महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
राजर्षी शाहू महाराज यांचे मुंबई येथील पन्हाळा लॉज राजवाडा, खेतवाडी, ( गल्ली नंबर १३) या जागेवर उभारलेल्या शाहू स्मृतीस्तंभ येथे अभिवादन करण्यात आले. सकाळी दहा वाजता १०० सेकंद स्तब्धता पाळून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात आली.या जागेवर राजर्षी शाहू महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला होता.
यावेळी श्री शाहू स्मृतिस्तंभ सुरक्षादृष्टीने परिपूर्ण केल्याबद्दल राज्याचे पर्यावरण,महिला व बाल विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांचा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवी सरदेसाई, राजश्री शाहू मालिकेचे दिग्दर्शक सतीश रणदिवे ,श्री शाहू स्मृतीस्तंभ सदस्य पैलवान संग्राम कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनय घोरपडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रावसाहेब सांगोलकर, मुंबई पोलीस सागर पट्टणकुडी ,विनायक गाजरे, रोहित महाडिक, शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत पवार, प्रज्ञा जाधव, बीजेपी संघटक अजय मिश्रा उपस्थित होते.