महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरुन हद्दवाढ कृती समिती आक्रमक झाली आहे. हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांची केएमटी बस सेवा रोखण्यात आली आहे. ग्रामीण भागातील तोटयातील बस सेवा बंद करावेत, शहरवासियांच्या करातून हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांना सेवा देउ नयेत अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे.
शास्त्रीनगर येथील केएमटीच्या कार्यशाळेबाहेर कृती समितीचे कार्यकर्ते सोमवारी सकाळीच पोहचले. त्यांनी केएमटीची बस सेवा रोखली. वर्कशॉपमधून एकही बस बाहेर पडू दिली नाही.कृती समितीचे पदाधिकारी माजी नगरसेवक बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, अशोक भंडारी, सतीश कांबळे, किशोर घाटगे, दिलीप देसाई, प्रसाद जाधव आदींचा आंदोलनात सहभाग आहे.