Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या निवडणुकीसाठी नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर,  बाळासाहेब खाडेंचे अर्ज दाखलमुश्रीफांनी जाहीर केलेल्या गोकुळच्या ठराव संख्येवरून भाजपच्या नेत्यांना मिरचीचा ठसका का लागला ? युवराज पाटील हसन मुश्रीफांचे भाजपला थेट चॅलेंज ! गोकुळसाठी कोल्हापुरात ठरावांची बेरीज, पदवीधर आमदारकीसाठी सांगलीत शड्डू !!जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !

जाहिरात

 

केआयटीत संवाद आयएएस अधिकाऱ्यांसोबत, उलगडली प्रशासक कादंबरी बलकवडेंची वाटचाल

schedule05 Dec 22 person by visibility 1246 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " स्वत:च्या विचाराने निर्णय घेताना इतरांच्या अनुभवाचाही आदर करा " असे आवाहन महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
केआयटी अभियांत्रिक (स्वायत्त) महाविद्यालयाच्या ‘लीड इंडिया’ या विद्यार्थी व्यासपीठाच्या वतीने शुक्रवार २ डिसेंबर २०२२ रोजी ‘संवाद- आयएएस अधिकाऱ्यांसोबत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून बलकवडे  उपस्थित होत्या.
 प्रशासकीय सेवेतील विविध अनुभव अशा मोठ्या पटलावरती ही मुलाखत घेण्यात आली.आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना जबाबदारीपूर्वक व कोणत्याही प्रकारचा आड पडताना न ठेवता उत्तरे दिली. त्यांच्या ईशान्य भारतातील नागालँड राज्यातील पहिल्या पोस्टिंगपासून कोल्हापुरातील पोस्टिंग पर्यंत विविध प्रशासकीय व वैयक्तिक अनुभवांची शिदोरी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर खुली केली. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी ‘नेव्हर गिव्हअप’ चा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. मानसिक ताणतणाव हा कामाचा एक भाग आहे त्याचे व्यवस्थापन आपल्यालाच करावे लागते अशा प्रकारचे मत  व्यक्त केले. स्वत:च्या विचाराने वावरताना इतरांच्या अनुभवाचाही आदर आपण केला पाहिजे असे प्रांजळ मत डॉ.बलकवडे यांनी व्यक्त केले.आपल्याला खरंच समाजासाठी, देशासाठी काही भरीव योगदान करायचे असेल व हे करताना पडद्यामागचे सूत्रधार म्हणून रहायचे असेल तरच विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत यावे अशा प्रकारचा मौलिक सल्ला यांनी विद्यार्थ्यांना दिला.
 विद्यार्थी प्रतिनिधी सुजीत भोसले व बंदिनी पाटील यांनी मुलाखत घेतली. डॉ.मोहन वनरोट्टी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.  स्वरुपा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांची ओळख शुभम कुंभार यांनी करून दिली. वैष्णवी कांबळे यांनी प्रास्ताविक केेले. ओंकार बिराजदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन ‘लिड इंडियाचे’ समन्वयक प्रा.अमित वैद्य व प्रा.प्रियांका माने यांनी केले.  कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ.विलास कार्जिन्नी,रजिस्ट्रार डॉ.मनोज मुजुमदार उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes