+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी adjustदेवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule28 Mar 24 person by visibility 91 categoryजिल्हा परिषद
जनतेनीच ठरवलंय शाहू छत्रपतींना खासदार करायचं

-गोपाळराव पाटील

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांच्या रक्ताचा व वैचारिक वारसा शाहू छत्रपतींना लाभला आहे. संयमी, निष्कलंक व्यक्तिमत्त्व असलेल्या शाहू छत्रपतींनी समतेचा विचार पुढे चालू ठेवला आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत जनतेनेच शाहू छत्रपतींना खासदार करायचं ठरविलं आहे. यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून ते निश्चित विजयी होणार. चंदगड तालुक्यातून त्यांना मताधिक्य देऊ."असा विश्वास चंदगड तालुक्याचे नेते गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केला.
 महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ चंदगड तालुक्यात अडकूर येथे त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. याप्रसंगी ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी झालेल्या सभेत गोपाळराव पाटील यांनी, ''शाहू  छत्रपती  समाजासाठी झटणारे  व्यक्तिमत्व आहे. सध्याच्या भाजप सरकारचा कारभार हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे. शेतकरी कामगारांची पिळवणूक होत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला नागरिकांनी भक्कम साथ द्यावी.शिवशाहूंचा कृतिशील वारसा शाहू छत्रपतींनी जपला आहे. त्यांना प्रचंड मताधिक्याने विजय करून संसदेत पाठवूया असेही ते म्हणाले.
 शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, चंदगडला पाच गडांचा इतिहास आहे. निसर्ग सौंदर्य नटलेला हा तालुका आहे. या गडांचे संवर्धन झाले पाहिजे, काजू प्रक्रिया केंद्राला गती मिळायला हवी.
 राष्ट्रवादीचे अमर चव्हाण म्हणाले, सध्याच्या भाजप सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भाजपा हा भ्रष्टाचारी मंडळींना आसरा देणारा पक्ष बनला आहे. देशाची स्थिती सुधारण्यासाठी इंडिया आघाडी सोबत सगळे जण राहू या. शाहू छत्रपतींना देशात एक नंबरनी निवडून देऊ या. 
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले,"भारत कृषीप्रधान देश आहे. मात्र भाजप सरकारने हा देश भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम सुरू केले आहे. हा देश सुरक्षित राहण्यासाठी महाविकास आघाडी हा भक्कम पर्याय आहे. शाहू छत्रपतींना या निवडणुकीत तालुक्यातून मोठे मताधिक्य देऊ."
काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी देसाई, डाव्या चळवळीतील प्रा.सुभाष जाधव, अडकूर गावातील ज्येष्ठ नेते बाबासाहेब अडकूर, गोकुळचे माजी संचालक रामराजे कुपेकर यांची भाषणे झाली. या साऱ्यांनी आपल्या भाषणामध्ये शाहू छत्रपतींना चंदगड तालुका हा मोठे मताधिके देऊन विजय करेल असा विश्वास व्यक्त केला. 
याप्रसंगी गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, राष्ट्रवादीचे शिवाजी सावंत नितीन पाटील, दौलतचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, संचालक उत्तम पाटील, वसंत निकम, जगन्नाथ इंगवले, प्रा. किसन कुराडे, विष्णू गावडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तात्यासू देसाई, एम जे पाटील, कल्लाप्पाण्णा भोगण, विलास पाटील, जी.बी.पाटील, एन एस पाटील आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंदगड तालुका निरीक्षक सचिन घोरपडे यांनी आभार मानले.
.....
बुजवडेत उत्साही स्वागत
बुजवडे येथे ग्रामस्थांनी शाहू छत्रपतींचे उत्साही स्वागत केले. महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या. शाहू छत्रपतींनी श्री भावेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी सरपंच रेश्मा नामदेव सुके, उपसरपंच निलेश दळवी यांनी स्वागत केले. श्रमिक मुक्ती दलाचे कृष्णा पाटील गिरणी कामगार संघाचे गोपाळ गावडे आणि ऊस तोडी कामगारांनी छत्रपतींना पाठिंबा जाहीर केला. गावातून 95 टक्के मतदान देऊ. असे सांगितले. यावेळी गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी, शिवसेना तालुकाप्रमुख अनिल दळवी, शिवसेनेचे प्रभाकर खांडेकर, प्रा.कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले.शाहू छत्रपती हे आमच्या गावात आले हे आमचे भाग्य आहे अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.