Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टीईटीसाठी कोल्हापूर केंद्रावर उच्चांकी परीक्षार्थी, नागमोडी बैठक व्यवस्थाशिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात जल्लोष; शिवाजी चौकात जिलेबी वाटपशिवसेनेचा साठावा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरागायक पंडित विनोद डिग्रजकरांनी अमेरिकत उलगडला बंदिशींचा खजानाटीईटी परीक्षेसाठी राज्यभरात सहा लाखावर परीक्षार्थी, १८ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉचगांधीनगर परिसरातील बांधकामाबाबत भाजप - शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, सुनील मोदींनी तो व्हिडिओ दाखवावाशिवाजी विद्यापीठातर्फे ४१० विद्यार्थ्यांना २९ लाखाहून अधिक शिष्यवृत्ती प्रदानशिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालकपदी डॉ. मंजुश्री पवारब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे श्री राम कथाचे आयोजनत्या शिक्षकांना टीईटीतून सवलत मिळावी - भरत रसाळे

जाहिरात

 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र

schedule19 Sep 24 person by visibility 673 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस व अन्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांता सरकारी मदत देण्यासंबंधीचे दोन प्रस्ताव होते. पन्हाळा तालुक्यातील कारवे येथील संदीप निवास खामकर व शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील कुमार बाबू पोवार या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये मदतीचे प्रस्ताव पात्र ठरविले. हा प्रस्ताव सरकारकडे पाठवून रितसर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
साधारणपणे महिना ते दीड महिन्याच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळणार आहे. एक लाख रुपयांपैकी 30 हजार रुपये लाभार्थ्याच्या बँक खात्यात टाकले जातात आणि 70 हजार रुपये मासिक प्राप्ती योजनेमध्ये लाभार्थ्याच्या नावे बँकेत ठेवले जातात.असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागातील तहसिलदार विजय पवार यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes