Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

कष्टाची तयारी ठेवल्यास यशाला गवसणी- तुषार बुरुड

schedule22 Jun 24 person by visibility 812 categoryशैक्षणिक

  बालिंगे हायस्कुल येथे गुणवंताचा गौरव
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी अपार कष्टाची तयारी ठेवा. सूक्ष्म नियोजन करुन अभ्यास केल्यास यशाला गवसणी घालणे सहज शक्य होते. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांनी केले.
 करवीर तालुक्यातील बालिंगे  येथील बालिंगे हायस्कुलमध्ये आयोजित गुणवंताच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव जांभळे होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे म्हणाले, आपण सगळे शेतकऱ्यांची मुले आहोत, काळ्या मातीतील कष्टाची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि रिल्सच्या जाळ्यात न आडकता संयम ठेवत कष्टाची तयारी ठेवली तर कोणत्याही परीक्षेत यश तुमचेच असते. 
 शिक्षण संस्थेचे सहसचिव मधूकर जांभळे म्हणाले, सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांची मुले कष्टाच्या बळावर कशी झेप घेऊ शकतात हे सरदार नाळे व तुषार बुरुड यांनी दाखवून दिले आहे. आज विद्यार्थ्यांना अशा व्यक्तीमत्वाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम असून या शाळेचे विद्यार्थी आज उच्च पदस्थ असल्याचा अभिमान वाटत आहे. आगामी काळात शालेय स्तरापासूनच स्पर्धा परीक्षांचे ओळख विद्यार्थ्यांना करुन देण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहील.
मुख्याध्यापक एच. के. पटवेगार यांनी स्वागत केले. इयत्ता सहावी ते दहावीतील गुणवंतासह बी. पी. पाटील, राजू कोरे, शिवाजी यादव, निरंजन जांभळे यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच सुधा वाडकर, माजी सरपंच मयूर जांभळे, शिक्षण संस्थेचे सदस्य एम. एस. भवड, खजानीस अशोक घोडके आदी उपस्थित होते. संस्थेचे सदस्य विशाल जांभळे यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes