Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेचे कर्मचारी २४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून संपावरमहाविद्यालयीन विद्यार्थी सिद्धेश रेडेकरचा अपघाती मृत्यू, कुटुंबाला मोठा धक्का - बुधवारी रक्षाविसर्जनकोल्हापुरात एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनचे ४७ वे राज्यव्यापी अधिवेशनराष्ट्रवादीच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेत दहा हजार कार्यकर्ते, सातशे  वाहनांचा ताफा ! २५ एप्रिलला जिल्ह्यात रथयात्रा !!कोल्हापूर महानगर भाजपच्या नऊ मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीरपालकमंत्र्यांनी केले जिल्हा परिषद प्रशासनाचे अभिनंदन  कुमार केतकर, व्यंगचित्रकार आलोक यांना पुरस्कार जाहीर ! कोल्हापुरात लवकरच पुरस्कार वितरण !!लॉंग लाईफ मोती महल आरपीएलचा विजेता ! एमडब्ल्यूजी सुपर किंग्सला उपविजेतेपद !! उद्यम सोसायटीत सत्तारुढ पॅनेलचे अकरा उमेदवार विजयी, परिवर्तन पॅनेलला दोन जागासंस्कार, नितीमूल्ये - परंपरेचा सुरेख मिलाफ घडवत सारस्वत समाजाने भारतीयत्व जपले – अभिनेत्री निशिगंधा वाड देऊलकर

जाहिरात

 

कष्टाची तयारी ठेवल्यास यशाला गवसणी- तुषार बुरुड

schedule22 Jun 24 person by visibility 470 categoryशैक्षणिक

  बालिंगे हायस्कुल येथे गुणवंताचा गौरव
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी अपार कष्टाची तयारी ठेवा. सूक्ष्म नियोजन करुन अभ्यास केल्यास यशाला गवसणी घालणे सहज शक्य होते. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांनी केले.
 करवीर तालुक्यातील बालिंगे  येथील बालिंगे हायस्कुलमध्ये आयोजित गुणवंताच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव जांभळे होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे म्हणाले, आपण सगळे शेतकऱ्यांची मुले आहोत, काळ्या मातीतील कष्टाची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि रिल्सच्या जाळ्यात न आडकता संयम ठेवत कष्टाची तयारी ठेवली तर कोणत्याही परीक्षेत यश तुमचेच असते. 
 शिक्षण संस्थेचे सहसचिव मधूकर जांभळे म्हणाले, सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांची मुले कष्टाच्या बळावर कशी झेप घेऊ शकतात हे सरदार नाळे व तुषार बुरुड यांनी दाखवून दिले आहे. आज विद्यार्थ्यांना अशा व्यक्तीमत्वाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम असून या शाळेचे विद्यार्थी आज उच्च पदस्थ असल्याचा अभिमान वाटत आहे. आगामी काळात शालेय स्तरापासूनच स्पर्धा परीक्षांचे ओळख विद्यार्थ्यांना करुन देण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहील.
मुख्याध्यापक एच. के. पटवेगार यांनी स्वागत केले. इयत्ता सहावी ते दहावीतील गुणवंतासह बी. पी. पाटील, राजू कोरे, शिवाजी यादव, निरंजन जांभळे यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच सुधा वाडकर, माजी सरपंच मयूर जांभळे, शिक्षण संस्थेचे सदस्य एम. एस. भवड, खजानीस अशोक घोडके आदी उपस्थित होते. संस्थेचे सदस्य विशाल जांभळे यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes