Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कामगार- कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक,  सरकारच्या चार श्रमसंहितेला जोरदार विरोधकोल्हापुरात आयुष विद्यापीठ स्थापण्यासाठी प्रयत्नशील-सहपालकमंत्री माधुरी मिसाळविट्यात २२ फेब्रुवारीला ४४ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनकास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची प्रशासनासोबत चर्चाशिवाजी विद्यापीठात शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषदशाहू महाराज हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहातसांगलीत सोळा फेब्रुवारीपासून राज्य कला प्रदर्शन, १२७५ कलाकृतींचे प्रदर्शनकोल्हापुरात रंगणार पुजाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा, विविध जिल्ह्यातील बारा संघांचा सहभागप्रा. डॉ. जे. बी. शिंदे यांचे निधन विवेक सिद्ध यांना जीवन प्रकाश समाज गौरव पुरस्कार

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या चेअरमनपदी सचिन मेनन

schedule03 Apr 24 person by visibility 974 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाचे ज्येष्ठ विश्वस्त व मेनन उद्योग क्षेत्राचे सचिन मेनन यांची शिवाजी विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या चेअरमनपदी राज्यपालांच्याकडून नियुक्ती झाली आहे. या निमित्ताने केआयटी परिवारातर्फे मेनन यांचा सत्कार करण्यात आला. 
  केआयटीचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी प्रास्ताविक केले.  सचिन मेनन यांची राज्यपालांनी केलेली निवड ही संस्थेसाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. या निवडीबद्दल त्यांनी राज्यपाल  रमेश बैस व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे आभार व्यक्त केले. नवीन शैक्षणिक धोरण ,विद्यार्थ्यांच्या व उद्योग क्षेत्राच्या अशा अपेक्षा यांची उत्तम सांगड घालण्यात श्री सचिन मेनन नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 संस्थेचे उपाध्यक्ष  साजिद हुदली यांनी  सचिन मेनन यांचे कार्यकर्तृत्व, स्वभाव, सामाजिक तसेच तांत्रिक क्षेत्रातील योगदान,आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग जगताबरोबर असलेले त्यांचे संबंध या विषयावर प्रकाशझोत टाकला. केआयटीच्या विकासात मेनन यांचे योगदान हे अत्यंत मोलाचे असल्याच्या भावना  हुदली यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केल्या. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता  सचिन मेनन यांनी सातत्याने जे काम करत आले आहेत त्या कामाचा सन्मान या नवीन जबाबदारीच्या रूपात त्यांना मिळाला असल्याचे गौरवपूर्ण उद्गार संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी काढले.
  सत्काराला उत्तर देताना  सचिन मेनन यांनी सातत्याने पुढे चालत राहिले पाहिजे, प्रयत्न करत राहिले पाहिजे ‘लक’ हा फॅक्टर तुमच्याकडे आपोआप येतोच या शब्दात .आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण आत्ता कुठे आहोत ? कुठे जायचे आहे ? कुठल्या मार्गाने जायचे ? आहे हे जर निश्चित असेल तर कोणत्याही प्रकारची स्वप्न आपण सहजगत्या आपल्या आवाक्यात आणू शकतो हे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त भरत पाटील,  दिलीप जोशी, आय.एम.ई.आर.चे संचालक डॉ.खाडिलकर , रजिस्ट्रार  मनोज मुजुमदार  उपस्थित होते. प्रा.क्षितिजा ताशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ अमित सरकार यांनी आभार केले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes