Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाचे आठ विद्यार्थी बनले सांख्यिकी अधिकारीमहापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याना केएमटीचा मोफत बस पास, ७५५ विद्यार्थ्यांना पासचे वितरणथोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायिनी, केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मितामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी आष्ट्यात ! अण्णासाहेब डांगे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन, नूतन इमारतींचे उद्घाटन! !रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकांच्या संशोधनाला सरकारचे पेटंटपवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरूविद्यापीठामध्ये राजकीय अड्डा करू नका ! शिवसेना युवासेना - मनसेचा अभाविपच्या कार्यक्रमावर आक्षेप ! !डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय शोकसभातात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजच्या बी फार्म अभ्यासक्रमास अ मानांकनहुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे आठ ऑगस्टला क्रांतिज्योत मिरवणूक

जाहिरात

 

केआयटीच्या सहा विद्यार्थिनींना नऊ लाखांचे पॅकेज

schedule31 Jan 23 person by visibility 1686 categoryशैक्षणिक

एचएसबीसी या राष्ट्रीय कंपनीमध्ये निवड
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर:  कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्या सहा विद्यार्थीनींची  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अग्रमानांकित हाॅगकाॅंग शांघाय बॅंकिग कार्पोरेशन (एच्.एस्.बी.सी.) या कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी  व अभियांत्रिकीचे संचालक डॉ. मोहन वणरोट्टी यांनी दिली. निवड झालेल्या या सर्व  विद्यार्थिनींचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.निवड झालेल्या विद्यार्थींनीनां वार्षिक तब्बल 9 लाखाचे पॅकेज कंपनीने दिले आहे.  
 एचएसबीसी या नामांकित कंपनीने खास विद्यार्थीनींसाठी हा कॅम्पस ड्राइव्ह आयोजित करण्यात आला होता. या मुलींना ऍप्टिट्यूड  टेस्ट, सायकोमेट्रिक टेस्ट, टेक्निकल टेस्ट, तांत्रिक ज्ञान मुलाखत व एचआर मुलाखत अशा पाच खडतर टप्प्यांतून जावे लागले. अंतिम निकालामध्ये केआयटीच्या यज्ञा सुहास जोशी, संजना गणेश सावंत, दिपाली कृष्णा पाटील, सेजल गजानन यादव, शिवानी जितेंद्र शिराळे आणि श्रेयाप्रकाश शेलार या सहा विद्यार्थींनींची निवड एच्. एस्. बी. सी. या कंपनीने केली आहे. *हि निवड सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून संख्येने व पॅकेजने सर्वाधिक आहे.  
महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डाॅ.अमित सरकार, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरींग विभाग प्रमुख डाॅ. अजित पाटील,ट्रेनिंग प्लेसमेंटचे विभाग समन्वयक प्रा.चैतन्य पेडणेकर आणि प्रा.विनय प्रभावळकर यांचे विद्यार्थीनींना सहकार्य लाभले.   संस्थेचे अध्यक्ष सुनिल कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दिपक चैगुले, कार्यकारी संचालक डाॅ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, संचालक डाॅ.मोहन वनरोट्टी व रजिस्ट्रार डाॅ. एम्. एम्. मुजुमदार यांनी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes