Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाणी टंचाईवरुन नगरसेवकांचा प्रशासनावर हल्लाबोल, पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव टाकला लांबणीवरशिवाजी विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या १५० विद्यार्थ्यांची कंपन्यात निवडशिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे १९ विद्यार्थी यशस्वीकोल्हापुरात रविवारी राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषदसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ब्रेन बायपास शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक, डॉ शिवशंकर मोरजक्केंचे विशेष कौतुकसंजय भोसलेंचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाकडून नामंजूर, आयुक्तांनी निलंबित करावे – भूपाल शेटेटाकाऊतून टिकाऊ, भंगारातील गाडयांचे ट्रकमध्ये रुपांतर ! कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला आयुक्तांची शाबासकी ! !काँग्रेसचे नगरसेवक धावले पंपिंग स्टेशनकडे, आयुक्त अधिकाऱ्यांकडूनही पाहणीपाण्याच्या उपलब्धतेच्या ठिकाणांवरील उपसाबंदी उठवावी, इरिगेशन फेडरेशनची मागणीटिक टिक वाजते डोक्यात… उलगडले घडयाळाशी जुळलेले बंध ! प्रकटला राजकारणापलीकडील कृतज्ञतेचा भाव !!

जाहिरात

 

अभिषेक मिठारींकडून शरण साहित्य अध्यासनास अकरा हजार रुपयांची देणगी

schedule24 Oct 24 person by visibility 900 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासनास लोकवर्गणीद्वारे निधी संकलन केले जात आहे. या निधीतून महात्मा बसवण्णा आणि त्यांच्या सहकारी शरण-शरणींच्या साहित्याचे अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि प्रकाशन केले जाणार आहे. सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी १० मार्च २०२३ च्या अधिसभेमध्ये शरण साहित्य अध्यासन निर्मितीचा ठराव मांडला होता. ज्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान अध्यसनाच्या निधीसाठी अभिषेक मिठारी यांनी वर्षभरातील विविध कार्यक्रम, व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी ठिकाणी मिळालेले मानधन स्वरूपातील रक्कम अकरा हजार रुपये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के यांच्याकडे सुपूर्द केले. माजी राज्यपाल  पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या ९० व्या वाढदिनाच्या औचित्याने मिठारी यांनी ही रक्कम कुलगुरू शिर्के यांच्याकडे सुपूर्द केले.यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर आणि यश आंबोळे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes