+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Mar 24 person by visibility 271 categoryराजकीय
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर शुक्रवारी काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांनी त्यांची भेट घेतली. नवीन राजवाडा येथे शाहू महाराजांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार पी एन पाटील यांनी, "शाहू महाराजांच्याविषयी लोकांच्या मनात प्रेम आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणतीही कसल्या प्रकारची अडचणी निर्माण होणार नाही. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज विजयी होतील."अशा शब्दात त्यांना शुभेच्छा दिल्या.
 दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आमदार पी एन पाटील, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, भोगावतीचे चेअरमन शिवाजी पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बाजार समिती सभापती भारत पाटील भुयेकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार पी एन पाटील म्हणाले, "महाविकास आघाडी मध्ये समाविष्ट सर्वच मित्र पक्षांनी शाहू महाराजांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट यांच्यासह मित्र पक्षांचे कार्यकर्ते जोमाने प्रचारात आहेत. शिवाय कोल्हापूर मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे तीन आमदार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित विजयी होईल. श्रीमंत शाहू महाराज यांच्या विषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम आहे त्यामुळे या निवडणुकीत कोणतीही अडचण जाणवत नाही." महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांच्या विरोधात महायुतीकडे उमेदवार मिळत नाही अशी स्थिती आहे. महायुतीचे तिकीट जाहीर झाल्यानंतर नाराज आणखी वाढणार आहे. अनेक मंडळी आमच्या संपर्कात आहेत. शाहू महाराजांच्या विषयी लोकांच्या मनात प्रेम आहे यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्यासारखे वाटते. असेही आमदार पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी एच पाटील, करवीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव पाटील शिंगणापूरकर, भोगावती कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे, शिवाजी कारंडे, सुनील खराडे, ए.डी. चौगुले, अभिजीत रवी पाटील, कृष्णात धोत्रे, रणजीत पाटील आदी उपस्थित होते.