता येत नाही.
g. कुलगुरू, प्रभारी कुलगुरू, मुख्यमंत्री, राज्यपाल, रजिस्ट्रार यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही आणि यास्तव लोकराजा वकील मंडळ तर्फे तज्ञ संचालक आणि शिवाजी विद्यापीठचे सीनेट सदस्य अभिषेक मिठारी याना शिवाजी विद्यापीठ योग्य प्रकारे चालवून त्यात शिकणाऱ्या ५ लाख विद्यार्थी वर्गाच्या आणि विभागांच्या भवितव्यासाठी दिवाणी न्यायालयात धाव घ्यावी लागली.
7. दिवाणी दावा २३ जानेवारी २०२४ रोजी दाखल करण्यात आला आणि त्यास नियमित दिवाणी दावा ७८/२०२४ असा क्रमांक मिळाला. सदर दावा मेहेरबान रजपूत कोर्टात (दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, कोल्हापूर) चालला. कोर्टातील वृत्तांत पुढील प्रमाणे
a. सदर कामात शिवाजी विद्यापीठ वतीने आदरणीय एड संतोष शहा यांनी वकीलपत्र घातले.
b. सीनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी केलेली मागणी मान्य न करता शिवाजी विद्यापीठ यांनी केस लढवण्याची तयारी दर्शवली.
c. सीनेट सदस्य अभिषेक मिठारी आणि त्यांचे वकील एड रविराज बिर्जे यांनी वारंवार मागणी केली की “हँडबुक द्या, आम्ही त्वरित केस मागे घेतो”. परंतु शिवाजी विद्यापीठ यांनी मागणी मान्य केली नाही व केस लढण्याची तयारी दर्शवली.
d. किंबहुना धक्कादायक असे की शिवाजी विद्यापीठ यांनी असा अर्ज केला की, अभिषेक मिठारी हे स्वतः सिनेट मेंबर असल्याने त्याना स्वतःच्या विद्यापीठ विरुद्ध दिवाणी दावा दाखल करता येणार आणि यास्तव केस काढून टाकावी. यास मिठारी यांनी म्हणणे दिले आणि तीव्र आक्षेप घेतला आणि त्यांचे वतीने एड रविराज बिर्जे यांनी जोरदार युक्तिवाद केला. आदरणीय कोर्टाने शिवाजी विद्यापीठ यांचा अर्ज खर्चासहित नामंजूर केला आणि मिठारी हे जरी सिनेट मेंबर असले तरी त्याना शिवाजी विद्यापीठ विरुद्ध दावा दाखल करायचा अधिकार आहे असा आदेश पारित केला.
e. तदनंतर शिवाजी विद्यापीठ याना कळुन चुकले की त्याना आता हँडबुक द्यावे लागेल आणि केस लढण्यात अर्थ नाही आणि त्यामुळे त्यानी हँडबुक तयार करुन अद्ययावत करणेची तयारी दर्शवली.
f. दिनांक ०४/०७/२०२४ रोजी शिवाजी विद्यापीठ यांनी कोर्टात हँडबुक सादर केले. त्याची प्रत २०/०७/२०२४ रोजी मिठारी याना कोर्टात प्राप्त झाली. हँडबुक शिवाजी विद्यापीठ यांनी उपलब्ध करुन दिलेने मिठारी यांची मागणी मान्य झाली. यास्तव मिठारी यानी दिनांक १९/०८/२०२४ रोजी दावा मागे घेत असले बाबत कोर्टास कळवले.
g. मेहेरबान कोर्टाने दिनांक २५/०९/२०२४ रोजी हँडबुक संदर्भात काही त्रुटी असल्यास पुन्हा दावा करण्याचा हक्क आबाधित ठेवत दावा मागे घेण्याच्या अर्जास मंजुरी दिली.
8. सिनेट मेंबर ने स्वतःचे विद्यापीठ विरुद्ध दिवाणी दावा दाखल करण्याचा हा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पहिलाच प्रकार. यापूर्वी सिनेट मेंबर यांनी उच्च न्यायालय मधे केसेस दाखल केल्या पण त्या त्यांच्या अपात्रतेबाबत होत्या, एकही केस हँडबुक बाबत नव्हती.
9. लोकराज वकील मंडळ आणि मिठारी यांचे अनेक विद्यापीठ कर्मचारी, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी स्वागत आणि अभिनंदन केले. शिवाजी विद्यापीठ यांनी केस दाखल करायचे आधीच हँडबुक दिले असते तर मिठारी याना केस दाखल करावीच लागली नसती. केस दाखल केल्यावर शिवाजी विद्यापीठ यानी हँडबुक दिले. एक प्रकारे विद्यापीठावर नामुष्की ओढवली.
10. आमची मागणी काय आहे?
विद्यापीठाने येथून पुढे त्रुटी विरहित हँडबुक तयार करावे व जसजसे नवीन नियम परिनियम बनतील तसे ते अपडेट/ अद्यावत करीत जावे व अधिकार मंडळ सदस्यांच्या मागणीनुसार ते त्वरित उपलब्ध करून दिले जावेत. अन्यथा कोर्ट आदेशानुसार आमचा पुन्हा दावा करणेचा हक्क अबाधित असलेने आम्हाला पुन्हा न्यायालयात जावे लागेल.
“ही केस अधिकार मंडळांच्या लोकशाही हक्कांसाठी लढली गेली होती. अधिकार मंडळातील सदस्यांना या हँडबुक द्वारे नियम नियमावलीची माहिती व्हावी. त्यातून सभागृहाचे कामकाज अधिक चांगले चालून गतिमान , कार्यक्षम प्रशासन व्हावे व या प्रशासनावर अधिकार मंडळांचा सम्यक अंकुंश असावा यासाठी हे हँडबुक अत्यंत आवश्यक असलेने सार्वजनिक शिक्षणाच्या क्षेत्रातील लोकशाही टिकवण्याची, प्रशासन अधिक पारदर्शक करण्याची, त्यात लोकसहभाग, लोकांकुश वाढवण्याची ही लढाई होती त्यात आम्हाला यश आले याचा आम्हाला आज आनंद होत आहे.”
कोल्हापूर
दिनांक २७/०९/२०२४
ॲड. योगेश सावंत ॲड. रविराज बिर्जे ॲड. अभिषेक मिठारी ॲड. अजित पाटील.
ॲड. कार्तिक पाटील ॲड. जयसिंग देसाई. ॲड. सिद्धी दिवाण. ॲड. अंकिता त्रिभुवने

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes