जिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठक
schedule19 Aug 26 person by visibility 30 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने ज्या योजना सुरू आहेत त्या लवकरात लवकर कार्यान्वित कराव्यात तसेच या योजना कार्यान्वित करताना स्थानिक प्रशासनाला विश्वासात घ्यावे अशी सूचना जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जल जीवन मिशन,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅसमिन, जिल्हा प्रकल्प संचालक जलजीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक शशिकांत निंबाळकर ,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, मूळ आराखडयानुसार पाणीपुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्या स्थानांतरित कराव्यात तसेच सरकारी स्तरावरून निधी उपलब्ध झाल्यानंतर ४६ गावच्या ज्या योजना कार्यान्वित कराव्यात. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जिल्ह्यात सध्या किती योजना सुरू आहेत ? त्याचे किती टक्के काम पूर्ण झाले आहे ? तसेच त्याची सद्यस्थिती काय ? याबाबत विचारणा करून पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन म्हणाल्या, या विभागाद्वारे ज्या योजना पूर्ण आहेत त्या योजना स्थानातंरित करा म्हणजे रिवाईज करण्याचा प्रश्नच येणार नाही तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी घन कचऱ्याबाबत जिल्ह्यात 5 कामे अपूर्ण आहेत. दोन कामे नव्याने सामिल करण्यात आले असल्याची माहिती यावेळी दिली. या बैठकीत पी.ए कराड,पी के आलटकर, सचिन देशमुख, तुषार चौगुले, हेमंतकुमार मदवाने, डी एस पाटील उपस्थित