Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ज्ञान- कौशल्य - सकारात्मक दृष्टिकोन ही यशाची त्रिसूत्री :  संजय बाबर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाइतकेच  कौशल्य विकसित करणे हेच राष्ट्राचे खरे बळ - पद्मश्री जी. डी. यादवनव्या सभागृहाच्या पहिल्या सभेत तरुण नेतृत्वाची छाप, प्रभागासह शहराचे विषय मांडलेनगरसेवकांचा प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार, महापौरांचा अधिकाऱ्यांना सज्जड दमफौन्ड्री उद्योगासह कोल्हापूरच्या हद्दवाढीसंबंधी दिल्लीत केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार – खासदार प्रवीण खंडेलवालगोकुळकडून म्हैस - गाय दूध खरेदी दरात वाढराखीव कर्मचारी निवडणूक भत्ता : लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित शाश्वत विकास म्हणजे सर्वांगीण विकास होय  : डॉ. यशवंत थोरातअहिंसा-सत्य -अस्तेय ही मूल्ये आजच्या समाजाची अपरिहार्य गरज — डॉ. सुषमा रोटेउदंड होणार नगरसेवक, नावापुढे पद -शहरासाठी योगदानाचे काय ? स्वीकृतच्या पदाचीही खांडोळी ! !

जाहिरात

 

अभिषेक मिठारींकडून शरण साहित्य अध्यासनास अकरा हजार रुपयांची देणगी

schedule24 Oct 24 person by visibility 698 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासनास लोकवर्गणीद्वारे निधी संकलन केले जात आहे. या निधीतून महात्मा बसवण्णा आणि त्यांच्या सहकारी शरण-शरणींच्या साहित्याचे अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि प्रकाशन केले जाणार आहे. सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी १० मार्च २०२३ च्या अधिसभेमध्ये शरण साहित्य अध्यासन निर्मितीचा ठराव मांडला होता. ज्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान अध्यसनाच्या निधीसाठी अभिषेक मिठारी यांनी वर्षभरातील विविध कार्यक्रम, व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी ठिकाणी मिळालेले मानधन स्वरूपातील रक्कम अकरा हजार रुपये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के यांच्याकडे सुपूर्द केले. माजी राज्यपाल  पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या ९० व्या वाढदिनाच्या औचित्याने मिठारी यांनी ही रक्कम कुलगुरू शिर्के यांच्याकडे सुपूर्द केले.यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर आणि यश आंबोळे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes