Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ज्ञानपीठ विजेते लेखक वि.स. खांडेकर हे मानवी जीवनाचे भाष्यकार, त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढे - डाॅ. भालचंद्र मुणगेकरखाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहिणी येडगे, व्हाइस चेअरमनपदी चेअरमनपदी शिवाजी सोनाळकर कोल्हापुरात मंत्र्यांच्या समर्थकांची अधिकाऱ्यांवर दमबाजी ! कार्यालय पेटवण्याची, बुटाने मारण्याची धमकी ! !डी वाय पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकारकार्यालयात नगरसेवकांची भांडणे, चौकात कार्यकर्ते आमनेसामने! महापालिकेचा बनतोय आखाडा, पदाधिकारी म्हणतात हा कौटुंबिक वाद !!आयुक्तांच्या कार्यालयातच शारंगधर देशमुख - आदिल फरास एकमेकांना भिडले !  चौकात कार्यकर्ते जमले, पोलिसांचा हस्तक्षेप- नेत्यांची फोनाफोनी!!शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मला मिळेल, रविवारी प्रचाराचा शुभारंभ करणार - मंगेश चिवटेशिक्षक आमदार - जयंत आसगावकरांच्यासमोर आव्हान, महायुतीत रस्सीखेच! माजी आमदारही शर्यतीत !पोलिस प्रमुखांचे गणेश मंडळांना आवाहन ! उत्सवात लेझरचा वापर नको - आवाजाची मर्यादा पाळा!!७८९ दूध संस्था अपात्र, कागल – करवीर -राधानगरीतील संस्थांचा समावेश! दूध संस्था प्रतिनिधीची अधिकाऱ्यांना उद्देशून एकेरी भाषा !!

जाहिरात

 

केआयटीच्या सहा विद्यार्थिनींना नऊ लाखांचे पॅकेज

schedule31 Jan 23 person by visibility 1736 categoryशैक्षणिक

एचएसबीसी या राष्ट्रीय कंपनीमध्ये निवड
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर:  कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्या सहा विद्यार्थीनींची  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अग्रमानांकित हाॅगकाॅंग शांघाय बॅंकिग कार्पोरेशन (एच्.एस्.बी.सी.) या कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी  व अभियांत्रिकीचे संचालक डॉ. मोहन वणरोट्टी यांनी दिली. निवड झालेल्या या सर्व  विद्यार्थिनींचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.निवड झालेल्या विद्यार्थींनीनां वार्षिक तब्बल 9 लाखाचे पॅकेज कंपनीने दिले आहे.  
 एचएसबीसी या नामांकित कंपनीने खास विद्यार्थीनींसाठी हा कॅम्पस ड्राइव्ह आयोजित करण्यात आला होता. या मुलींना ऍप्टिट्यूड  टेस्ट, सायकोमेट्रिक टेस्ट, टेक्निकल टेस्ट, तांत्रिक ज्ञान मुलाखत व एचआर मुलाखत अशा पाच खडतर टप्प्यांतून जावे लागले. अंतिम निकालामध्ये केआयटीच्या यज्ञा सुहास जोशी, संजना गणेश सावंत, दिपाली कृष्णा पाटील, सेजल गजानन यादव, शिवानी जितेंद्र शिराळे आणि श्रेयाप्रकाश शेलार या सहा विद्यार्थींनींची निवड एच्. एस्. बी. सी. या कंपनीने केली आहे. *हि निवड सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून संख्येने व पॅकेजने सर्वाधिक आहे.  
महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डाॅ.अमित सरकार, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरींग विभाग प्रमुख डाॅ. अजित पाटील,ट्रेनिंग प्लेसमेंटचे विभाग समन्वयक प्रा.चैतन्य पेडणेकर आणि प्रा.विनय प्रभावळकर यांचे विद्यार्थीनींना सहकार्य लाभले.   संस्थेचे अध्यक्ष सुनिल कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दिपक चैगुले, कार्यकारी संचालक डाॅ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, संचालक डाॅ.मोहन वनरोट्टी व रजिस्ट्रार डाॅ. एम्. एम्. मुजुमदार यांनी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes